शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

अहमदनगरला जुन्याच निविदा नव्या दराने, बीडला फेरनिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 04:24 IST

नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकर पुरवठ्यातील अनियमितता ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणलीच. मात्र, टँकरच्या निविदेपासूनच संशयकल्लोळ आहे.

- सुधीर लंकेअहमदनगर : नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकर पुरवठ्यातील अनियमितता ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणलीच. मात्र, टँकरच्या निविदेपासूनच संशयकल्लोळ आहे. ठेकेदारांनी शासकीय दरापेक्षा अधिक दराच्या निविदा भरल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने त्या मंजूर केल्या आहेत. याबाबत मंत्रालयानेही स्वयंस्पष्ट आदेश न पाठविता संभ्रम निर्माण केला आहे.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने २६ आॅक्टोबर रोजी निविदा प्रसिद्ध केली. या निविदांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. अंतिम मुदतीनंतर आठ संस्थांनी एकूण १६ निविदा सादर केल्या. यापैकी श्री संत परमानंद बाबा व बबनरावजी शिंदे सहकारी मोटार वाहतूक संस्था यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगून त्यांना अपात्र करण्यात आले. तर श्री गणेश सहकारी मोटार वाहतूक संस्था, गाडे ट्रान्सपोर्ट, जामखेड वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्था, लक्ष्मी माता श्रीरामपूर, वैभव लॉजिस्टिक नाशिक, साई सहारा इन्फ्रा अ‍ॅण्ड फॅसिलिटी पारनेर या सहा संस्थांना पात्र ठरविले गेले.प्रशासनाने अधिक दराकडे दुर्लक्ष केलेले दिसते. नगरच्या प्रशासनाने या निविदा रद्द न करता त्याबाबत १५ डिसेंबरला शासनाकडे मार्गदर्शन मागितले. आश्चर्य म्हणजे त्यानंतर चारच दिवसांत म्हणजे १९ डिसेंबरला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने सर्व राज्यातच टँकरचे दर वाढविण्याचा आदेश काढला. शासनाच्या या आदेशानंतर बीडसारख्या जिल्ह्यांनी पूर्वीच्या निविदा रद्द करुन नव्याने निविदा मागविल्या.असा आहे टँकरचा हिशोबपूर्वीच्या दराप्रमाणे १२ टन क्षमतेचा खासगी टँकर शासकीय पाणी पुरवठ्यासाठी दिवसभर शंभर किलोमीटर फिरला तर त्याला त्या दिवसापोटी ४ हजार २९६ रुपये मिळत होते. नवीन दरानुसार आता ७ हजार ३२० रुपये मिळतील. म्हणजे एखाद्या टँकरची एक दिवस जरी खोटी खेप दाखवली तरी त्या ठेकेदाराला सात हजार रुपये घरबसल्या मिळतील. खोट्या खेपा दाखवूनच टँकरमध्ये घोटाळा केला जातो.आम्ही बाद ते पात्र कसे?अटीशर्तीप्रमाणे आम्ही कागदपत्रे न दिल्याने आमची निविदा बाद झाली. मग, वाढीव दर असताना इतर संस्थांच्या निविदा पात्र कशा होतात? अशी तक्रार संत श्री परमानंद बाबा सहकारी मोटार वाहतूक संस्थेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.तब्बल ७० टक्के अधिक दरराज्यात शासनाने टँकरच्या दरात तब्बल सत्तर टक्क्यांनी वाढ केली आहे. २०१२ च्या आदेशाप्रमाणे पूर्वी १ टन क्षमतेसाठी टँकरला दिवसाला १५८ रुपये भाडे होते. ते आता २७० रुपये करण्यात आले. किलोमीटरचा दर दोन रुपयांहून ३.४० रुपये केला आहे.नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र आहे त्याच निविदाधारकांना संधी देत त्यांनी मागितलेला दर कायम केला. ‘निविदा अंतिम करण्याबाबत नवीन शासन आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी’, असे संदिग्ध पत्र मंत्रालयाने २६ डिसेंबरला पाठविले. त्याच्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. मंत्रालयाने आलेल्या निविदाच वाढीव दराने मंजूर करा, असे स्पष्टपणे म्हटलेले नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने तसा अर्थ काढला. तक्रारीनंतरही मंत्रालयाने स्पष्टीकरण केलेले नाही. नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी याबाबत चौकशी करु, असे सांगितले.निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया चालू असतानाच शासनाने टँकरचे दर वाढविले. त्यामुळे नगरच्या जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करत जुन्याच निविदा वाढीव दराने मंजूर केल्या.- गणेश पवार, अप्पर सचिव,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागजुन्याच निविदा जरी मंजूर केल्या असतील तरी त्या शासनाच्या नवीन दरांपेक्षा कमी दराच्या आहेत. त्यामुळे यात नियमभंग काहीही नाही.- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर.

टॅग्स :droughtदुष्काळ