शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरवर झेंडा कुणाचा?

By सुधीर लंके | Updated: December 8, 2018 11:21 IST

ठरलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आणि आश्वासनांची खैरात करत महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांनी विकासाचे गाजर दाखविले.

सुधीर लंकेठरलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आणि आश्वासनांची खैरात करत महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांनी विकासाचे गाजर दाखविले. मात्र, मतदारांचा विश्वास संपादन करण्यात कुठलाही एक पक्ष यशस्वी ठरला, असे दिसत नाही. प्रचारात कुणाची अशी लाट दिसली नाही.नगर महापालिकेत गत अडीच वर्षे सेना-भाजपची सत्ता होती. मात्र, या काळात आम्हाला शहराचा विकास करता आला नाही, अशी जाहीर कबुली या दोन्ही पक्षांनी स्वत:च प्रचारात दिली. अर्थात त्याबाबतचे दोष त्यांनी एकमेकांकडे ढकलले. राज्यात भाजपकडे महत्त्वाची खाती असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक पालिकेचा निधी अडविला असा सेनेचा आरोप होता, तर आम्ही निधी दिला पण यांनीच खाली कामे केली नाही, असे भाजप म्हणाला. जेव्हा एकमेकांवर आरोप करण्यास वाव शिल्लक राहिला नाही, तेव्हा या दोन्ही पक्षांनी शहराच्या मागासलेपणाचे खापर पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर फोडले. अशी केवळ मडकी फोडाफोडी झाली.शिवसेनेने पुन्हा एकदा नगरच्या भयमुक्तीचा नारा दिला. आता त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही धावून आले. ‘मीच शहर भयमुक्त करु शकतो’ अशी नवीच घोषणा त्यांनी केली. या शहरात सेनेचीच दहशत असून त्यांनाही आत करु शकतो, असा दमही त्यांनी दिला. मी धमकी देत नाही, असे ते म्हणाले खरे, पण अप्रत्यक्षरित्या ही धमकीच होती. अर्थात केडगावमध्ये काँग्रेसचे उमेदवार व कोतकर समर्थक एका रात्रीत भाजपात कसे आले? (त्यासाठी कुणाला धमकावले?) खुनाच्या गुन्ह्यात दोषी असलेले कोतकर व मोदी यांची छायाचित्रे सोबत कशी? या सेनेच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कर मौन पाळले. याबाबत जाहीर खुलासा करायला ते घाबरले. भाजपच्या बहुतांश मंत्र्यांची भाषणे ही नगरच्या प्रश्नांपेक्षा राज्य व केंद्राच्या कामगिरीबाबत होती.भाजपने केंद्र व राज्याच्या निवडणुकीसारखाच ‘कार्पोरेट’ स्टाईलने ‘श्रीमंत’ प्रचार केला. मुंबईच्या वेगवेगळ्या ‘टीम’ त्यांनी तैनात केल्या होत्या. सर्व्हे घ्यायचे व रणनिती ठरवायची असा धडाका होता. मुख्यमंत्र्यांची काही विशेष खासगी पथकेच शहरात तळ ठोकून होती म्हणतात. त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना केवळ सूचना पाळण्यास सांगितले. निर्णयप्रक्रिया बहुतांश मुंबईकरांच्या ताब्यात होती. नगरच्या तरुणांना रोजगाराची साधने नाहीत. मात्र, निवडणुकीने सर्वेक्षण एजन्सीजला भरपूर रोजगार दिला. सेनेचा सर्व प्रचार अनिल राठोड यांच्यावर अवलंबून होता. भाजपच्या तुलनेत त्यांनी एकट्याने किल्ला लढविला. सेनेचे नितीन बानगुडे व नीलम गोºहे वगळता कुणीही प्रचारात आले नाहीत. असे का? हे समजले नाही. राष्टÑवादीत तर अघोषित शांतता दिसली. कुणावरच आरोप करायचे व बोलायचे नाही. स्थानिक पातळीवर घरोघर जाऊन प्रचार करायचा, असे बहुधा आमदार जगताप पिता-पुत्रांनी ठरविले होते. त्यांची भिस्त ही सभा व शक्तिप्रदर्शनापेक्षा स्थानिक उमेदवारांच्या ताकदीवर दिसली. राष्टÑवादीने केवळ धनंजय मुंडे यांची सभा घेतली. दिलीप वळसे व राष्टÑवादीचे इतर नेते प्रचारात फिरकले नाहीत. लोकसभा जवळ आल्याने राष्टÑवादीने या निवडणुकीत तयारीनिशी उतरणे अभिप्रेत होते. मात्र, त्यांच्यात प्रचंड सामसूम जाणवली. त्यामुळे हा पक्ष लोकसभा लढेल की नाही? अशीही शंका निर्माण झाली. जगताप यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने सरकारच्या दबावामुळे त्यांनी प्रचारात मवाळ भूमिका घेतली, अशीही चर्चा सुरु आहे. जगताप यावेळी केडगावात प्रचाराला फिरकलेच नाहीत. तेथील कोतकर समर्थकांचा भाजप प्रवेश व केडगाव हत्याकांड अशी दोन्ही कारणे त्या पाठीमागे असावीत. केडगावात भाजपची गत पोटनिवडणुकीत अनामत जप्त झाली. तेथे झेंडा रोवायचा असेल तर कोतकरांशिवाय पर्याय नाही, असे भाजपलाही वाटले. म्हणून भाजपने कर्डिले यांच्यावर बहुधा ही पक्षप्रवेशाची विशेष मोहीम सोपवली होती. कर्डिले यांनाही पक्षाचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. या सोयरिकीमुळेही जगताप तिकडे गेले नाही, असाही एक सूर आहे. जगतापांनी रेल्वे पुलाच्या पलीकडे व कर्डिले यांनी अलीकडे यायचे नाही, असे बहुधा ठरलेले असावे. हत्यांकाडाचे सेनेने राजकारण केल्याने सेनेला केडगावात व शहरात भाजपच्या माध्यमातून रोखणे हाही अजेंडा यात असू शकतो.काँग्रेसकडून या निवडणुकीत फारशा अपेक्षा नव्हत्या. कारण त्यांचे संघटन शहरात खिळखिळे झाले आहे. सुजय विखे यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर त्यांनी ताकद लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना शहरात अद्याप फारसा रसच नाही. ‘आधी लगीन लोकसभेचे, नंतर काय ते बाकीचे’ असे त्यांचे सरळ धोरण आहे. तरीही या निवडणुकीत त्यांनी अल्पसा प्रयत्न केला. विखे-थोरात एक दिसले. मनसे, भाकप, आप, रिपाइं, रासप, सपा, भारिप हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, ते बोटावर मोजण्याइतक्याच जागांवर लढत आहेत. या निवडणुकीत मतदार गोंधळात आहेत. कारण, एका प्रभागात चार उमेदवार असल्याने कोणत्या पक्षातून कोण लढतेय हे समजत नाही. दुसरी बाब म्हणजे मतदारांचा पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे कुठलाही एक पक्ष सत्तेत येईल, असे दिसत नाही. निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था राहू शकते. अशावेळी काहीही समीकरणे साकारतील. निवडणुकीत काही अपक्षांनीही आव्हान निर्माण केल्याचे दिसले. मराठा आरक्षण, छिंदम हे मुद्दे प्रचारात दिसले नाहीत. छिंदमला असलेला विरोध मावळला. कारण त्यामागे मतांची गणिते होती. मतदार काय करतात? हे उद्या ठरेल.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका