शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अहमदनगरवर झेंडा कुणाचा?

By सुधीर लंके | Updated: December 8, 2018 11:21 IST

ठरलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आणि आश्वासनांची खैरात करत महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांनी विकासाचे गाजर दाखविले.

सुधीर लंकेठरलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आणि आश्वासनांची खैरात करत महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांनी विकासाचे गाजर दाखविले. मात्र, मतदारांचा विश्वास संपादन करण्यात कुठलाही एक पक्ष यशस्वी ठरला, असे दिसत नाही. प्रचारात कुणाची अशी लाट दिसली नाही.नगर महापालिकेत गत अडीच वर्षे सेना-भाजपची सत्ता होती. मात्र, या काळात आम्हाला शहराचा विकास करता आला नाही, अशी जाहीर कबुली या दोन्ही पक्षांनी स्वत:च प्रचारात दिली. अर्थात त्याबाबतचे दोष त्यांनी एकमेकांकडे ढकलले. राज्यात भाजपकडे महत्त्वाची खाती असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक पालिकेचा निधी अडविला असा सेनेचा आरोप होता, तर आम्ही निधी दिला पण यांनीच खाली कामे केली नाही, असे भाजप म्हणाला. जेव्हा एकमेकांवर आरोप करण्यास वाव शिल्लक राहिला नाही, तेव्हा या दोन्ही पक्षांनी शहराच्या मागासलेपणाचे खापर पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर फोडले. अशी केवळ मडकी फोडाफोडी झाली.शिवसेनेने पुन्हा एकदा नगरच्या भयमुक्तीचा नारा दिला. आता त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही धावून आले. ‘मीच शहर भयमुक्त करु शकतो’ अशी नवीच घोषणा त्यांनी केली. या शहरात सेनेचीच दहशत असून त्यांनाही आत करु शकतो, असा दमही त्यांनी दिला. मी धमकी देत नाही, असे ते म्हणाले खरे, पण अप्रत्यक्षरित्या ही धमकीच होती. अर्थात केडगावमध्ये काँग्रेसचे उमेदवार व कोतकर समर्थक एका रात्रीत भाजपात कसे आले? (त्यासाठी कुणाला धमकावले?) खुनाच्या गुन्ह्यात दोषी असलेले कोतकर व मोदी यांची छायाचित्रे सोबत कशी? या सेनेच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कर मौन पाळले. याबाबत जाहीर खुलासा करायला ते घाबरले. भाजपच्या बहुतांश मंत्र्यांची भाषणे ही नगरच्या प्रश्नांपेक्षा राज्य व केंद्राच्या कामगिरीबाबत होती.भाजपने केंद्र व राज्याच्या निवडणुकीसारखाच ‘कार्पोरेट’ स्टाईलने ‘श्रीमंत’ प्रचार केला. मुंबईच्या वेगवेगळ्या ‘टीम’ त्यांनी तैनात केल्या होत्या. सर्व्हे घ्यायचे व रणनिती ठरवायची असा धडाका होता. मुख्यमंत्र्यांची काही विशेष खासगी पथकेच शहरात तळ ठोकून होती म्हणतात. त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना केवळ सूचना पाळण्यास सांगितले. निर्णयप्रक्रिया बहुतांश मुंबईकरांच्या ताब्यात होती. नगरच्या तरुणांना रोजगाराची साधने नाहीत. मात्र, निवडणुकीने सर्वेक्षण एजन्सीजला भरपूर रोजगार दिला. सेनेचा सर्व प्रचार अनिल राठोड यांच्यावर अवलंबून होता. भाजपच्या तुलनेत त्यांनी एकट्याने किल्ला लढविला. सेनेचे नितीन बानगुडे व नीलम गोºहे वगळता कुणीही प्रचारात आले नाहीत. असे का? हे समजले नाही. राष्टÑवादीत तर अघोषित शांतता दिसली. कुणावरच आरोप करायचे व बोलायचे नाही. स्थानिक पातळीवर घरोघर जाऊन प्रचार करायचा, असे बहुधा आमदार जगताप पिता-पुत्रांनी ठरविले होते. त्यांची भिस्त ही सभा व शक्तिप्रदर्शनापेक्षा स्थानिक उमेदवारांच्या ताकदीवर दिसली. राष्टÑवादीने केवळ धनंजय मुंडे यांची सभा घेतली. दिलीप वळसे व राष्टÑवादीचे इतर नेते प्रचारात फिरकले नाहीत. लोकसभा जवळ आल्याने राष्टÑवादीने या निवडणुकीत तयारीनिशी उतरणे अभिप्रेत होते. मात्र, त्यांच्यात प्रचंड सामसूम जाणवली. त्यामुळे हा पक्ष लोकसभा लढेल की नाही? अशीही शंका निर्माण झाली. जगताप यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने सरकारच्या दबावामुळे त्यांनी प्रचारात मवाळ भूमिका घेतली, अशीही चर्चा सुरु आहे. जगताप यावेळी केडगावात प्रचाराला फिरकलेच नाहीत. तेथील कोतकर समर्थकांचा भाजप प्रवेश व केडगाव हत्याकांड अशी दोन्ही कारणे त्या पाठीमागे असावीत. केडगावात भाजपची गत पोटनिवडणुकीत अनामत जप्त झाली. तेथे झेंडा रोवायचा असेल तर कोतकरांशिवाय पर्याय नाही, असे भाजपलाही वाटले. म्हणून भाजपने कर्डिले यांच्यावर बहुधा ही पक्षप्रवेशाची विशेष मोहीम सोपवली होती. कर्डिले यांनाही पक्षाचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. या सोयरिकीमुळेही जगताप तिकडे गेले नाही, असाही एक सूर आहे. जगतापांनी रेल्वे पुलाच्या पलीकडे व कर्डिले यांनी अलीकडे यायचे नाही, असे बहुधा ठरलेले असावे. हत्यांकाडाचे सेनेने राजकारण केल्याने सेनेला केडगावात व शहरात भाजपच्या माध्यमातून रोखणे हाही अजेंडा यात असू शकतो.काँग्रेसकडून या निवडणुकीत फारशा अपेक्षा नव्हत्या. कारण त्यांचे संघटन शहरात खिळखिळे झाले आहे. सुजय विखे यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर त्यांनी ताकद लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना शहरात अद्याप फारसा रसच नाही. ‘आधी लगीन लोकसभेचे, नंतर काय ते बाकीचे’ असे त्यांचे सरळ धोरण आहे. तरीही या निवडणुकीत त्यांनी अल्पसा प्रयत्न केला. विखे-थोरात एक दिसले. मनसे, भाकप, आप, रिपाइं, रासप, सपा, भारिप हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, ते बोटावर मोजण्याइतक्याच जागांवर लढत आहेत. या निवडणुकीत मतदार गोंधळात आहेत. कारण, एका प्रभागात चार उमेदवार असल्याने कोणत्या पक्षातून कोण लढतेय हे समजत नाही. दुसरी बाब म्हणजे मतदारांचा पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे कुठलाही एक पक्ष सत्तेत येईल, असे दिसत नाही. निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था राहू शकते. अशावेळी काहीही समीकरणे साकारतील. निवडणुकीत काही अपक्षांनीही आव्हान निर्माण केल्याचे दिसले. मराठा आरक्षण, छिंदम हे मुद्दे प्रचारात दिसले नाहीत. छिंदमला असलेला विरोध मावळला. कारण त्यामागे मतांची गणिते होती. मतदार काय करतात? हे उद्या ठरेल.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका