शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

पावसामुळे जिल्ह्यात ४७५ कोटींचे नुकसान; मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:37 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतकºयांना याचा फटका बसला आहे.

अहमदनगर : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतक-यांना याचा फटका बसला आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क््यांपेक्षा जास्त आहे. जिरायत, बायागत पिकांसह फळपिकांचा यात समावेश आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ८०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे तुडूंब भरली असून शेतक-यांच्या शेतातील पाणी पंधरा दिवसांपासून साचल्याने सर्वच खरीप व काही रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिके व फळपिकांच्या नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.  कृषी विभाग व महसूल विभागाने गेल्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले. एकूण ४ लाख ५४ हजार १२ हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात २१ लाख ६५ हजार हेक्टर जिरायत, २२ लाख ११ हजार हेक्टर बागायत, तसेच १६ हजार २२६  हेक्टरवर फळपिक क्षेत्राचा समावेश आहे. यात सर्वाधिक फटका पाथर्डी (६१ हजार ७८१ हेक्टर) व शेवगावमध्ये (५९ हजार ७०५) बसला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा कृषी कार्यालयाच्या सहीनंतर ४७५ कोटी रूपये नुकसानीचा हा अहवाल कृषी आयुक्त व तेथून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. नवीन सरकार केव्हा स्थापन होईल, हे निश्चित नाही. अशा स्थितीत शेतक-यांना ही नुकसान भरपाई कधी मिळते, याकडे शेतक-यांचे डोळे लागले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार नुकसानीचा आढावा (तालुका-शेतकरी संख्या-क्षेत्र)नगर-३४९२२-२१७३१, पारनेर-४०९२४-२२२१६, पाथर्डी -८३३३५-६१७८१, कर्जत-३६१४०-२६७५३, श्रीगोंदा-४७३७० -३१६४८, जामखेड-१११२४-५२१५, श्रीरामपूर-३१८०६-२९४७२, राहुरी -४२३९४-३०९८२, नेवासा-५६१०३ -४५२२२, शेवगाव ७३७७८-५९७०५, संगमनेर-६०३१६-३७१९८, अकोले-५९०५५-२८३९९, कोपरगाव-४००२२ -३२३२६,राहाता-१८७७७ -२१३५८. असे एकूण ६३६१४६ शेतक-यांच्या ४५४०१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी