शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पावसामुळे जिल्ह्यात ४७५ कोटींचे नुकसान; मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:37 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतकºयांना याचा फटका बसला आहे.

अहमदनगर : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतक-यांना याचा फटका बसला आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क््यांपेक्षा जास्त आहे. जिरायत, बायागत पिकांसह फळपिकांचा यात समावेश आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ८०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे तुडूंब भरली असून शेतक-यांच्या शेतातील पाणी पंधरा दिवसांपासून साचल्याने सर्वच खरीप व काही रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिके व फळपिकांच्या नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.  कृषी विभाग व महसूल विभागाने गेल्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले. एकूण ४ लाख ५४ हजार १२ हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात २१ लाख ६५ हजार हेक्टर जिरायत, २२ लाख ११ हजार हेक्टर बागायत, तसेच १६ हजार २२६  हेक्टरवर फळपिक क्षेत्राचा समावेश आहे. यात सर्वाधिक फटका पाथर्डी (६१ हजार ७८१ हेक्टर) व शेवगावमध्ये (५९ हजार ७०५) बसला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा कृषी कार्यालयाच्या सहीनंतर ४७५ कोटी रूपये नुकसानीचा हा अहवाल कृषी आयुक्त व तेथून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. नवीन सरकार केव्हा स्थापन होईल, हे निश्चित नाही. अशा स्थितीत शेतक-यांना ही नुकसान भरपाई कधी मिळते, याकडे शेतक-यांचे डोळे लागले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार नुकसानीचा आढावा (तालुका-शेतकरी संख्या-क्षेत्र)नगर-३४९२२-२१७३१, पारनेर-४०९२४-२२२१६, पाथर्डी -८३३३५-६१७८१, कर्जत-३६१४०-२६७५३, श्रीगोंदा-४७३७० -३१६४८, जामखेड-१११२४-५२१५, श्रीरामपूर-३१८०६-२९४७२, राहुरी -४२३९४-३०९८२, नेवासा-५६१०३ -४५२२२, शेवगाव ७३७७८-५९७०५, संगमनेर-६०३१६-३७१९८, अकोले-५९०५५-२८३९९, कोपरगाव-४००२२ -३२३२६,राहाता-१८७७७ -२१३५८. असे एकूण ६३६१४६ शेतक-यांच्या ४५४०१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी