शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

गारपीटग्रस्तांसाठी १०४ कोटी वर्ग

By admin | Updated: March 26, 2024 14:44 IST

अहमदनगर : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. त्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे.

अहमदनगर : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. त्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. यापूर्वी दोन टप्प्यात ४७ कोटी मदत दिल्यानंतर तिसर्‍या टप्प्यात १०४ कोटी १२ लाख ८३ हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. जिल्ह्यासाठी १५१ कोटी १२ लाख ८३ हजार रूपये मंजूर केले होते. त्यातील ४७ कोटी रूपये यापूर्वीच आले होते. ते तालुकानिहाय शेतकर्‍यांना वाटपही झाले आहेत. फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील तब्बल २ लाख २० हजार ९६४ शेतकर्‍यांच्या पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले होते. १ लाख ३३ हजार ३७४ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीच्या निकषामुळे ४० हजार ६६५ हेक्टरवरील क्षेत्रासाठी कोणतीच मदत मिळाली नाही. तालुकानिहाय वाटप केलेली रक्कम (आकडे लाखात) नगर- २०३.५०, नेवासा- १३०८.५०, पाथर्डी - २०६, शेवगाव - ९३०, श्रीगोंदा ३१९, पारनेर १२२०, कर्जत - ८८९, जामखेड १०१, अकोले - ३६३, संगमनेर - १०७२, कोपरगाव - ११८७, राहाता - ६६२, श्रीरामपूर - ४१७, राहुरी - १२३६.३० रक्कम वर्ग करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांनी बँक खाते क्रमांक तलाठ्यांकडे दिलेला नाही. त्यांनी तो त्वरित द्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी केले.(प्रतिनिधी)