शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सकारात्मक... अहमदनगरात शाळा सुरू होऊन १०० दिवस; तरी एकही विद्यार्थी आढळला नाही पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 05:37 IST

गावकऱ्यांनी एकत्र मिळून काळजी घेतल्यानं ही किमया साधली आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी एकत्र मिळून काळजी घेतल्यानं ही किमया साधली आहे.

अहमदनगर : शाळा... मुलांसाठी जणू आनंदाचा ठेवा... मित्रांच्या भेटी... डबे खाण्याचा आनंद... मैदानावरच्या खोड्या आणि मौजमजा... पण कोरोनामुळे मुलांचा हा आनंद गेल्या दीड वर्षांपासून हिरावून घेतला आहे. परंतु, एक शाळा यास अपवाद ठरली आहे. कोरोनाकाळातही हिवरेबाजारच्या शाळेने एक-दोन नव्हे तर तब्बल १०० दिवस पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे योग्य ती काळजी घेतल्याने कोणालाही संसर्ग झालेला नाही. गावकऱ्यांनी ही किमया साधली आहे.

हिवरेबाजारचे ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्र येत स्व-जबाबदारीवर १५ जूनलाच इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू केले होते. शासनाची परवानगी नसताना पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभेने हा निर्णय घेतला. शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांचा मेळावा झाला. मुलांच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. मुलांनी आपले अनुभव निबंध व कवितांमधून शब्दबद्ध केले. अनेकांनी चित्रे काढली.

हिवरेबाजारने अशी घेतली काळजी१. मुले वर्गात येण्याअगोदर तापमान तपासले जाते आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात. २. मुलांनी शाळा आणि घरांव्यतिरिक्त कुठेही जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. ३. घरातील व्यक्ती आजारी असल्यास अथवा मुलाला थंडी-ताप जाणवल्यास शाळेत न येण्याची सूचना केली जाते.

सर्व नियमांचे काटेकोरपणे पालनविद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी एकजूट दाखवली, त्यामुळेच आम्ही शाळा भरवू शकलो. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावाने हे धाडस केले. सर्व नियम पाळल्याने कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही.पोपटराव पवार, राज्य कार्याध्यक्ष, आदर्श गाव समिती

कोरोनाशी लढायला शिकलोघरी राहून आम्ही कंटाळलो होतो. मोबाइलवर ऑनलाइन वर्गात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे आमच्या शिक्षक व गावाने जो शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याचा आनंद झाला. या १०० दिवसांत आम्ही कोरोनाशी कसे लढायचे, ते शिकलो.तेजस खोडदे, विद्यार्थी

तज्ज्ञ काय म्हणतात....शाळांमध्ये संसर्गाची शक्यता कमी

  • शालेय विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केले आहे. 
  • लहान मुलांमध्ये प्रौढ व्यक्तींइतक्याच अँटिबॉडीज निर्माण झाल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या चौथ्या सिरो सर्वेक्षणात आढळून आले होते. हे लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, स्वच्छता राखून शाळा पुन्हा सुरू करायला हरकत नाही, असे स्वामीनाथन म्हणाल्या.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीAhmednagarअहमदनगर