शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

लोक टीका का करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 04:53 IST

एखादी गोष्ट स्वीकारणे आणि काही नवीन निर्माण करण्यापेक्षा टीका करणे आणि नाकारणे नेहेमीच अधिक हुशारीचे भासण्याचा कल निर्माण झालेला आहे.

- सदगुरू जग्गी वासुदेवएखादी गोष्ट स्वीकारणे आणि काही नवीन निर्माण करण्यापेक्षा टीका करणे आणि नाकारणे नेहेमीच अधिक हुशारीचे भासण्याचा कल निर्माण झालेला आहे. विरोधक नेहेमीच अधिक हुशार वाटतात; कारण ते केवळ टीकाच करतात, ते इतर काहीही करीत नसतात. काहीतरी निर्माण करणाऱ्या व्यक्ती बुद्धिमान भासत नाहीत; कारण जेव्हा तुम्ही काही निर्माण करीत असता, तेव्हा तुम्ही अनेक चुका करीत असता. काही गोष्टी बरोबर होतात, काही चुकीच्या होतात. लोकांनी टीका केली तर काही हरकत नाही, पण काही व्यक्ती निर्लज्जपणे प्रत्येक गोष्टीवर टीका करीत राहतात. कोणतीही गोष्ट नष्ट करणे हे काहीतरी निर्माण करण्यापेक्षा नेहेमीच अधिक शक्तिशाली वाटते.जर मी तुमची देखभाल करून तुम्हाला वाढवले तर त्यात नाट्यमय असे काही नाही. पण मी जर १० जणांसमोर तुम्हाला खाली लोळवले तर ते नक्कीच नाट्यमय दिसेल. म्हणून चित्रपटांत एखाद्याला लोळवणे हे नेहेमीच नाट्यमय करून दाखविले जाते. कोणालातरी खाली लोळविल्याशिवाय चित्रपट बनूच शकत नाही. कारण तसे करणे परिणामकारक असते. टीका करण्याबद्दलसुद्धा असेच आहे. टीका करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला खाली लोळविण्यासारखेच आहे. सकारात्मक दृष्टिकोनापेक्षा एखाद्याने घेतलेला नकारात्मक दृष्टिकोनच अधिक हुशारीचा भासतो. त्यामागे काहीतरी कारणमीमांसा असते, पण ते एक अपरिपक्व कारण असते.जेव्हा तुमची कारणमीमांसा अपरिपक्व असते, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट नाकारू शकता. जेव्हा तुमची कारणमीमांसा परिपक्व होते, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करायला शिकता. कारण तुम्हाला जीवनाची प्रक्रिया समजते. तुम्ही केवळ तार्किकदृष्ट्या विचार करीत नाही, तर अस्तित्वाच्या विवेकाच्या आधाराने विचार करता. तुमच्यामध्ये केवळ तार्किक जाणच नव्हे, तर जीवनाचीही अधिक जाण आलेली असते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक