शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

‘अहं ब्रह्मास्मि’ भावना आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 8:54 AM

ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरुपी समुद्रात आपली बुद्धी स्थिर करून घ्यायची असेल त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. अहं ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ही जाणीव करून घ्यायची असेल तर मनरुपी गंगेत स्नान केले पाहिजे.

ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरुपी समुद्रात आपली बुद्धी स्थिर करून घ्यायची असेल त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. अहं ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ही जाणीव करून घ्यायची असेल तर मनरुपी गंगेत स्नान केले पाहिजे. माझ्यातला ‘मी’च ब्रह्म होऊ शकतो. यासाठी मनाची स्थिती ब्रह्मरूप व्हावी लागते. संपूर्ण विश्व परब्रह्माचे स्वरूप आहे हा अनुभव घेतला पाहिजे. स्वप्रकाशाने सर्वांना व्यापणे ही त्याची अनुभूती असते. कारण आत्मानुभवरूपी पंखाने चिदाकाशात हवा संचार करणारा समर्थ का होऊ नये. त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ तितका आपणाला सुखाने संचार करायला हवा तसा विस्तार होऊ शकतो. सर्वांना माझे ज्ञान नाही कारण मी योगमायेने आच्छादित झालो आहे. म्हणूनच हे जग जन्मरहित व नाशरहित आहे असे लोक स्वत:ला समजू शकत नाहीत.

सहज विचार करून पाहिला तर ज्यामध्ये मी नाही असा एकही पदार्थ, वस्तू आहे का? मीच एक सगळ्या ठिकाणी व्यापून आहे हा विश्वास मनात ठेवणे म्हणजे त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे, त्या निराकार स्वरूपाला साकार का समजावे, कारण मी स्वत: सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरिता का साधने करावीत. ह्या सर्व विचारांचा गोंधळ मनात असतो. मन श्रद्धेने युक्त होऊन एखाद्या देवतेची आराधना करते आणि मग त्या देवतेपासून मी इच्छित फळ घेतो. ही त्या मनाची खात्री असते. म्हणून ते मन आपले कार्य सिद्ध होईपर्यंत त्याची आराधना सुरू ठेवते. त्यावेळेस देवतेप्रति त्याची श्रद्धा, विश्वास कायम असतो. ही अल्पबुद्धी मनुष्य करू शकतो. तो देवतांची भक्ती करून आपले इच्छित प्राप्त करतो. अशी त्याच्या मनाची धारणा होते. थोड्या वेळासाठी हे बाजूला राहुू दे, मग वाटेल का ते का दैवत असेना, परंतु जो त्या देवतेला भजतो तो त्या देवत्वास प्राप्त होतो. म्हणजे शरीराने, मनाने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहेत तो देह पडल्यावर मीच होतो. ही भावना असणे हीच ‘अहं ब्रह्मास्मि’ भावना आहे का? असे विचार आपल्या मनात कायम चालू असतात. सर्वात महत्त्वाची असते ती मनोधारणा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक