शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आत्मोद्धाराची वाट मोकळी करणारी वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 9:12 AM

आपल्या इष्टदेवतेची त्यांनी कास धरलेली असते. सर्वांना समानतेने पाहणारा, सर्वांमध्ये विठ्ठलरूप बघणारा वारकरी दुस-यांच्या दु:खाने हळहळ व्यक्त करतो

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआता सध्या वारकऱ्यांना पंढरपूरचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात हा मोठा उत्सव आहे. ‘पंढरपूरची वारी’ हा अनेक पिढ्यांचा ठेवा आहे. न चुकता दरवर्षी वारी करणारी अनेक घराणी आहेत. वारकऱ्यांचा मूळ स्वभाव सात्त्विक होय. कारण वारी सात्त्विकतेतून येते. वारक-यांचे ‘मन’ निर्मळ असते. आपल्या मनाच्या भावछटा वारकरी वारीत व्यक्त करतो. प्राचीन काळापासून वारकरी एकनिष्ठेने राहातो. वारक-यांचे मन अढळ असते. आपल्या ध्येयासाठी तो जागृत असतो. स्व-तत्त्वाची त्याला जाणीव असते.

आपल्या इष्टदेवतेची त्यांनी कास धरलेली असते. सर्वांना समानतेने पाहणारा, सर्वांमध्ये विठ्ठलरूप बघणारा वारकरी दुस-यांच्या दु:खाने हळहळ व्यक्त करतो. दुस-याच्या सुखात आनंदाने सहभागी होणारा, छल-कपट न करणारा, वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात रमतो. मिळेल तेथे निवारा शोधणारा, पंढरीचा आवडता असणारा वारकरी जगण्याचे भान आणून देत असतो. वारक-यांचे मन पवित्र असते. चिखल, पाऊस, वारा याची तमा न बाळगता तो आनंदाने माउलींसोबत चालतो. माउलींंवर विश्वास ठेवून जगत असतो.

कर्तृत्वाची मशागत करत असतो. प्रेमाची शिदोरी वाटत असतो. अंतर्बाह्य एका विठ्ठलाला शोधत असतो. वारक-यांच्या मनाची स्थिती, लय, गती विठ्ठल होऊन जाते. जगत्रूप विठ्ठलरूप आहे, असे समजून चालतो तो वारकरी. समानतेची बीजतत्त्वे वारीत सापडतात. धर्माची परिभाषा वारीत कळते. आत्मोद्धाराची वाट मोकळी होते. कर्म-धर्माची शिकवण वारीत मिळते. वारक-यांचे भांडवल म्हणजे प्राणिमात्रावर दया करणे. समाजाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणे होय.

पाखंडी लोकांचे खंडण करणे. कर्मकांडाला छेद देणे, भागवत धर्माचा विस्तार करणे, हे वारकरी सातत्याने करत असतो. प्राचीन काळापासून-आधुनिक काळापर्यंत वारकरी तग धरत आहे. अनेक शासक आले तरी वारकरी मात्र डगमगला नाही. अढळपणे आपले कार्य करीत राहिला. वारक-यांचे मन कणखर असते. दया, धर्म, नीती, अहिंसा या मूल्यांचा तो पुरस्कर्ता आहे. सातत्य त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य असते. मनाची स्थिरता कशी करावी वारक-यांकडून शिकावे. वारक-यांचे मन अथांग सागरासारखे असते. अखंडितपणे मनाला सावरणारे असते. मनाचे मनपण वारीत कळते.(लेखक हे संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीspiritualअध्यात्मिक