शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जीवनाचे खरे सार यातच..!

By appasaheb.patil | Published: December 07, 2019 12:14 PM

जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात.

भगवान श्रीकृष्ण आपल्या परमभक्तावर अत्यंत प्रसन्न झाले होते म्हणून तर भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अजुर्नाची विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण केली होती. अजुर्नाला भगवंतांचे चतुर्भुज दर्शन झाले ते केवळ भगवंतांवरील अतूट भक्तीमुळेच. प्रापंचिक वृत्तीला पूर्णपणे छेद केल्यावर, हवे-नकोचा खेळ संपल्यावर, निष्काम बुद्धीने कर्म करण्याची प्रवृत्ती वाढल्यावर, भक्तीमयी आयुष्याची खरी सुरुवात होते. जीवनाचे खरे सार यातच आहे.

जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात. आजचा दिवस हा जवळ-जवळ कालचाच दिवस असतो. आजचा दिवस माणसे आज जगतच नाहीत. ते जगतात शिळा झालेला, निघून गेलेला, भूतकाळात गेलेला कालचा दिवस. त्यामुळे त्यांना जीवनात आणि जगण्यात काही रसच राहात नाही. सर्वकाही निरस होऊन जातं. रोज रोज तेच ते. तोच दिनक्रम, तीच माणसे, तोच रस्ता, तेच काम, तेच जेवण, तेच घर, तेच आॅफिस, तीच नोकरी किंवा तोच धंदा, तीच गिºहाईके, त्यांच्याशी तेच ते बोलणे, जीवनाचा एक साचा होऊन गेलेला असतो. माणूस घाण्याच्या बैलाप्रमाणे त्याच त्या रिंगणातून फिरत असतो. त्याला जीवन जगताच येत नाही. जीवनात प्रत्येक क्षण आनंदोत्सव बनवता येत नाही. जीवन हे खळाळत्या ओसंडून वाहाणा?्या वाहात्या झºयाप्रमाणे आहे. ते नाविन्याने ओथंबलेले आहे. रसरसलेले आहे. मात्र माणसाला त्यातील मजा घेता येत नाही. त्यामुळे ते नको तिकडे मजा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळे सण-समारंभ साजरे करतात. अधे-मधे ट्रीप काढतात. मोठ्या दणक्यात कार्यक्रम साजरे करतात. काहीतरी निमित्त शोधतात आणि कार्यक्रम घेतात. असे कार्यक्रम घेण्यामागचे मानसशास्त्र असे आहे की, या मंडळींना जीवनातील जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. तो दुसरीकडे आनंद शोधीत फिरतात. कार्यक्रम असेल किंवा सण-समारंभ असेल. तो आनंदासाठीच निर्माण केलेला असतो. मात्र दुर्दैव असे की असे कार्यक्रम करून येणारे लोक दमून जातात. नंतर ते थकतात. कारण त्यातही त्यांना जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. आनंदानुभूती घेतल्यानंतर दमून जाणे किंवा थकून जाणे असे होता कामा नये, आनंदाने माणूस थकत नाही. तो अधिक उत्साही बनतो. अधिक कार्यक्षम बनतो. पण या मंडळींना त्यातही आनंद मिळत नाही. तो केवळ आनंदाभास असतो.- साईनाथ महाराज स्वामी,शेळगी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक