शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

आकाशी झेप घे रे पाखरा ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 15:35 IST

श्रवणाने माणसाच्या चित्तवृत्ती शांत आणि संथ होतात आणि तो भगवद् चिंतनात मग्न होतो हीच खरी श्रवणाची फलश्रुती होय..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

श्रवण कां हवे..? तर वासनेतून मुक्ती, विचारांतून मुक्ती, विषयांतून मुक्ती यासाठी.. श्रवणाने आपल्याला परमेश्वराच्या अस्तित्वाचा प्रत्यय नक्कीच येतो पण जोपर्यंत आपण स्वतःला विसरुन श्रवण करीत नाही तोपर्यंत हे घडत नाही. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

श्रवणद्वारे घेता शोध । मननकर्त्यास विशद परमार्थ होतो ॥

पण यासाठी आपल्या मनावर असणारा मायेचा पडदा दूर होण्याची गरज आहे. मग प्रश्न असा पडतो की, माया खोटी आहे का..? ती खोटी नाही पण दिसण्यापुरती किंवा भासमान सत्य आहे.

एकदा आकाशमार्गाने राजहंसांचा थवा जात होता. पौर्णिमेचं टिपूर चांदणं. एका जलाशयांत पडलेलं चांदण्यांचं प्रतिबिंब राजहंसांनी बघितलं आणि त्यांना त्या चांदण्या मोत्यांसारख्या भासल्या. त्यांनी झेप घेतली आणि टाकलेल्या जाळ्यात ते अडकले. मोती नसताना ते अडकले. मोती नसताना ते भासले. म्हणजे नसेलेलं ते दिसणं म्हणजे माया. मग ते प्रतिबिंब खोटं होतं का..? नाही..! चांदण्यांचा रुपाचा तो आविष्कार होता. दिसण्यापुरतं सत्य होतं म्हणून हंस अडकले. तसा जीव सुख नसलेल्या विषयजाळ्यात अडकतो. भगवान म्हणतात -

मम माया दुरत्यया ।

तरीही जर मानवाने निर्विकल्पाच्या शोधासाठी झेप घेतली तर तो तिथपर्यंत पोचतो म्हणून कवी म्हणतात -

आकाशी झेप घे रे पाखरा । सोडी सोन्याचा पिंजरा ॥

सोन्याचा असला तरी तो शेवटी पिंजराच आहे. तू नित्यमुक्त अशा ईश्वराचा अंश आहेस, बंधनात अडकू नकोस. यासाठी मनांतून श्रवण केलं की, विषयांचे बंध हळूहळू सुटतात, मृत्यूचं भय संपतं आणि लक्षात येतं की -

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -जैसे जीर्णवस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्य नाथे ॥

अथवा श्रीमद् भगवद् गीता सांगते -

वासांसि जीर्णानि यथाविहाय । नवानि गृण्हाति नरोपराणि ।तथा शरीराणि विहाय जीर्णान । अन्यानि संयाति नवानि देही ॥

किंवा श्री समर्थ रामदास स्वामी मनोबोधात म्हणतात की -

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।अकस्मात तो ही पुढे जात आहे ।म्हणोनि कुडी वासना सांडि वेगी ।बळे लागला काळ हा पाठिलागी ॥

देहाविषयी अनासक्ती निर्माण होण्यासाठी श्रवणाची गरज आहे. विकारांची वस्रं गळून पडल्यानंतर केलेलं श्रवणंच फक्त भगवंताला आवडतं. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

भगवंतास जयाचि प्रीति । आपण वर्तावे तेणेचि रीती ।मग सख्यत्व घडे नेमस्ती । भगवंतासी ॥

म्हणून -विकाराचे विटाळ टाळून जे टाळ वाजवले जातात तेच टाळ विटेवरल्या विठ्ठलाला आवडतात आणि असे टाळ वाजवणाराची तो विठ्ठल जन्म - मरणांतून टाळाटाळ करतो..!श्रवण हे स्वतःच्या उद्धारासाठी आहे.दोन संन्यासी रस्त्याने जात असतात. संध्याकाळचीवेळ झालेली असते. अंधार पसरत होता आणि नदी पार करून पलीकडे जायचं होतं. संन्यासी नदीत प्रवेश करणार एवढ्यात एक तरुण स्त्री त्यांच्यापाशी आली आणि म्हणाली, मलाही नदीच्या पैलतीराला जायचंय पण पाण्याची भीती वाटते, पोहताही येत नाही. तुम्ही मला पैलतीरी पोचवाल कां.? एक संन्यासी काही न बोलता पुढे निघाला पण जो दुसरा संन्यासी होता त्याने एक क्षण विचार केला की, सभोवती किर्रऽऽ जंगल आहे आणि अंधार पडतोय अशावेळी या स्त्री ला एकटं टाकणं हा धर्म नाही. त्याने झटकन त्या स्त्री ला आपल्या पाठीशी घेतले आणि पैलतीरी सोडून दिले. तिने मनापासून त्याला धन्यवाद दिले पण काही अंतर चालून गेल्यावर आधी पैलतीरावर आलेला संन्यासी त्याला म्हणाला, तुला संन्यासधर्म माहित नाही. स्त्री शी बोलणं सुद्धा आपल्याला वर्ज्य आहे आणि तू तिला पाठीशी घेऊन आलास. तो संन्यासी म्हणाला, मी तर तिला कधीचीच पैलतीरी सोडली पण तू मात्र अजून मनांत घेऊन चालतो आहेस. खरं सांगू का तुला.. मला त्या स्त्री च्या जागी स्त्री न दिसता त्या परमेश्वराचंरुप दिसत होतं जे मी आजपर्यंत श्रवण केलेलं आहे..!म्हणजे काय तर श्रवणाने माणसाच्या चित्तवृत्ती शांत आणि संथ होतात आणि तो भगवद् चिंतनात मग्न होतो हीच खरी श्रवणाची फलश्रुती होय..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक