शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

आकाशी झेप घे रे पाखरा ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 15:35 IST

श्रवणाने माणसाच्या चित्तवृत्ती शांत आणि संथ होतात आणि तो भगवद् चिंतनात मग्न होतो हीच खरी श्रवणाची फलश्रुती होय..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

श्रवण कां हवे..? तर वासनेतून मुक्ती, विचारांतून मुक्ती, विषयांतून मुक्ती यासाठी.. श्रवणाने आपल्याला परमेश्वराच्या अस्तित्वाचा प्रत्यय नक्कीच येतो पण जोपर्यंत आपण स्वतःला विसरुन श्रवण करीत नाही तोपर्यंत हे घडत नाही. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

श्रवणद्वारे घेता शोध । मननकर्त्यास विशद परमार्थ होतो ॥

पण यासाठी आपल्या मनावर असणारा मायेचा पडदा दूर होण्याची गरज आहे. मग प्रश्न असा पडतो की, माया खोटी आहे का..? ती खोटी नाही पण दिसण्यापुरती किंवा भासमान सत्य आहे.

एकदा आकाशमार्गाने राजहंसांचा थवा जात होता. पौर्णिमेचं टिपूर चांदणं. एका जलाशयांत पडलेलं चांदण्यांचं प्रतिबिंब राजहंसांनी बघितलं आणि त्यांना त्या चांदण्या मोत्यांसारख्या भासल्या. त्यांनी झेप घेतली आणि टाकलेल्या जाळ्यात ते अडकले. मोती नसताना ते अडकले. मोती नसताना ते भासले. म्हणजे नसेलेलं ते दिसणं म्हणजे माया. मग ते प्रतिबिंब खोटं होतं का..? नाही..! चांदण्यांचा रुपाचा तो आविष्कार होता. दिसण्यापुरतं सत्य होतं म्हणून हंस अडकले. तसा जीव सुख नसलेल्या विषयजाळ्यात अडकतो. भगवान म्हणतात -

मम माया दुरत्यया ।

तरीही जर मानवाने निर्विकल्पाच्या शोधासाठी झेप घेतली तर तो तिथपर्यंत पोचतो म्हणून कवी म्हणतात -

आकाशी झेप घे रे पाखरा । सोडी सोन्याचा पिंजरा ॥

सोन्याचा असला तरी तो शेवटी पिंजराच आहे. तू नित्यमुक्त अशा ईश्वराचा अंश आहेस, बंधनात अडकू नकोस. यासाठी मनांतून श्रवण केलं की, विषयांचे बंध हळूहळू सुटतात, मृत्यूचं भय संपतं आणि लक्षात येतं की -

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -जैसे जीर्णवस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्य नाथे ॥

अथवा श्रीमद् भगवद् गीता सांगते -

वासांसि जीर्णानि यथाविहाय । नवानि गृण्हाति नरोपराणि ।तथा शरीराणि विहाय जीर्णान । अन्यानि संयाति नवानि देही ॥

किंवा श्री समर्थ रामदास स्वामी मनोबोधात म्हणतात की -

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।अकस्मात तो ही पुढे जात आहे ।म्हणोनि कुडी वासना सांडि वेगी ।बळे लागला काळ हा पाठिलागी ॥

देहाविषयी अनासक्ती निर्माण होण्यासाठी श्रवणाची गरज आहे. विकारांची वस्रं गळून पडल्यानंतर केलेलं श्रवणंच फक्त भगवंताला आवडतं. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

भगवंतास जयाचि प्रीति । आपण वर्तावे तेणेचि रीती ।मग सख्यत्व घडे नेमस्ती । भगवंतासी ॥

म्हणून -विकाराचे विटाळ टाळून जे टाळ वाजवले जातात तेच टाळ विटेवरल्या विठ्ठलाला आवडतात आणि असे टाळ वाजवणाराची तो विठ्ठल जन्म - मरणांतून टाळाटाळ करतो..!श्रवण हे स्वतःच्या उद्धारासाठी आहे.दोन संन्यासी रस्त्याने जात असतात. संध्याकाळचीवेळ झालेली असते. अंधार पसरत होता आणि नदी पार करून पलीकडे जायचं होतं. संन्यासी नदीत प्रवेश करणार एवढ्यात एक तरुण स्त्री त्यांच्यापाशी आली आणि म्हणाली, मलाही नदीच्या पैलतीराला जायचंय पण पाण्याची भीती वाटते, पोहताही येत नाही. तुम्ही मला पैलतीरी पोचवाल कां.? एक संन्यासी काही न बोलता पुढे निघाला पण जो दुसरा संन्यासी होता त्याने एक क्षण विचार केला की, सभोवती किर्रऽऽ जंगल आहे आणि अंधार पडतोय अशावेळी या स्त्री ला एकटं टाकणं हा धर्म नाही. त्याने झटकन त्या स्त्री ला आपल्या पाठीशी घेतले आणि पैलतीरी सोडून दिले. तिने मनापासून त्याला धन्यवाद दिले पण काही अंतर चालून गेल्यावर आधी पैलतीरावर आलेला संन्यासी त्याला म्हणाला, तुला संन्यासधर्म माहित नाही. स्त्री शी बोलणं सुद्धा आपल्याला वर्ज्य आहे आणि तू तिला पाठीशी घेऊन आलास. तो संन्यासी म्हणाला, मी तर तिला कधीचीच पैलतीरी सोडली पण तू मात्र अजून मनांत घेऊन चालतो आहेस. खरं सांगू का तुला.. मला त्या स्त्री च्या जागी स्त्री न दिसता त्या परमेश्वराचंरुप दिसत होतं जे मी आजपर्यंत श्रवण केलेलं आहे..!म्हणजे काय तर श्रवणाने माणसाच्या चित्तवृत्ती शांत आणि संथ होतात आणि तो भगवद् चिंतनात मग्न होतो हीच खरी श्रवणाची फलश्रुती होय..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक