शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

आकाशी झेप घे रे पाखरा ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 15:35 IST

श्रवणाने माणसाच्या चित्तवृत्ती शांत आणि संथ होतात आणि तो भगवद् चिंतनात मग्न होतो हीच खरी श्रवणाची फलश्रुती होय..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

श्रवण कां हवे..? तर वासनेतून मुक्ती, विचारांतून मुक्ती, विषयांतून मुक्ती यासाठी.. श्रवणाने आपल्याला परमेश्वराच्या अस्तित्वाचा प्रत्यय नक्कीच येतो पण जोपर्यंत आपण स्वतःला विसरुन श्रवण करीत नाही तोपर्यंत हे घडत नाही. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

श्रवणद्वारे घेता शोध । मननकर्त्यास विशद परमार्थ होतो ॥

पण यासाठी आपल्या मनावर असणारा मायेचा पडदा दूर होण्याची गरज आहे. मग प्रश्न असा पडतो की, माया खोटी आहे का..? ती खोटी नाही पण दिसण्यापुरती किंवा भासमान सत्य आहे.

एकदा आकाशमार्गाने राजहंसांचा थवा जात होता. पौर्णिमेचं टिपूर चांदणं. एका जलाशयांत पडलेलं चांदण्यांचं प्रतिबिंब राजहंसांनी बघितलं आणि त्यांना त्या चांदण्या मोत्यांसारख्या भासल्या. त्यांनी झेप घेतली आणि टाकलेल्या जाळ्यात ते अडकले. मोती नसताना ते अडकले. मोती नसताना ते भासले. म्हणजे नसेलेलं ते दिसणं म्हणजे माया. मग ते प्रतिबिंब खोटं होतं का..? नाही..! चांदण्यांचा रुपाचा तो आविष्कार होता. दिसण्यापुरतं सत्य होतं म्हणून हंस अडकले. तसा जीव सुख नसलेल्या विषयजाळ्यात अडकतो. भगवान म्हणतात -

मम माया दुरत्यया ।

तरीही जर मानवाने निर्विकल्पाच्या शोधासाठी झेप घेतली तर तो तिथपर्यंत पोचतो म्हणून कवी म्हणतात -

आकाशी झेप घे रे पाखरा । सोडी सोन्याचा पिंजरा ॥

सोन्याचा असला तरी तो शेवटी पिंजराच आहे. तू नित्यमुक्त अशा ईश्वराचा अंश आहेस, बंधनात अडकू नकोस. यासाठी मनांतून श्रवण केलं की, विषयांचे बंध हळूहळू सुटतात, मृत्यूचं भय संपतं आणि लक्षात येतं की -

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -जैसे जीर्णवस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्य नाथे ॥

अथवा श्रीमद् भगवद् गीता सांगते -

वासांसि जीर्णानि यथाविहाय । नवानि गृण्हाति नरोपराणि ।तथा शरीराणि विहाय जीर्णान । अन्यानि संयाति नवानि देही ॥

किंवा श्री समर्थ रामदास स्वामी मनोबोधात म्हणतात की -

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।अकस्मात तो ही पुढे जात आहे ।म्हणोनि कुडी वासना सांडि वेगी ।बळे लागला काळ हा पाठिलागी ॥

देहाविषयी अनासक्ती निर्माण होण्यासाठी श्रवणाची गरज आहे. विकारांची वस्रं गळून पडल्यानंतर केलेलं श्रवणंच फक्त भगवंताला आवडतं. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

भगवंतास जयाचि प्रीति । आपण वर्तावे तेणेचि रीती ।मग सख्यत्व घडे नेमस्ती । भगवंतासी ॥

म्हणून -विकाराचे विटाळ टाळून जे टाळ वाजवले जातात तेच टाळ विटेवरल्या विठ्ठलाला आवडतात आणि असे टाळ वाजवणाराची तो विठ्ठल जन्म - मरणांतून टाळाटाळ करतो..!श्रवण हे स्वतःच्या उद्धारासाठी आहे.दोन संन्यासी रस्त्याने जात असतात. संध्याकाळचीवेळ झालेली असते. अंधार पसरत होता आणि नदी पार करून पलीकडे जायचं होतं. संन्यासी नदीत प्रवेश करणार एवढ्यात एक तरुण स्त्री त्यांच्यापाशी आली आणि म्हणाली, मलाही नदीच्या पैलतीराला जायचंय पण पाण्याची भीती वाटते, पोहताही येत नाही. तुम्ही मला पैलतीरी पोचवाल कां.? एक संन्यासी काही न बोलता पुढे निघाला पण जो दुसरा संन्यासी होता त्याने एक क्षण विचार केला की, सभोवती किर्रऽऽ जंगल आहे आणि अंधार पडतोय अशावेळी या स्त्री ला एकटं टाकणं हा धर्म नाही. त्याने झटकन त्या स्त्री ला आपल्या पाठीशी घेतले आणि पैलतीरी सोडून दिले. तिने मनापासून त्याला धन्यवाद दिले पण काही अंतर चालून गेल्यावर आधी पैलतीरावर आलेला संन्यासी त्याला म्हणाला, तुला संन्यासधर्म माहित नाही. स्त्री शी बोलणं सुद्धा आपल्याला वर्ज्य आहे आणि तू तिला पाठीशी घेऊन आलास. तो संन्यासी म्हणाला, मी तर तिला कधीचीच पैलतीरी सोडली पण तू मात्र अजून मनांत घेऊन चालतो आहेस. खरं सांगू का तुला.. मला त्या स्त्री च्या जागी स्त्री न दिसता त्या परमेश्वराचंरुप दिसत होतं जे मी आजपर्यंत श्रवण केलेलं आहे..!म्हणजे काय तर श्रवणाने माणसाच्या चित्तवृत्ती शांत आणि संथ होतात आणि तो भगवद् चिंतनात मग्न होतो हीच खरी श्रवणाची फलश्रुती होय..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक