शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 20:03 IST

- धर्मराज हल्लाळेआपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा मूळ गुणधर्म काही बदलत नाही. त्यामुळे वरवरचं रूपडं आणि रसाचा ...

- धर्मराज हल्लाळे

आपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा मूळ गुणधर्म काही बदलत नाही. त्यामुळे वरवरचं रूपडं आणि रसाचा गोडवा याचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळेच संत चोखामेळा सांगतात, ‘काय भुललासी वरलिया रंगा'. हे संत वचन आपल्या जीवनात कधी ना कधी अनुभवास येते. फरक इतका असतो की, ही अनुभूती कित्येकदा वेळ निघून गेल्यावर येते. मग आपण स्वत:ला समजावतो, वर-वरच्या रूपाला, स्थितीला आपण भाळलो. कधी कोणी रंग बदलून फसविले. कधी आपणाला कोणाचा मूळ सद्गुणी रंग दिसला नाही.

मुलगा चुकला, वडिलांनी रागावले. आईने दोन कठोर शब्द सुनावले. त्याच क्षणी मुलगा समजतो ती स्थिती आई-वडिलांबाबत प्रत्यक्षात असते का? ते वज्रासारखे वाटणारे शब्द अभंगातल्या वाकड्या उसासारखे असले तरी त्यामागची भावना रसासारखी मधूर असते. त्या गोड अनुभवाची प्रचिती ज्यांना लवकर उमजते, त्यांचे आयुष्य समृद्ध बनते. ज्याला जितका उशीर तितके जीवनातील माधुर्याचे आस्वाद उशिराने. काहींना तर अगदी शेवटाला कळते. आणि मग तो म्हणतो, मी ऊस डोंगा पाहिला अर्थात कटू शब्द ऐकले. मात्र रसाची गोडी चाखलीच नाही. आई-वडिलांची सद्भावना समजू शकलो नाही, आता वेळ निघून गेली. आई-वडील, मित्र, मैत्रीण असे नाते कोणतेही असो ते नाते या अभंगातून कायम अभंग राहील, हा धडा प्रत्येकाला गिरविता येतो. आपण वावरतो त्या प्रदेशात गैरसमजाचे पीक अफाट येते. ज्याने नाती काळवंडून जातात, अशा वेळी वरलिया रंगा भुललो अर्थात त्यातले खरे जसे कळले नाही तसे काही वेळा त्यातले खोटेही कळले नाही. ही भावना अपराधी बनविते. 

तात्पर्य हेच की, आम्ही जे घडते, बिघडते त्याचा अंतिम परिणाम, प्रभावाचा विचार समजून उमजून घेतला पाहिजे. अंतिमत: जे काही घडले त्यावर रागवायचे की, खुश होऊन लगेच फुगायचे हे ठरवताना समोरच्याचा मूळ हेतू लक्षात घेतला पाहिजे.