शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 20:03 IST

- धर्मराज हल्लाळेआपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा मूळ गुणधर्म काही बदलत नाही. त्यामुळे वरवरचं रूपडं आणि रसाचा ...

- धर्मराज हल्लाळे

आपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा मूळ गुणधर्म काही बदलत नाही. त्यामुळे वरवरचं रूपडं आणि रसाचा गोडवा याचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळेच संत चोखामेळा सांगतात, ‘काय भुललासी वरलिया रंगा'. हे संत वचन आपल्या जीवनात कधी ना कधी अनुभवास येते. फरक इतका असतो की, ही अनुभूती कित्येकदा वेळ निघून गेल्यावर येते. मग आपण स्वत:ला समजावतो, वर-वरच्या रूपाला, स्थितीला आपण भाळलो. कधी कोणी रंग बदलून फसविले. कधी आपणाला कोणाचा मूळ सद्गुणी रंग दिसला नाही.

मुलगा चुकला, वडिलांनी रागावले. आईने दोन कठोर शब्द सुनावले. त्याच क्षणी मुलगा समजतो ती स्थिती आई-वडिलांबाबत प्रत्यक्षात असते का? ते वज्रासारखे वाटणारे शब्द अभंगातल्या वाकड्या उसासारखे असले तरी त्यामागची भावना रसासारखी मधूर असते. त्या गोड अनुभवाची प्रचिती ज्यांना लवकर उमजते, त्यांचे आयुष्य समृद्ध बनते. ज्याला जितका उशीर तितके जीवनातील माधुर्याचे आस्वाद उशिराने. काहींना तर अगदी शेवटाला कळते. आणि मग तो म्हणतो, मी ऊस डोंगा पाहिला अर्थात कटू शब्द ऐकले. मात्र रसाची गोडी चाखलीच नाही. आई-वडिलांची सद्भावना समजू शकलो नाही, आता वेळ निघून गेली. आई-वडील, मित्र, मैत्रीण असे नाते कोणतेही असो ते नाते या अभंगातून कायम अभंग राहील, हा धडा प्रत्येकाला गिरविता येतो. आपण वावरतो त्या प्रदेशात गैरसमजाचे पीक अफाट येते. ज्याने नाती काळवंडून जातात, अशा वेळी वरलिया रंगा भुललो अर्थात त्यातले खरे जसे कळले नाही तसे काही वेळा त्यातले खोटेही कळले नाही. ही भावना अपराधी बनविते. 

तात्पर्य हेच की, आम्ही जे घडते, बिघडते त्याचा अंतिम परिणाम, प्रभावाचा विचार समजून उमजून घेतला पाहिजे. अंतिमत: जे काही घडले त्यावर रागवायचे की, खुश होऊन लगेच फुगायचे हे ठरवताना समोरच्याचा मूळ हेतू लक्षात घेतला पाहिजे.