शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 20:03 IST

- धर्मराज हल्लाळेआपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा मूळ गुणधर्म काही बदलत नाही. त्यामुळे वरवरचं रूपडं आणि रसाचा ...

- धर्मराज हल्लाळे

आपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा मूळ गुणधर्म काही बदलत नाही. त्यामुळे वरवरचं रूपडं आणि रसाचा गोडवा याचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळेच संत चोखामेळा सांगतात, ‘काय भुललासी वरलिया रंगा'. हे संत वचन आपल्या जीवनात कधी ना कधी अनुभवास येते. फरक इतका असतो की, ही अनुभूती कित्येकदा वेळ निघून गेल्यावर येते. मग आपण स्वत:ला समजावतो, वर-वरच्या रूपाला, स्थितीला आपण भाळलो. कधी कोणी रंग बदलून फसविले. कधी आपणाला कोणाचा मूळ सद्गुणी रंग दिसला नाही.

मुलगा चुकला, वडिलांनी रागावले. आईने दोन कठोर शब्द सुनावले. त्याच क्षणी मुलगा समजतो ती स्थिती आई-वडिलांबाबत प्रत्यक्षात असते का? ते वज्रासारखे वाटणारे शब्द अभंगातल्या वाकड्या उसासारखे असले तरी त्यामागची भावना रसासारखी मधूर असते. त्या गोड अनुभवाची प्रचिती ज्यांना लवकर उमजते, त्यांचे आयुष्य समृद्ध बनते. ज्याला जितका उशीर तितके जीवनातील माधुर्याचे आस्वाद उशिराने. काहींना तर अगदी शेवटाला कळते. आणि मग तो म्हणतो, मी ऊस डोंगा पाहिला अर्थात कटू शब्द ऐकले. मात्र रसाची गोडी चाखलीच नाही. आई-वडिलांची सद्भावना समजू शकलो नाही, आता वेळ निघून गेली. आई-वडील, मित्र, मैत्रीण असे नाते कोणतेही असो ते नाते या अभंगातून कायम अभंग राहील, हा धडा प्रत्येकाला गिरविता येतो. आपण वावरतो त्या प्रदेशात गैरसमजाचे पीक अफाट येते. ज्याने नाती काळवंडून जातात, अशा वेळी वरलिया रंगा भुललो अर्थात त्यातले खरे जसे कळले नाही तसे काही वेळा त्यातले खोटेही कळले नाही. ही भावना अपराधी बनविते. 

तात्पर्य हेच की, आम्ही जे घडते, बिघडते त्याचा अंतिम परिणाम, प्रभावाचा विचार समजून उमजून घेतला पाहिजे. अंतिमत: जे काही घडले त्यावर रागवायचे की, खुश होऊन लगेच फुगायचे हे ठरवताना समोरच्याचा मूळ हेतू लक्षात घेतला पाहिजे.