शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 20:03 IST

- धर्मराज हल्लाळेआपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा मूळ गुणधर्म काही बदलत नाही. त्यामुळे वरवरचं रूपडं आणि रसाचा ...

- धर्मराज हल्लाळे

आपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा मूळ गुणधर्म काही बदलत नाही. त्यामुळे वरवरचं रूपडं आणि रसाचा गोडवा याचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळेच संत चोखामेळा सांगतात, ‘काय भुललासी वरलिया रंगा'. हे संत वचन आपल्या जीवनात कधी ना कधी अनुभवास येते. फरक इतका असतो की, ही अनुभूती कित्येकदा वेळ निघून गेल्यावर येते. मग आपण स्वत:ला समजावतो, वर-वरच्या रूपाला, स्थितीला आपण भाळलो. कधी कोणी रंग बदलून फसविले. कधी आपणाला कोणाचा मूळ सद्गुणी रंग दिसला नाही.

मुलगा चुकला, वडिलांनी रागावले. आईने दोन कठोर शब्द सुनावले. त्याच क्षणी मुलगा समजतो ती स्थिती आई-वडिलांबाबत प्रत्यक्षात असते का? ते वज्रासारखे वाटणारे शब्द अभंगातल्या वाकड्या उसासारखे असले तरी त्यामागची भावना रसासारखी मधूर असते. त्या गोड अनुभवाची प्रचिती ज्यांना लवकर उमजते, त्यांचे आयुष्य समृद्ध बनते. ज्याला जितका उशीर तितके जीवनातील माधुर्याचे आस्वाद उशिराने. काहींना तर अगदी शेवटाला कळते. आणि मग तो म्हणतो, मी ऊस डोंगा पाहिला अर्थात कटू शब्द ऐकले. मात्र रसाची गोडी चाखलीच नाही. आई-वडिलांची सद्भावना समजू शकलो नाही, आता वेळ निघून गेली. आई-वडील, मित्र, मैत्रीण असे नाते कोणतेही असो ते नाते या अभंगातून कायम अभंग राहील, हा धडा प्रत्येकाला गिरविता येतो. आपण वावरतो त्या प्रदेशात गैरसमजाचे पीक अफाट येते. ज्याने नाती काळवंडून जातात, अशा वेळी वरलिया रंगा भुललो अर्थात त्यातले खरे जसे कळले नाही तसे काही वेळा त्यातले खोटेही कळले नाही. ही भावना अपराधी बनविते. 

तात्पर्य हेच की, आम्ही जे घडते, बिघडते त्याचा अंतिम परिणाम, प्रभावाचा विचार समजून उमजून घेतला पाहिजे. अंतिमत: जे काही घडले त्यावर रागवायचे की, खुश होऊन लगेच फुगायचे हे ठरवताना समोरच्याचा मूळ हेतू लक्षात घेतला पाहिजे.