शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

उलटसुलट विरुद्ध ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:58 PM

उलटसुलट विचार का येतात कारण स्वत:बद्दलचा डळमळीत झालेला आत्मविश्वास!

उलटसुलट विचार हे मनाच्या कमकुवतपणाचं लक्षण असू शकतं. ठाम विचार हे मनाच्या सुदृढतेचं लक्षण मानलं गेलं. उलटसुलट विचार का येतात, त्याचा उगम कुठे असतो आणि त्या उलटसुलट विचारांचा मारा थांबविण्यासाठी कमकुवत मनासाठी काय केलं पाहिजे हा जटिल प्रश्न नेहमीच शिल्लक राहतो.

उलटसुलट विचार का येतात कारण स्वत:बद्दलचा डळमळीत झालेला आत्मविश्वास! त्याचा उगमसुद्धा अस्ताव्यस्त जीवनशैलीतून जन्म घेत असतो आणि अशा उलटसुलट विचारांच्या माऱ्याला थांबविण्यासाठी आपणच आपुले गुरू बनणे पहिले महत्त्वाचे काम असते. माणूस हा इतरांचे दोष काढण्यात सदैव अग्रेसर असतो. परंतु स्वत:च्या दोषाकडेसुद्धा तितक्याच अलिप्तपणे पाहून त्यावर मनन आणि चिंतन करून आपणच त्या उलटसुलट विचारांचा नायनाट करून विचारांना उत्तम तत्त्वाने प्रेरित केले पाहिजे. उलटसुलट विचाराचा निर्माता हा स्वत:च्या मनातच ठाण मांडून बसलेला असतो.

नको ते बघणे, नको ते ऐकणे, त्यावर विचार न करता बोलणे, त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीला आणखी चिघळत नेणे, त्यातून हट्टाच्या भूमिकेमुळे माघार न घेणे, तारतम्याची भूमिका न घेता आपणच कसे योग्य आहोत आणि इतर बोलणारे-वागणारे कसे चुकीचे आहेत, असा गोड गैरसमज करून घेतल्यामुळे बाजू आपल्यावर उलटत जाते. त्यातून निर्मिती ही दु:खाची आणि फक्त निराशेची. योग्य वेळी योग्य विचार मनात आणणे आणि उद्भवलेल्या परिस्थितीपुढे त्याचे तारतम्याने प्रकटीकरण करणे हेच पहिले सुंदर उचललेले पाऊल असू शकते. आपल्या रजोगुणाकडून आपण सत्गुणाकडे सरकतोय असे स्वत:ला वाटलेपाहिजे. आपला विचार वास्तवाच्या दिशेने नेला पाहिजे.

-विजयराज बोधनकर