शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

‘‘पैसा"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 8:56 PM

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही.

-दत्ता कोहिनकर

अमेरिकेहून मुलगा व सुन भारतात आली व आपल्याबरोबर आई-वडलांनी अमेरिकेलाच स्थायिक व्हावे म्हणून प्रेमाने - गोडी गुलाबीने राहता बंगला त्यांना विकावयास लावला. पैसे आपल्या खात्यात भरले व विमानतळावर आई-वडलांना सोडून दोघेही अमेरिकेला निघून गेले. एका समाजसेवकाच्या मदतीने हे दोघे आई-वडिल आज अनाथालयात दिवस काढत आहेत. दुसरी घटना केतकी वेळ घेऊन भेटायला आली होती. नवरा नुसते पैसे कमव तुला जे करायचं ते कर पण पैसे आण म्हणून त्रास देत होता. सांगताना तिचे डोळे पाणावले होते. अजुन एक घटना रूपेशला घटस्फोट मिळवण्यासाठी त्याच्या पत्नीने लाखो रूपायंची मागणी करून त्याला बेजार केले होते. पैशासाठी आई-वडिल, पत्नी-पती या पवित्र नात्यांवर अशाप्रकारे आभाळ कोसळले होते. ‘‘ना बाप बडा - ना भय्या, द होल थींग इज दॅट ना मैय्या, सबसे बडा रूपय्या ।’’ या गाण्याची प्रचिती वरील उदाहरणावरून येते. काही लोक म्हणतात ‘‘काय पैसापैसा करतो, मेल्यानंतर वर नेणार काय ?’’ पण हे ही तितकच खरं आहे.

जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत त्याच्याजवळचा पैसा त्याला प्रत्येक क्षेत्रात वर नेत असतो. दरिद्री माणसाला समाज दूर ठेवतो. त्याचा फोन नंबर यादीतून वगळला जातो. श्रीमंत माणूस बुध्दीने व शिक्षणाने कमी असला तरी समाजात त्याचा नावलौकिक असतो. गोवर्धनदास म्हणाले होते मी जन्म कुठे घ्यावा हे माझ्या हातात नव्हते. त्यामुळे मी जरी गरीब घरात जन्म घेतला. तरी मी गरीब म्हणून मरणार नाही. खरोखर मित्रांनो शेवटी सगळया गोष्टी पैशाशी संबंधित असतात. त्यामुळे अर्थतज्ञ म्हणतात ‘‘जर रूपयाचा हिशोब ठेवाल काटेकोर - तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्‍वर.’’ त्यामुळे आयुष्याचं गणित सहज सोडविण्यासाठी पैशाचे महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या जगात सगळया गोष्टी भरलेल्या पोटानेच होतात. पण खरोखर सगळयाच गोष्टी पैशाने मिळवता येतात का? यावर सखोल चिंतन करणे गरजेचे आहे. पैशांसाठी लोक   स्वकीयांना धोका देतात, आत्मसन्मान गहाण ठेवतात. देहविक्री करतात, खोटयाला खरे म्हणतात, अपराध करतात, जीव घेतात, नाती सोडतात, वाटेल ते करतात. येथूनच दुःखचक्राला सुरूवात होते. मित्रांनो पैसा महत्वाचा आहेच पण या पैशांनी आपण घर घेऊ शकतो. पण घराला घरपण आणू शकत नाही. पैशांनी औषध आणू शकतो, पण आपण आपले वय वाढवू शकत नाही. पैशांनी घडयाळ मिळते, पण गेलेली वेळ मिळवू शकत नाही.

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही. पैशांनी रक्त पण विकत मिळते पण कोमजून गेलेले जीवन नाही. म्हणून पैसा अवश्य कमवा पण चांगल्या मार्गाने. आणि सत्मार्गाने कमावलेल्या पैशाच्या 10 % रक्कम ही दानधर्मासाठी खर्च करा व नाती-मैत्री व धन यांचा सुरेख संगम साधा व यांचा समन्वय साधताना लक्ष्मीकडे देखील दुर्लक्ष करू नका. म्हणतात ना, *‘‘वासुदेवाची ऐका कहानी, जगात नाही राम रे दाम करी काम वेडया - दाम करी काम रे 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकMONEYपैसा