शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Spiritual : निस्वार्थ सेवाभाव: हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 1:39 PM

इतरांसाठी निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते.

‘वैष्णव जन तो तेने कहीये, जे पीड परायी जाणे रे।

पर दु:खे उपकार करे तो ये, मन अभिमान न आणे रे।।’

इतरांसाठी निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते. आपण आपल्या आचरणात नेहमीच सेवेची भावना ठेवावी, जेणे करून इतरांना प्रेरणा मिळेल आणि यशाच्या मार्गावर ते अग्रेसर होतील. सेवाभावी व्यक्ती स्वत: सोबत आपल्या सहकाºयांशी आणि आपल्या सेवाव्यवस्थापकाशी प्रामाणिक असायला हवा. सेवेची विविध पातळ्यांमधील कमतरता यामुळे मनुष्य हळुहळू अधोमार्गाने जायला सुरूवात होते. सेवेची भावनाच हा आपल्यासाठी आत्मसंतोषाचा केवळ वाहक न ठरता, आपल्या संपर्कात येणाºया अनेक व्यक्तीमध्ये चांगुलपणा संदेश सदोदित पसरवित असतो आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे गुलाबाला सांगावे लागत नाही की, तु सुगंध पसरवत अपितू सुगंध पसरत अपितु सुगंधच त्याचा संदेश आहे. त्याचप्रमाणे, सुंदर लोक हे नेहमीच दयाळू नसतात, पण करूणामय लोक नेहमीच सुंदर असतात हे जगजाहीर आहे.

सामाजिक, आर्थिक आणि सर्वरूपामध्ये सेवाभावाचे त्याचे स्वत:चे असे मुल्य आहे. सेवाभाव असल्याशिवाय कुठलेही पुण्यकर्म प्राप्त करू शकत नाही. सेवाभावाच्या माध्यमातूनच समाजातील वाईट, अनिष्ट रितीरिवाज ह्या मुळापासून समाप्त करण्यासोबतच सामान्य माणसांना त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबाबत जागृत करता येवू शकते. मुळाच सेवाभाव हा मनुष्य-मनुष्यातल वाहक आहे. जेव्हा आपण एकमेकांप्रती सेवाभावाचे आचरण करीत असतो तेव्हा आपल्यातील व्देशाची भावना ही आपोआप समाप्त होवून जाते आणि आपण सारे यशाच्या उन्नतीच्या मार्गावर अग्रेसीत होत ज्याला मनुष्य सहजतेने अंगीकार करू शकेल असा ह्या अखिल विश्वात सेवेपेक्षा कोणताच मोठा परोपकार नाही. प्राथमिक शिक्षणापासून ते आपल्या अंतिम क्षणापर्यंत सेवाच असे एकमेव आभुषण आहे. जे आपल्या जीवनाला सार्थक बनण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावित असते. सेवाभाव विरहीत विकसीत मनुष्य जीवन निरर्थक आहे. आपण सर्वांनी सेवेचे हे महत्व समजून घेऊन समाजामध्ये ते इतरांपर्यंत पोहोचवून त्यांना जागृत करायला हवे.

- सविता लिलाधर तायडे 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिकSocialसामाजिक