शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

प्राणायामचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:01 IST

महर्षी पातंजल हे योगशास्त्राचे महागुरू. भगवान श्रीकृष्ण यांना ‘योगेश्वर’ म्हणतात.

- डॉ. विजय जंगम

महर्षी पातंजल हे योगशास्त्राचे महागुरू. भगवान श्रीकृष्ण यांना ‘योगेश्वर’ म्हणतात. महर्षी पातंजलांच्या मते प्राणायाम केवळ स्वास्थ्य, सुदृढता पुरवून थांबत नाही, केवळ रोगनाशक प्रतिकारशक्ती वाढवून गप्प बसत नाही, तर अत्यंत उच्च कोटीचे आत्मज्ञान त्यांच्यामुळे आपल्याला मिळते. प्राणायामामुळे ज्ञानावरचे पटल/आवरण दूर होते. अशिक्षित, अर्धशिक्षित असणारा मनुष्य ज्ञानदीक्षा घेऊन उपासना करेल, तर त्याच्या संचित कर्मांच्या (चुकीच्या) संस्कारातून आलेला संस्कारमल नाहीसा होईल. विवेक जागा होऊन तो विवेकशील होईल. मनाची चंचलता कमी होत-होत संपेल, तसतशी त्याची धारणशक्ती वाढेल.

श्रौतसूत्रं, धर्मसूत्रं आणि गृह्यसूत्रं ही जरी धार्मिक कर्मकांड मार्गदर्शन करणारी असली, तरी त्यांनीही गृहस्थाला उपयुक्त प्राणायाम चर्चा केलेली आहे. सर्वांनी प्राणायाम महती गायलेली आहे. आपस्तंभ सांगतो की, जप करीत असता प्राण (वायू) आत ओढून धरावा! बौधायन सूत्रात ॐकार गायत्री जपासहित कुंभक करण्यासंबंधी चर्चा आहे.

ही धावती चर्चा करायचे एकच कारण आहे आणि ते महत्त्वाचे आहे. प्रस्तुत लेखकाचा अधिकार हा त्याच्या मागची परंपरा धुंडून लोक मानतात. ‘अभ्यासेन ही ज्ञानम्!’ यावर बहुसंख्यांचा विश्वास आहे. त्यांना आता हायसे वाटेल की, ही व्यर्थ वाचाळता नसून यात काही पूर्वसूत्र आहे.

प्राण स्थूल आणि सूक्ष्म असे दोन प्रकारचे आहेत. दोन्हींवर नियंत्रण आणणारा प्राणायाम अभ्यास आहे. हा प्राणाचा व्यायाम नसून प्राणावर अंतिमत: नियंत्रण आणणे, अंकुश लावणे हे प्राणायामाचे अंतिम लक्ष्य आहे. नाथपंथी यांनी योगाभ्यासात मोठी मजल मारलेली होती. गोरक्षनाथ यांच्या मते आपली जीवनावस्था हिलाच प्राण संज्ञेने ओळखले जाते. या अवस्थेचे निरोधन करण्याला ‘प्राणायाम’ म्हणतात.

श्वासोच्छवास नियमितपणे चालतो आणि त्यात ठरावीक अंतराने विराम घेतले जाऊन तो शरीरात घेणे व बाहेर सोडणे या क्रियांना ‘प्राणायाम’ असे नामाभिधान मिळाले आहे. या नैसर्गिक, स्वाभाविक क्रियेवर जेव्हा स्वास्थ्य अभ्यासाने, नियमपूर्वक बंधनांनी स्थिर केले जाते, तेव्हा त्या क्रियेला ‘प्राणायाम’ म्हणतात. या क्रियेने दीर्घायुष्य लाभते. कोणतीही विद्या ही विनाअट मिळत नसते. प्राणायाम क्रियेसाठीही नियम आहेत, त्यांचे पालन होणे तितकेच अगत्यांचे, अनिवार्य असे आहे. ब्रह्मचर्यपालन, योग, आहारविहार, शांत स्वभाव राखून मगच प्राणायाम क्रियेचा अभ्यास करावा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक