शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

प्राणायामचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:01 IST

महर्षी पातंजल हे योगशास्त्राचे महागुरू. भगवान श्रीकृष्ण यांना ‘योगेश्वर’ म्हणतात.

- डॉ. विजय जंगम

महर्षी पातंजल हे योगशास्त्राचे महागुरू. भगवान श्रीकृष्ण यांना ‘योगेश्वर’ म्हणतात. महर्षी पातंजलांच्या मते प्राणायाम केवळ स्वास्थ्य, सुदृढता पुरवून थांबत नाही, केवळ रोगनाशक प्रतिकारशक्ती वाढवून गप्प बसत नाही, तर अत्यंत उच्च कोटीचे आत्मज्ञान त्यांच्यामुळे आपल्याला मिळते. प्राणायामामुळे ज्ञानावरचे पटल/आवरण दूर होते. अशिक्षित, अर्धशिक्षित असणारा मनुष्य ज्ञानदीक्षा घेऊन उपासना करेल, तर त्याच्या संचित कर्मांच्या (चुकीच्या) संस्कारातून आलेला संस्कारमल नाहीसा होईल. विवेक जागा होऊन तो विवेकशील होईल. मनाची चंचलता कमी होत-होत संपेल, तसतशी त्याची धारणशक्ती वाढेल.

श्रौतसूत्रं, धर्मसूत्रं आणि गृह्यसूत्रं ही जरी धार्मिक कर्मकांड मार्गदर्शन करणारी असली, तरी त्यांनीही गृहस्थाला उपयुक्त प्राणायाम चर्चा केलेली आहे. सर्वांनी प्राणायाम महती गायलेली आहे. आपस्तंभ सांगतो की, जप करीत असता प्राण (वायू) आत ओढून धरावा! बौधायन सूत्रात ॐकार गायत्री जपासहित कुंभक करण्यासंबंधी चर्चा आहे.

ही धावती चर्चा करायचे एकच कारण आहे आणि ते महत्त्वाचे आहे. प्रस्तुत लेखकाचा अधिकार हा त्याच्या मागची परंपरा धुंडून लोक मानतात. ‘अभ्यासेन ही ज्ञानम्!’ यावर बहुसंख्यांचा विश्वास आहे. त्यांना आता हायसे वाटेल की, ही व्यर्थ वाचाळता नसून यात काही पूर्वसूत्र आहे.

प्राण स्थूल आणि सूक्ष्म असे दोन प्रकारचे आहेत. दोन्हींवर नियंत्रण आणणारा प्राणायाम अभ्यास आहे. हा प्राणाचा व्यायाम नसून प्राणावर अंतिमत: नियंत्रण आणणे, अंकुश लावणे हे प्राणायामाचे अंतिम लक्ष्य आहे. नाथपंथी यांनी योगाभ्यासात मोठी मजल मारलेली होती. गोरक्षनाथ यांच्या मते आपली जीवनावस्था हिलाच प्राण संज्ञेने ओळखले जाते. या अवस्थेचे निरोधन करण्याला ‘प्राणायाम’ म्हणतात.

श्वासोच्छवास नियमितपणे चालतो आणि त्यात ठरावीक अंतराने विराम घेतले जाऊन तो शरीरात घेणे व बाहेर सोडणे या क्रियांना ‘प्राणायाम’ असे नामाभिधान मिळाले आहे. या नैसर्गिक, स्वाभाविक क्रियेवर जेव्हा स्वास्थ्य अभ्यासाने, नियमपूर्वक बंधनांनी स्थिर केले जाते, तेव्हा त्या क्रियेला ‘प्राणायाम’ म्हणतात. या क्रियेने दीर्घायुष्य लाभते. कोणतीही विद्या ही विनाअट मिळत नसते. प्राणायाम क्रियेसाठीही नियम आहेत, त्यांचे पालन होणे तितकेच अगत्यांचे, अनिवार्य असे आहे. ब्रह्मचर्यपालन, योग, आहारविहार, शांत स्वभाव राखून मगच प्राणायाम क्रियेचा अभ्यास करावा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक