शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

भीती : सकारात्मक आणि नकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:49 IST

एकटेपणाच्या भीतीने माणसं लग्न करतात, आणि सेटल होतात,…गरीबीच्या भीतीमुळे, माणसांची करीअर घडतात.नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी ओव्हरटाईम करतात.हारण्याच्या भीतीने खेळाडु, दिवसरात्र प्रॅक्टीस करतात.

-डॉ  दत्ता कोहिनकर 

प्रत्येक माणसाला रोजच कशाची ना कशाची भीती वाटते. कधी काम नीट होईल की नाही ही भीती, कधी केलेल्या कामाचं चीज होईल की नाही ही भीती, कधी माझं भविष्य कसं असेल ही भीती.कुणाला शिक्षणाची भीती, कुणाला माझं प्रेम मला मिळेल का ही भीती… कुणाला लग्न न जमण्याची भीती, लग्न जमलेल्यांना/झालेल्यांना आयुष्य सुरळीत पार पडेल का असली भीती,कुणाला मुलं होण्याची भीती, कुणाला झालेली मुलं कशी निघतील याची भीती, कधी नवीन घर, बंगला मिळेल का नाही याची भीती तर, कुणाला माझ्या प्रिय व्यक्तीला काही बरवाईट झालं तर, असली विचित्र भीती. स्वतःला लहान, असहाय, हतबल समजालत तर भीतीचा बागुलबुवा तुमच्यावर चाल करुन आलाच समजा. माणसाच्या मनात २४ तासात ६०००० साठ हजार विचार येतात त्यापैकी ७० टक्के विचार भयावह व नकारात्मक असतात . त्याचा सामना करणे आवश्यक असते .

ज्या गोष्टीची तुम्हाला भिती वाटते तेवढी ती भयावह नसते . भयग्रस्त मन भयाचा राक्षस उभा करत . त्याला धैर्याने तोडं द्या.  व.पु. काळे एकेठिकाणी म्हणतात, “वार झेलायला उभं राहीलं, की मारणार्‍याचं बळ जातं”. आणि  गब्बरबाबा शोले प्रवचनात सांगुन गेलेत, “जो डर गया, वो मर गया”भीतीला अनुभवा, सोबत आपलं घोडं पुढं दामटत रहा, विजय तुमचाच आहे.जे लोक आपल्या आयुष्यातुन भीतीची विषारी मुळे उखडुन फेकण्यात यशस्वी ठरले, तेच असामान्य झाले.ह्यासाठी काही उपाय –भितीचा मजाक उडवा कुटुंबातील किंवा मित्रातील व्यक्ती निगेटीव्ह बोलु लागल्या की त्यांना टाळा, चुप बसा, किंवा तिथुन निघुन जा. अजुन वाईट झालं असतं, पण देवाने आपल्यावर कृपा केली हे विसरु नका. समस्येला वाढवुन चढवुन बघु नका, आजुबाजुला तुमच्यापेक्षाही बेकार परीस्थीतीत माणसं आनंदाने जगत आहेत.

ध्येय पुर्ण झालयं असं मनाला पटवुन द्या, आनंदाचा झरा तुडूंब वाहु लागेल. भीती केवळ एक ‘विचार’ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जसं, ‘असं घडलं तर… कधी असं घडू नये… मी मरणार तर नाही ना… मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो नाही तर… पेपर लिहिताना मला उत्तर आठवलं नाही तर…’ बस्स, अशा एका भीतिदायक विचाराने मनुष्य मनात एक चित्र तयार करतो, ज्यात तो एक विचार दृश्यरूप घेताना पाहतो आणि त्यानुसार त्याच्या जीवनात तशाच घटना आकर्षित करतो. आतापर्यंत आपण पाहिलं की भीतीचा बागुलबुवा कसा आपल्याला घेरतो आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल…नाण्याच्या नेहेमी दोन बाजु असतात, तसेच प्रत्येक गोष्टीचे दोन प्रकार असतात, चांगली आणि वाईट…भीतीचे जसे काही तोटे आहेत, तसे भीतीचे काही फायदेही आहेत. मी जर असं म्हंटल की भीती सुद्धा प्रेरणादायी असते, तर तुम्हाला धक्काच बसेल…

पण बघा ना!…..नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थी अभ्यास करतो.गरीब होण्याच्या भीतीने माणुस, आळशीपणा झटकुन कामाला जातो.. भीती वाटतेय, याचा अर्थ तुम्ही समस्यांकडे लक्ष देताय….भीती एक हातात छडी घेतलेल्या शिक्षकाचं काम करतेय….भीती आपल्याला खुप कष्ट करण्यासाठी मिळणारं इंधन असतं. .एकटेपणाच्या भीतीने माणसं लग्न करतात, आणि सेटल होतात,…गरीबीच्या भीतीमुळे, माणसांची करीअर घडतात.नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी ओव्हरटाईम करतात.हारण्याच्या भीतीने खेळाडु, दिवसरात्र प्रॅक्टीस करतात.

बदनामीची भीती असणारी माणसं, सज्जनपणे वागतात.ज्यांना मरणाची भीती असते ते, आयुष्य सत्कारणी लावतात.भीतीचा वापर दुबळं होण्यासाठी करायचा का जागं होण्यासाठी ?…ते आपल्या हातात असतं..म्हणुन म्हणतो, कधीकधी आयुष्यात भिणं पण चांगलं असतं…तुम्ही कितीही संकटात असा….दुःखात असा…. आयुष्यातल्या विविध समस्यांनी त्रस्त असा.पण एखाद्या, आपल्या माणसाला, दुःखात पाहुन इतकं नक्कीच म्हणा, “मी आहे ना!…”हे तीन शब्द जगण्याचं नव बळ देतील…..यापासून दूर राहण्यासाठी मन सबल करा त्यासाठी विपश्यना ध्यान शिबिर हा सर्वोत्तम मार्ग आहे . हे पूर्णतः विनामूल्य असते .

टॅग्स :MeditationसाधनाMental Health Tipsमानसिक आरोग्य