शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भीती : सकारात्मक आणि नकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:49 IST

एकटेपणाच्या भीतीने माणसं लग्न करतात, आणि सेटल होतात,…गरीबीच्या भीतीमुळे, माणसांची करीअर घडतात.नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी ओव्हरटाईम करतात.हारण्याच्या भीतीने खेळाडु, दिवसरात्र प्रॅक्टीस करतात.

-डॉ  दत्ता कोहिनकर 

प्रत्येक माणसाला रोजच कशाची ना कशाची भीती वाटते. कधी काम नीट होईल की नाही ही भीती, कधी केलेल्या कामाचं चीज होईल की नाही ही भीती, कधी माझं भविष्य कसं असेल ही भीती.कुणाला शिक्षणाची भीती, कुणाला माझं प्रेम मला मिळेल का ही भीती… कुणाला लग्न न जमण्याची भीती, लग्न जमलेल्यांना/झालेल्यांना आयुष्य सुरळीत पार पडेल का असली भीती,कुणाला मुलं होण्याची भीती, कुणाला झालेली मुलं कशी निघतील याची भीती, कधी नवीन घर, बंगला मिळेल का नाही याची भीती तर, कुणाला माझ्या प्रिय व्यक्तीला काही बरवाईट झालं तर, असली विचित्र भीती. स्वतःला लहान, असहाय, हतबल समजालत तर भीतीचा बागुलबुवा तुमच्यावर चाल करुन आलाच समजा. माणसाच्या मनात २४ तासात ६०००० साठ हजार विचार येतात त्यापैकी ७० टक्के विचार भयावह व नकारात्मक असतात . त्याचा सामना करणे आवश्यक असते .

ज्या गोष्टीची तुम्हाला भिती वाटते तेवढी ती भयावह नसते . भयग्रस्त मन भयाचा राक्षस उभा करत . त्याला धैर्याने तोडं द्या.  व.पु. काळे एकेठिकाणी म्हणतात, “वार झेलायला उभं राहीलं, की मारणार्‍याचं बळ जातं”. आणि  गब्बरबाबा शोले प्रवचनात सांगुन गेलेत, “जो डर गया, वो मर गया”भीतीला अनुभवा, सोबत आपलं घोडं पुढं दामटत रहा, विजय तुमचाच आहे.जे लोक आपल्या आयुष्यातुन भीतीची विषारी मुळे उखडुन फेकण्यात यशस्वी ठरले, तेच असामान्य झाले.ह्यासाठी काही उपाय –भितीचा मजाक उडवा कुटुंबातील किंवा मित्रातील व्यक्ती निगेटीव्ह बोलु लागल्या की त्यांना टाळा, चुप बसा, किंवा तिथुन निघुन जा. अजुन वाईट झालं असतं, पण देवाने आपल्यावर कृपा केली हे विसरु नका. समस्येला वाढवुन चढवुन बघु नका, आजुबाजुला तुमच्यापेक्षाही बेकार परीस्थीतीत माणसं आनंदाने जगत आहेत.

ध्येय पुर्ण झालयं असं मनाला पटवुन द्या, आनंदाचा झरा तुडूंब वाहु लागेल. भीती केवळ एक ‘विचार’ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जसं, ‘असं घडलं तर… कधी असं घडू नये… मी मरणार तर नाही ना… मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो नाही तर… पेपर लिहिताना मला उत्तर आठवलं नाही तर…’ बस्स, अशा एका भीतिदायक विचाराने मनुष्य मनात एक चित्र तयार करतो, ज्यात तो एक विचार दृश्यरूप घेताना पाहतो आणि त्यानुसार त्याच्या जीवनात तशाच घटना आकर्षित करतो. आतापर्यंत आपण पाहिलं की भीतीचा बागुलबुवा कसा आपल्याला घेरतो आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल…नाण्याच्या नेहेमी दोन बाजु असतात, तसेच प्रत्येक गोष्टीचे दोन प्रकार असतात, चांगली आणि वाईट…भीतीचे जसे काही तोटे आहेत, तसे भीतीचे काही फायदेही आहेत. मी जर असं म्हंटल की भीती सुद्धा प्रेरणादायी असते, तर तुम्हाला धक्काच बसेल…

पण बघा ना!…..नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थी अभ्यास करतो.गरीब होण्याच्या भीतीने माणुस, आळशीपणा झटकुन कामाला जातो.. भीती वाटतेय, याचा अर्थ तुम्ही समस्यांकडे लक्ष देताय….भीती एक हातात छडी घेतलेल्या शिक्षकाचं काम करतेय….भीती आपल्याला खुप कष्ट करण्यासाठी मिळणारं इंधन असतं. .एकटेपणाच्या भीतीने माणसं लग्न करतात, आणि सेटल होतात,…गरीबीच्या भीतीमुळे, माणसांची करीअर घडतात.नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी ओव्हरटाईम करतात.हारण्याच्या भीतीने खेळाडु, दिवसरात्र प्रॅक्टीस करतात.

बदनामीची भीती असणारी माणसं, सज्जनपणे वागतात.ज्यांना मरणाची भीती असते ते, आयुष्य सत्कारणी लावतात.भीतीचा वापर दुबळं होण्यासाठी करायचा का जागं होण्यासाठी ?…ते आपल्या हातात असतं..म्हणुन म्हणतो, कधीकधी आयुष्यात भिणं पण चांगलं असतं…तुम्ही कितीही संकटात असा….दुःखात असा…. आयुष्यातल्या विविध समस्यांनी त्रस्त असा.पण एखाद्या, आपल्या माणसाला, दुःखात पाहुन इतकं नक्कीच म्हणा, “मी आहे ना!…”हे तीन शब्द जगण्याचं नव बळ देतील…..यापासून दूर राहण्यासाठी मन सबल करा त्यासाठी विपश्यना ध्यान शिबिर हा सर्वोत्तम मार्ग आहे . हे पूर्णतः विनामूल्य असते .

टॅग्स :MeditationसाधनाMental Health Tipsमानसिक आरोग्य