शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नमाज अन् अजान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:28 IST

इस्लाममध्ये ईश्वरनिष्ठा आणि इमानला मूलतत्त्वांमध्ये केंद्रस्थानी मानण्यात आले आहे.

इस्लाममध्ये ईश्वरनिष्ठा आणि इमानला मूलतत्त्वांमध्ये केंद्रस्थानी मानण्यात आले आहे.  दिवसातून पाचवेळा नमाज पठण करणे इमानचे प्रतीक समजले जाते. या नमाजची सुरुवात कधी झाली याचा मोठा इतिहास आहे. विस्तारभयास्तव तो इतिहास इथे मांडणे शक्य नाही.

इस्लाम धर्मात वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना सांगितलेल्या आहेत. त्यापैकी नमाज ही एक उपासना आहे. ज्याचा इबादत या प्रार्थनाश्रेणीत समावेश होतो. ‘नमाज’ म्हणून ज्या प्रार्थनाविधीचा उल्लेख केला जातो, त्याला अरबी भाषेत ‘सलात’ अशी संज्ञा आहे. कुराणात ‘सलात’ शब्द अनेकदा आलेला आहे. खाली वाकणे, भूमीवर डोके टेकवून प्रणाम करणे आणि कुरआनच्या ऋचांचे पठण करणे ही नमाजची तीन प्रमुख अंगे होत. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने यथासमय नमाज पढलीच पाहिजे. नमाज प्रत्येक मुस्लीम व्यक्तीस अनिवार्य आहे. दैनंदिन नमाजप्रमाणेच आपत्कालीन, साप्ताहिक व नैमित्तिक नमाजही सांगितलेली आहे. 

मात्र नमाजसाठी दिल्या जाणाºया अजानचे महत्त्व आणि त्याचे स्वरुप याविषयी आपण चर्चा करुयात. प्रेषितांनी इस्लाम आणि प्रेषितत्वाची घोषणा केल्यानंतर काही विश्वासू आणि प्रेषितांवर प्रेम करणाºया त्यांच्या सहकाºयांनी इस्लामचा स्वीकार केला. प्रेषितत्वाची घोषणा झाल्यानंतर मक्केत मुस्लिमांचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यानंतर प्रेषितांनी मक्का येथून प्रचंड हालअपेष्टा सहन करत मदिनेकडे स्थलांतर केले. मदिना येथे गेल्यानंतर प्रेषितांना आणि मुस्लिमांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा मशिदची उभारणी करण्यात आली. आणि पाचवेळच्या नमाजसाठी मशिदीचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर लोकांना नमाजसाठी कसे बोलवायचे यावर बराच ऊहापोह करण्यात आला. तेव्हा चर्चेअंती अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला. हबशी गुलाम राहिलेल्या हजरत बिलाल यांना प्रेषितांनी अजान देण्यास सांगितले. त्या अजानचे शब्द आणि त्याचा अर्थ असा होता.

अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर (अल्लाह महानतम आहे.) अश्हदु अल्ला इलहा इलल्लाह (मी ग्वाही देतो की, अल्लाह एक आहे.)अश्हदु अन्ना मुहम्मद अर रसुलुल्लाह (मी साक्ष देतो , की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत. )हय्य अलसल्लाह, हय्या अलसल्लाह (नमाजकडे या)हय्य अलल्फलाह , हय्या अल्लफलाह (समृद्धी व सफलतेकडे या)अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाह इलल्लाह (अल्लाह महानतम आहे. अल्लाह महानतम आहे. अल्लाहखेरीज कोणीही र्ईश्वर नाही.) सकाळी पठण केल्या जाणाºया पहिल्या नमाजसाठी दिल्या जाणाºया अजानमध्ये ‘अस्सलातु खैरउम मिन नौम’ (निद्रेपेक्षा नमाज उत्तम आहे.) हे शब्द सम्मिलीत केले जातात. 

प्रेषित मोहम्मद (स.) हे मक्कावासीयांच्या छळाला कंटाळून मदिना शहरात आले. त्यानंतर काही दिवसातच तिथे इस्लाम धर्माच्या इतिहासातील पहिली मसजिद बांधली. ती मसजिद बांधल्यानंतर प्रेषितांनी हजरत बिलाल यांना अजान देण्यास सांगितले. ही अजान इस्लामच्या इतिहासातील पहिली अजान मानली जाते. हजरत बिलाल हे निग्रो गुलाम होते. प्रेषितांच्या सहकाºयांनी बिलाल यांच्या मालकाला त्यांचे मूल्य देऊन स्वातंत्र्य प्रदान केले होते. इस्लामी समतेचा विचार मांडताना अनेक अभ्यासक  या घटनेचा उल्लेख करतात. वर्णव्यवस्थेत गुरफटलेल्या अरबी समाज जीवनात ही एक प्रकारची क्रांती होती. प्रेषितांनी केलेल्या या वर्णभेदविरोधी क्रांतीमुळेच आज अरबस्तानात समता प्रस्थापित होऊ शकली, हे वास्तव आहे. -आसिफ इक्बाल

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकRamzanरमजान