शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सर्व प्रयत्नेन पूज्येत पितरौ सदा : पितृपक्षास प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अनादी काळापासून ऋषी, मुनी, आणि शास्त्रकारांनी जगत कल्याणार्थ अदभूत उपदेश केला आहे. मनुष्याचे आचन पूर्णतेने शुध्द श्रेष्ठ व्हावे, हा त्यामागील उदात्त हेतू आहे.   पितृपक्षात पितरांचे पूजन केल्याने जीवन कृतार्थ होते. त्यामुळे पितरांचे पूजन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ‘पितृपक्ष’ाला आरंभ होतो. त्याची पूर्णता पंधरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: अनादी काळापासून ऋषी, मुनी, आणि शास्त्रकारांनी जगत कल्याणार्थ अदभूत उपदेश केला आहे. मनुष्याचे आचन पूर्णतेने शुध्द श्रेष्ठ व्हावे, हा त्यामागील उदात्त हेतू आहे.   पितृपक्षात पितरांचे पूजन केल्याने जीवन कृतार्थ होते. त्यामुळे पितरांचे पूजन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ‘पितृपक्ष’ाला आरंभ होतो. त्याची पूर्णता पंधरा दिवसानंतर ‘पितृमोक्ष अमावस्येला’ होते. या पितृपक्षात आपल्या पितृपक्षात आपल्या पितरांचे स्मरण, पूजन, श्राध्द, तर्पण, जप, तप, लोक करतात. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक उत्सव म्हणजेच पितृपक्ष होय. ज्याच्या कुळात आपला जन्म झाला, ज्यांच्या पुण्याईने, आशीवार्दाने आपणाला जीवनात सर्व प्राप्त झालं, अशी धारणा असलेले लोक या कालावधीत पितरांच्या स्मरणाला आणि दान धर्माला अधिक महत्व देतात. पितृपक्षात बिहार राज्यातील श्री क्षेत्र गया येथे आपल्या पितरांचे श्राध्द करण्याची पुरातन परंपरा आहे. त्यामुळे शास्त्राला मानणारे लोक पितृपक्षात गया येथे जाऊन श्राध्द, तर्पण, दान, जप, तप करतात. तर काही जाणकार आपल्या मात्यापित्याच्या दिवंगत झाल्याच्या तिथीवर श्राध्दादि कर्म करतात. धर्मराज युधिष्ठिाराने पितृशांतीसाठी ‘राजसूत्र’ यज्ञ तर ईश्वाकुवंशीय भगीरथाने घोर तप केले होते. त्याचप्रमाणे संपाति नावाच्या गिधाडान समु्रद जलाने आपल्या भावासाठी तर्पण केल्याचा उल्लेख शास्त्रात आहे. शास्त्रात पितृपक्षाचे अन्यय साधारण महत्व सांगितले आहे.

‘सर्व तिर्थमयी माता

सर्वदेव मय पिता

मातरं पितरं तस्मात

सर्व यत्नेन पूजयेत’ 

या ओळीतूनच पितरांचे महत्व विषद होत असून, माउली ज्ञानेश्वर महाराजांनी ‘मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे’ म्हणजेच अंतकरणातील सद्भाव सत्कर्मातून प्रगट होत असल्याचा असा माउलींनी केला आहे. तर ‘सर्व प्रयत्नेन पूज्येत पितर सदा’ असा  उपदेश गरूड पुरणाचा आहे.

गया येथे होतात एकाचवेळी लाखावर श्राध्द!

पितरांच्या ऋणाईतून मुक्त होण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्नरत असतो. शास्त्रामध्ये  श्री गयातीर्थ (बिहार)येथील श्राध्दाला ‘सूवर्णयोग’ असे वर्णन केले आहे.  पितृपक्षात गया येथे एकाचवेळी लाखावर लोक येथे आपल्या पितरांचे श्राध्द करतात. याच कालावधीत याठिकाणी ‘पितरश्राध्द मेला’ देखील भरतो.

पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षासारखा योग नाही.  पितरांच्या शांतीसाठी मनुष्याने पितृपक्षात  यथामती, यथाशक्ती कर्तव्य करावे. सत्कर्माने सदगति मिळते. दृष्कर्माने अधोगति होते. त्यामुळे नेहमी सत्कर्माचीच कास धरावी. शुभ कार्याला मुहूर्त लागत नाही. मात्र, चांगल्या कार्याची सुरूवात करण्यासाठी पितृपक्षासारखा योग नाही.

- प.पू. शंकरजी महाराज, मठाधिपती, जागृतीपीठ-शेलोडी-तपोवन-सजनपुरी, ता. खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक