शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्व प्रयत्नेन पूज्येत पितरौ सदा : पितृपक्षास प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अनादी काळापासून ऋषी, मुनी, आणि शास्त्रकारांनी जगत कल्याणार्थ अदभूत उपदेश केला आहे. मनुष्याचे आचन पूर्णतेने शुध्द श्रेष्ठ व्हावे, हा त्यामागील उदात्त हेतू आहे.   पितृपक्षात पितरांचे पूजन केल्याने जीवन कृतार्थ होते. त्यामुळे पितरांचे पूजन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ‘पितृपक्ष’ाला आरंभ होतो. त्याची पूर्णता पंधरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: अनादी काळापासून ऋषी, मुनी, आणि शास्त्रकारांनी जगत कल्याणार्थ अदभूत उपदेश केला आहे. मनुष्याचे आचन पूर्णतेने शुध्द श्रेष्ठ व्हावे, हा त्यामागील उदात्त हेतू आहे.   पितृपक्षात पितरांचे पूजन केल्याने जीवन कृतार्थ होते. त्यामुळे पितरांचे पूजन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ‘पितृपक्ष’ाला आरंभ होतो. त्याची पूर्णता पंधरा दिवसानंतर ‘पितृमोक्ष अमावस्येला’ होते. या पितृपक्षात आपल्या पितृपक्षात आपल्या पितरांचे स्मरण, पूजन, श्राध्द, तर्पण, जप, तप, लोक करतात. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक उत्सव म्हणजेच पितृपक्ष होय. ज्याच्या कुळात आपला जन्म झाला, ज्यांच्या पुण्याईने, आशीवार्दाने आपणाला जीवनात सर्व प्राप्त झालं, अशी धारणा असलेले लोक या कालावधीत पितरांच्या स्मरणाला आणि दान धर्माला अधिक महत्व देतात. पितृपक्षात बिहार राज्यातील श्री क्षेत्र गया येथे आपल्या पितरांचे श्राध्द करण्याची पुरातन परंपरा आहे. त्यामुळे शास्त्राला मानणारे लोक पितृपक्षात गया येथे जाऊन श्राध्द, तर्पण, दान, जप, तप करतात. तर काही जाणकार आपल्या मात्यापित्याच्या दिवंगत झाल्याच्या तिथीवर श्राध्दादि कर्म करतात. धर्मराज युधिष्ठिाराने पितृशांतीसाठी ‘राजसूत्र’ यज्ञ तर ईश्वाकुवंशीय भगीरथाने घोर तप केले होते. त्याचप्रमाणे संपाति नावाच्या गिधाडान समु्रद जलाने आपल्या भावासाठी तर्पण केल्याचा उल्लेख शास्त्रात आहे. शास्त्रात पितृपक्षाचे अन्यय साधारण महत्व सांगितले आहे.

‘सर्व तिर्थमयी माता

सर्वदेव मय पिता

मातरं पितरं तस्मात

सर्व यत्नेन पूजयेत’ 

या ओळीतूनच पितरांचे महत्व विषद होत असून, माउली ज्ञानेश्वर महाराजांनी ‘मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे’ म्हणजेच अंतकरणातील सद्भाव सत्कर्मातून प्रगट होत असल्याचा असा माउलींनी केला आहे. तर ‘सर्व प्रयत्नेन पूज्येत पितर सदा’ असा  उपदेश गरूड पुरणाचा आहे.

गया येथे होतात एकाचवेळी लाखावर श्राध्द!

पितरांच्या ऋणाईतून मुक्त होण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्नरत असतो. शास्त्रामध्ये  श्री गयातीर्थ (बिहार)येथील श्राध्दाला ‘सूवर्णयोग’ असे वर्णन केले आहे.  पितृपक्षात गया येथे एकाचवेळी लाखावर लोक येथे आपल्या पितरांचे श्राध्द करतात. याच कालावधीत याठिकाणी ‘पितरश्राध्द मेला’ देखील भरतो.

पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षासारखा योग नाही.  पितरांच्या शांतीसाठी मनुष्याने पितृपक्षात  यथामती, यथाशक्ती कर्तव्य करावे. सत्कर्माने सदगति मिळते. दृष्कर्माने अधोगति होते. त्यामुळे नेहमी सत्कर्माचीच कास धरावी. शुभ कार्याला मुहूर्त लागत नाही. मात्र, चांगल्या कार्याची सुरूवात करण्यासाठी पितृपक्षासारखा योग नाही.

- प.पू. शंकरजी महाराज, मठाधिपती, जागृतीपीठ-शेलोडी-तपोवन-सजनपुरी, ता. खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक