शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

तराजूच्या काट्याइतके काटेकोर व्हा, समोरच्याला भरभरून द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 2:40 PM

मानवी वृत्ती गुण-दोषाने भरली आहे. धर्म आणि अध्यात्मातून  माणसातील दुर्गूणांचा संहार करणारा विचार मिळतो. परमार्थाची शिकवण मिळते.

- धर्मराज हल्लाळे

कुराणमधील अध्याय ५५ सूरह अर रहमानमधील आयत ९ मध्ये म्हटले आहे, ‘न्यायपूर्ण रितीने ठीकठीक वजन करा आणि तराजुने तोलताना वजन कमी करू नका.’ अर्थात व्यवहारात आणि जीवनात आपली उक्ती जशी, तशी कृती असली पाहिजे. आपले वर्तन न्यायपूर्ण असले पाहिजे. जे दूसऱ्याला द्यायचे आहे किंबहुना जे काही समोरच्याचे आहे त्याला देताना ठीकठीक वजन करा. तोलताना वजन कमी करू नका. म्हणजेच समोरच्याच्या वाट्याचे त्याला सर्वार्थाने दिले पाहिजे.

मानवी वृत्ती गुण-दोषाने भरली आहे. धर्म आणि अध्यात्मातून माणसातील दुर्गूणांचा संहार करणारा विचार मिळतो. परमार्थाची शिकवण मिळते. सातत्यानेच सद्गुणांचा पुरस्कार केला जातो. तरीही माणूस स्वार्थाच्या अवतीभोवती फिरतो. स्वत:ला अधिकचे मिळाले पाहिजे आणि दुसऱ्याला देताना कमी दिले पाहिजे, ही सामान्य वृत्ती सामान्य माणसांमध्ये असते.  त्या वृत्तीला रोखणारा विचार कुराणने दिला आहे. आयातीमध्ये जे नमूद केले आहे ते केवळ व्यापार आणि व्यवहाराच्या दृष्टीने नाही. एकूणच मानवी स्वभावाला सद्वर्तनाकडे घेऊन जाणारे भाष्य केले आहे. नक्कीच आपला व्यवहार हा पारदर्शक असला पाहिजे. त्याच्यात खोट नसावी. लुबाडणूक नसावी. अगदी त्याच प्रमाणे आपल्या स्वभावातही इतराचे वाईट व्हावे हे नसावे. वस्तू देणे असो की ज्ञान देणे असो, ते तोलताना कमी तोलू नये. ज्याचा-त्याचा हिस्सा त्याला मिळाला पाहिजे. तिथे स्वार्थ आड येऊ नये. जो न्याय आपल्याला हवा आहे तोच इतरांनाही दिला जावा, ही भावना असली पाहिजे.  

मानवी स्वभाव स्वार्थाने पछाडलेला आहे. ज्यामुळे समोरच्याला देताना वजन कमी करण्याची वृत्ती बळावते. परिणामी आपण न्याय करत नाही अर्थात आपल्याकडून अन्याय होतो. जो ईश्वराला अमान्य आहे. आपणाला मिळालेली कोणतीही भूमिका असो ती प्रामाणिकपणे बजावली पाहिजे. व्यापारी असाल तर शब्दश: तराजूतील धान्य योग्यच रित्या मोजले पाहिजे़ शिक्षक असाल तर योग्य स्वरूपात ज्ञानदान केले पाहिजे. कुटुंब प्रमुख असाल की गाव प्रमुख असाल तुमचा व्यवहार हा तराजूच्या काट्यावर सर्वांसाठी समान आणि योग्यपणे जोखणारा पाहिजे. अगदी रक्ताचे नाते असो की मित्रत्वाचे नाते ते तराजूच्या काट्याइतकेच काटेकोर असले पाहिजे. अर्थात कोणाच्याही पारड्यात अन्यायाचे ओझे जाणार नाही, ही काळजी घेणाराच खऱ्या अर्थाने अध्यात्म जाणतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक