शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

आई-वडील हेच पहिले गुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:06 PM

आई-वडिलांनी मुलाला शिक्षा केली तरीही मुलांनी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

अनेक जन्मीच्या पुण्याचे फलस्वरूप म्हणजे मनुष्य जन्म. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारे सुयोग्य पद्धतीने जीवन व्यतीत केल्यानंतरच मुक्ती मिळते. मनुष्य जन्म सत्कारणी लावला असता अनंत यमयातनांतून मुक्ती मिळते. मनुष्य स्वभाव विविधरंगी, आणि बहुढंगी असतो. प्रत्येकाची आवड, निवड, आचार, विचार, स्वभाव, बुद्धी आणि शारीरिक क्षमता वेगळी असते आणि त्यानुसारच जो तो आपले जीवन व्यतीत करतो. पण जेव्हा मनुष्य आपल्या कुवतीनुसार योग्य त्या पद्धतीने आयुष्य जगतो तेव्हा त्यांस सदगती प्राप्तं होते.  प्रत्येक मुलाने आई-वडिलांचे कृतज्ञ असले पाहिजे. आपण कोणत्याही सामान्य व्यक्तीपुढे विनम्र झाले पाहिजे. आपण इतरांशी मानसन्मानानेच वागले पाहिजे. प्रत्येक आई-वडिलांनी अनेक कष्ट सोसलेले असतात व त्याग केलेला असतो. जरी शिक्षकांनी अथवा आई-वडिलांनी मुलाला शिक्षा केली तरीही मुलांनी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ते आपल्यावर का रागावले, याचे मुलांनी चिंतन केले पाहिजे. ‘निश्चितच आपली काही चूक असली पाहिजे’, असा सूज्ञ विचार त्याने केला पाहिजे. कारण रागावण्यामुळे आई-वडील किंवा शिक्षक यांचा वैयक्तीक काहीच फायदा होत नाही. आपल्या मुलाने सुधारावे, त्याची वागणूक आदर्श व्हावी व लोकांनी त्याला चांगले म्हणावे या गोष्टींच्या ध्यासापोटी हा राग व रागवणे असते. तिºहाईताच्या मुलांना आई-वडील रागावत नाहीत. आपल्या मुलाच्या प्रेमापोटी हा राग असतो व यामुळे मुलांनी याबद्दल मनात राग न धरता आई-वडील व शिक्षक यांचे आभारच मानले पाहिजेत. या जगात फुकट अशी कोणतीच गोष्ट मिळत नाही. आपले आई-वडील आपल्याला खाऊ, खेळणी अन्न, वस्त्र इत्यादी सर्व गोष्टी मायेने पुरवतात. त्याच्या बदल्यात मुले त्यांना काय देतात ? ते पैसे तर देऊ शकत नाहीत. निदान मुलांनी आई-वडिलांना आदर तरी द्यावा. घरातील वडील मंडळींच्या दररोज पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. एखाद्याने आपल्याला काही दिले, तर आपण त्यांचे आभार मानतो. आदरपूर्वक आभार मानण्याची अथवा कृतज्ञता व्यक्त करण्याची पारंपरिक भारतीय पद्धती म्हणजे वाकून नमस्कार करणे होय. काही मुलांना आपल्या आई-वडिलांच्या पाया पडायची लाज वाटते. आपली आई आपले मल-मूत्र साफ करणे, कपडे धुणे, आपल्याला आवडणारे जेवण करणे, जेवू घालणे यासाठी दिवसातून कितीतरी वेळा आपल्यासाठी खाली वाकते. मुलाच्या चुकीमुळे काही वेळा आई-वडिलांना शरमेने मान खाली घालावी लागते. या सर्व गोष्टींची परतफेड करता येणे शक्यच नाही. मग निदान आई-वडिलांना खाली वाकून नमस्कार करण्यात मुलांना मुळीच लाज वाटू नये.

- मीना चंदनदहीगाव, ता. तेल्हारा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक