शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

भेदाभेद ईश्वर भक्तीत अमंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 18:08 IST

मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत.

विठू माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ।।निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी।।

आजच्या युगात जनाईने केलेले वर्णन हे विठ्ठलाचे रूप नजरेसमोर ठेवून आपणास खूप काही गोष्टी सांगून जाते. यंत्रांचे सारथी व्हा. परंतु आहारी जाऊ नका. तंत्रज्ञानाने परिपक्व होऊन माणसे एकमेकांपासून दुरावत चाललेली आहेत. व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्याच्या ओघात कुटुंबापासून विभक्त होत आहेत . समाजामधील एकोपा कमी होऊन मानसिक दरी निर्माण होत आहे. याउलट संत जनाबाईने सर्वांना ईश्वराची लेकरे असे संबोधून जात, धर्म, पंथ, वर्ण या सर्व व्याधीपासून मुक्त राहून या समुदायास एकत्रित एकमूठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

आज या अभंगाच्या विपरीत वर्तन होताना दिसत आहे. जात, धर्म, पंथ यामधील दरी वाढत जात आहे. अशा विघातक बाबीच्या डोळ्यात हा जनाबाईचा अभंग झणझणीत अंजन आहे. जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे. ते मिळविणे क्रमप्राप्त आहे. परंतु भौतिकवाद व चंगळवादात अडकून वेगळी संस्कृती निर्माण झाली आहे. वृद्धाश्रमात आई-वडिलांची व होस्टेलमध्ये मुलांची रवानगी केली जाते. येथूनच संस्कृतीचा ऱ्हास सुरू होत आहे. मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत, याचे उत्तम वर्णन संत जनाबार्इंनी केले आहे. आपणास घडवीत असताना जनाबाईने नामदेवास गुरू, मालक, पिता या अर्थाने संबोधलेले होते. नामदेवांचा सहवास लाभला त्याबाबत कृतज्ञता भाव जनाबाईने अत्यंत नम्रतेने व्यक्त करताना त्यांच्या भावना फार सुंदरतेने व्यक्त करतात. त्या म्हणतात, 

मी तो नामयाची दासी ।जगी ठाऊक सर्वांशी ।।नकळे विधिनिषेध काई ।जनी म्हणे माझी आई ।। 

नम्रता, कठोर परिश्रम, श्रद्धा या गुणांमुळे नराचा नारायण होतो. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारी तत्त्वनिष्ठा व्यक्तींना अंधकाराकडे घेऊन जाते. याचाच एक प्रसंग संत कबीर आणि जनाबाई यांच्यात घडला. संत जनाबाईचे अभंग कबिरापर्यंत पोहोचले. एवढ्या उत्कटतेने हे अभंग कोण लिहिते याचा शोध घेण्यासाठी कबीर पंढरपूरला आले. त्यांना समजले की जनाबाई  नामदेवांच्या घरी कामास आहे. तेथे गेल्यावर कळले की ती गोपाळपुरात गोवऱ्या थापायला गेली आहे.

कबिरांना कळेना घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई एवढी तल्लीन होऊन अभंग कशी लिहू शकते. हे पाहण्यासाठी ते जेव्हा नदीकाठी गेले तेव्हा दोन स्त्रिया आपसात भांडताना दिसल्या. कबिरांनी त्यापैकी एकीला विचारले, जनाई कुठे आहे? त्यावर उत्तर मिळाले, ‘मीच ती जनाई’. आपण का भांडत आहात, यावर जनाईने उत्तर दिले की, आमच्या दोघींच्या थापलेल्या गोऱ्या हिने एकत्र केल्या आणि सर्व गोवऱ्यावर ती स्वत:चाच अधिकार सांगते.

यावर कबिरांनी जनाईला विचारले, आता कसे करायचे, यावर जनाई म्हटली, तुम्हीच निवाडा करा आणि एक-एक गोवरी कानाला लावून बघा, ज्या गोवरीतून विठ्ठल-विठ्ठल शब्द ऐकू येईल ती माझी गोवरी व ज्यामधून आवाज येणार नाही ती हिची गोवरी. ही प्रचिती स्वत: कबिरांनी अनुभवली आणि कबीर आश्चर्यचकित झाले. यावरुन एकच बोध होतो... कोणतेही काम लहान किंवा मोठे, हीन किंवा दर्जेदार नसते. ते स्वयंप्रेरणेने व चांगल्या विचाराने केल्यास यश हमखास मिळते.

- डॉ. भालचंद्र ना. संगनवार, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक