शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

भेदाभेद ईश्वर भक्तीत अमंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 18:08 IST

मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत.

विठू माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ।।निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी।।

आजच्या युगात जनाईने केलेले वर्णन हे विठ्ठलाचे रूप नजरेसमोर ठेवून आपणास खूप काही गोष्टी सांगून जाते. यंत्रांचे सारथी व्हा. परंतु आहारी जाऊ नका. तंत्रज्ञानाने परिपक्व होऊन माणसे एकमेकांपासून दुरावत चाललेली आहेत. व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्याच्या ओघात कुटुंबापासून विभक्त होत आहेत . समाजामधील एकोपा कमी होऊन मानसिक दरी निर्माण होत आहे. याउलट संत जनाबाईने सर्वांना ईश्वराची लेकरे असे संबोधून जात, धर्म, पंथ, वर्ण या सर्व व्याधीपासून मुक्त राहून या समुदायास एकत्रित एकमूठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

आज या अभंगाच्या विपरीत वर्तन होताना दिसत आहे. जात, धर्म, पंथ यामधील दरी वाढत जात आहे. अशा विघातक बाबीच्या डोळ्यात हा जनाबाईचा अभंग झणझणीत अंजन आहे. जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे. ते मिळविणे क्रमप्राप्त आहे. परंतु भौतिकवाद व चंगळवादात अडकून वेगळी संस्कृती निर्माण झाली आहे. वृद्धाश्रमात आई-वडिलांची व होस्टेलमध्ये मुलांची रवानगी केली जाते. येथूनच संस्कृतीचा ऱ्हास सुरू होत आहे. मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत, याचे उत्तम वर्णन संत जनाबार्इंनी केले आहे. आपणास घडवीत असताना जनाबाईने नामदेवास गुरू, मालक, पिता या अर्थाने संबोधलेले होते. नामदेवांचा सहवास लाभला त्याबाबत कृतज्ञता भाव जनाबाईने अत्यंत नम्रतेने व्यक्त करताना त्यांच्या भावना फार सुंदरतेने व्यक्त करतात. त्या म्हणतात, 

मी तो नामयाची दासी ।जगी ठाऊक सर्वांशी ।।नकळे विधिनिषेध काई ।जनी म्हणे माझी आई ।। 

नम्रता, कठोर परिश्रम, श्रद्धा या गुणांमुळे नराचा नारायण होतो. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारी तत्त्वनिष्ठा व्यक्तींना अंधकाराकडे घेऊन जाते. याचाच एक प्रसंग संत कबीर आणि जनाबाई यांच्यात घडला. संत जनाबाईचे अभंग कबिरापर्यंत पोहोचले. एवढ्या उत्कटतेने हे अभंग कोण लिहिते याचा शोध घेण्यासाठी कबीर पंढरपूरला आले. त्यांना समजले की जनाबाई  नामदेवांच्या घरी कामास आहे. तेथे गेल्यावर कळले की ती गोपाळपुरात गोवऱ्या थापायला गेली आहे.

कबिरांना कळेना घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई एवढी तल्लीन होऊन अभंग कशी लिहू शकते. हे पाहण्यासाठी ते जेव्हा नदीकाठी गेले तेव्हा दोन स्त्रिया आपसात भांडताना दिसल्या. कबिरांनी त्यापैकी एकीला विचारले, जनाई कुठे आहे? त्यावर उत्तर मिळाले, ‘मीच ती जनाई’. आपण का भांडत आहात, यावर जनाईने उत्तर दिले की, आमच्या दोघींच्या थापलेल्या गोऱ्या हिने एकत्र केल्या आणि सर्व गोवऱ्यावर ती स्वत:चाच अधिकार सांगते.

यावर कबिरांनी जनाईला विचारले, आता कसे करायचे, यावर जनाई म्हटली, तुम्हीच निवाडा करा आणि एक-एक गोवरी कानाला लावून बघा, ज्या गोवरीतून विठ्ठल-विठ्ठल शब्द ऐकू येईल ती माझी गोवरी व ज्यामधून आवाज येणार नाही ती हिची गोवरी. ही प्रचिती स्वत: कबिरांनी अनुभवली आणि कबीर आश्चर्यचकित झाले. यावरुन एकच बोध होतो... कोणतेही काम लहान किंवा मोठे, हीन किंवा दर्जेदार नसते. ते स्वयंप्रेरणेने व चांगल्या विचाराने केल्यास यश हमखास मिळते.

- डॉ. भालचंद्र ना. संगनवार, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक