शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

भेदाभेद ईश्वर भक्तीत अमंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 18:08 IST

मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत.

विठू माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ।।निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी।।

आजच्या युगात जनाईने केलेले वर्णन हे विठ्ठलाचे रूप नजरेसमोर ठेवून आपणास खूप काही गोष्टी सांगून जाते. यंत्रांचे सारथी व्हा. परंतु आहारी जाऊ नका. तंत्रज्ञानाने परिपक्व होऊन माणसे एकमेकांपासून दुरावत चाललेली आहेत. व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्याच्या ओघात कुटुंबापासून विभक्त होत आहेत . समाजामधील एकोपा कमी होऊन मानसिक दरी निर्माण होत आहे. याउलट संत जनाबाईने सर्वांना ईश्वराची लेकरे असे संबोधून जात, धर्म, पंथ, वर्ण या सर्व व्याधीपासून मुक्त राहून या समुदायास एकत्रित एकमूठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

आज या अभंगाच्या विपरीत वर्तन होताना दिसत आहे. जात, धर्म, पंथ यामधील दरी वाढत जात आहे. अशा विघातक बाबीच्या डोळ्यात हा जनाबाईचा अभंग झणझणीत अंजन आहे. जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे. ते मिळविणे क्रमप्राप्त आहे. परंतु भौतिकवाद व चंगळवादात अडकून वेगळी संस्कृती निर्माण झाली आहे. वृद्धाश्रमात आई-वडिलांची व होस्टेलमध्ये मुलांची रवानगी केली जाते. येथूनच संस्कृतीचा ऱ्हास सुरू होत आहे. मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत, याचे उत्तम वर्णन संत जनाबार्इंनी केले आहे. आपणास घडवीत असताना जनाबाईने नामदेवास गुरू, मालक, पिता या अर्थाने संबोधलेले होते. नामदेवांचा सहवास लाभला त्याबाबत कृतज्ञता भाव जनाबाईने अत्यंत नम्रतेने व्यक्त करताना त्यांच्या भावना फार सुंदरतेने व्यक्त करतात. त्या म्हणतात, 

मी तो नामयाची दासी ।जगी ठाऊक सर्वांशी ।।नकळे विधिनिषेध काई ।जनी म्हणे माझी आई ।। 

नम्रता, कठोर परिश्रम, श्रद्धा या गुणांमुळे नराचा नारायण होतो. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारी तत्त्वनिष्ठा व्यक्तींना अंधकाराकडे घेऊन जाते. याचाच एक प्रसंग संत कबीर आणि जनाबाई यांच्यात घडला. संत जनाबाईचे अभंग कबिरापर्यंत पोहोचले. एवढ्या उत्कटतेने हे अभंग कोण लिहिते याचा शोध घेण्यासाठी कबीर पंढरपूरला आले. त्यांना समजले की जनाबाई  नामदेवांच्या घरी कामास आहे. तेथे गेल्यावर कळले की ती गोपाळपुरात गोवऱ्या थापायला गेली आहे.

कबिरांना कळेना घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई एवढी तल्लीन होऊन अभंग कशी लिहू शकते. हे पाहण्यासाठी ते जेव्हा नदीकाठी गेले तेव्हा दोन स्त्रिया आपसात भांडताना दिसल्या. कबिरांनी त्यापैकी एकीला विचारले, जनाई कुठे आहे? त्यावर उत्तर मिळाले, ‘मीच ती जनाई’. आपण का भांडत आहात, यावर जनाईने उत्तर दिले की, आमच्या दोघींच्या थापलेल्या गोऱ्या हिने एकत्र केल्या आणि सर्व गोवऱ्यावर ती स्वत:चाच अधिकार सांगते.

यावर कबिरांनी जनाईला विचारले, आता कसे करायचे, यावर जनाई म्हटली, तुम्हीच निवाडा करा आणि एक-एक गोवरी कानाला लावून बघा, ज्या गोवरीतून विठ्ठल-विठ्ठल शब्द ऐकू येईल ती माझी गोवरी व ज्यामधून आवाज येणार नाही ती हिची गोवरी. ही प्रचिती स्वत: कबिरांनी अनुभवली आणि कबीर आश्चर्यचकित झाले. यावरुन एकच बोध होतो... कोणतेही काम लहान किंवा मोठे, हीन किंवा दर्जेदार नसते. ते स्वयंप्रेरणेने व चांगल्या विचाराने केल्यास यश हमखास मिळते.

- डॉ. भालचंद्र ना. संगनवार, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक