शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भेदाभेद ईश्वर भक्तीत अमंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 18:08 IST

मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत.

विठू माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ।।निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी।।

आजच्या युगात जनाईने केलेले वर्णन हे विठ्ठलाचे रूप नजरेसमोर ठेवून आपणास खूप काही गोष्टी सांगून जाते. यंत्रांचे सारथी व्हा. परंतु आहारी जाऊ नका. तंत्रज्ञानाने परिपक्व होऊन माणसे एकमेकांपासून दुरावत चाललेली आहेत. व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्याच्या ओघात कुटुंबापासून विभक्त होत आहेत . समाजामधील एकोपा कमी होऊन मानसिक दरी निर्माण होत आहे. याउलट संत जनाबाईने सर्वांना ईश्वराची लेकरे असे संबोधून जात, धर्म, पंथ, वर्ण या सर्व व्याधीपासून मुक्त राहून या समुदायास एकत्रित एकमूठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

आज या अभंगाच्या विपरीत वर्तन होताना दिसत आहे. जात, धर्म, पंथ यामधील दरी वाढत जात आहे. अशा विघातक बाबीच्या डोळ्यात हा जनाबाईचा अभंग झणझणीत अंजन आहे. जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे. ते मिळविणे क्रमप्राप्त आहे. परंतु भौतिकवाद व चंगळवादात अडकून वेगळी संस्कृती निर्माण झाली आहे. वृद्धाश्रमात आई-वडिलांची व होस्टेलमध्ये मुलांची रवानगी केली जाते. येथूनच संस्कृतीचा ऱ्हास सुरू होत आहे. मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत, याचे उत्तम वर्णन संत जनाबार्इंनी केले आहे. आपणास घडवीत असताना जनाबाईने नामदेवास गुरू, मालक, पिता या अर्थाने संबोधलेले होते. नामदेवांचा सहवास लाभला त्याबाबत कृतज्ञता भाव जनाबाईने अत्यंत नम्रतेने व्यक्त करताना त्यांच्या भावना फार सुंदरतेने व्यक्त करतात. त्या म्हणतात, 

मी तो नामयाची दासी ।जगी ठाऊक सर्वांशी ।।नकळे विधिनिषेध काई ।जनी म्हणे माझी आई ।। 

नम्रता, कठोर परिश्रम, श्रद्धा या गुणांमुळे नराचा नारायण होतो. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारी तत्त्वनिष्ठा व्यक्तींना अंधकाराकडे घेऊन जाते. याचाच एक प्रसंग संत कबीर आणि जनाबाई यांच्यात घडला. संत जनाबाईचे अभंग कबिरापर्यंत पोहोचले. एवढ्या उत्कटतेने हे अभंग कोण लिहिते याचा शोध घेण्यासाठी कबीर पंढरपूरला आले. त्यांना समजले की जनाबाई  नामदेवांच्या घरी कामास आहे. तेथे गेल्यावर कळले की ती गोपाळपुरात गोवऱ्या थापायला गेली आहे.

कबिरांना कळेना घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई एवढी तल्लीन होऊन अभंग कशी लिहू शकते. हे पाहण्यासाठी ते जेव्हा नदीकाठी गेले तेव्हा दोन स्त्रिया आपसात भांडताना दिसल्या. कबिरांनी त्यापैकी एकीला विचारले, जनाई कुठे आहे? त्यावर उत्तर मिळाले, ‘मीच ती जनाई’. आपण का भांडत आहात, यावर जनाईने उत्तर दिले की, आमच्या दोघींच्या थापलेल्या गोऱ्या हिने एकत्र केल्या आणि सर्व गोवऱ्यावर ती स्वत:चाच अधिकार सांगते.

यावर कबिरांनी जनाईला विचारले, आता कसे करायचे, यावर जनाई म्हटली, तुम्हीच निवाडा करा आणि एक-एक गोवरी कानाला लावून बघा, ज्या गोवरीतून विठ्ठल-विठ्ठल शब्द ऐकू येईल ती माझी गोवरी व ज्यामधून आवाज येणार नाही ती हिची गोवरी. ही प्रचिती स्वत: कबिरांनी अनुभवली आणि कबीर आश्चर्यचकित झाले. यावरुन एकच बोध होतो... कोणतेही काम लहान किंवा मोठे, हीन किंवा दर्जेदार नसते. ते स्वयंप्रेरणेने व चांगल्या विचाराने केल्यास यश हमखास मिळते.

- डॉ. भालचंद्र ना. संगनवार, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक