शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
6
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
7
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
8
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
9
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
10
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
11
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
12
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
13
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
14
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
15
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
16
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
17
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
18
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
20
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री बंधाचा आदर काळाची गरज...    

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 20:32 IST

मानवी मनाला सौंदर्य, विद्वत्ता, स्वभाव, ऐश्वर्य, व्यक्तिमत्व यासारख्या गोष्टी आकर्षित करतात...

डॉ. दत्ता कोहिनकर -                प्रेम जीवनाच्या उत्पत्तीपासून अस्तित्वात आहे तर विवाह संस्था ही पाच हजार वर्षांपासूनची सामाजिक व्यवस्था आहे. प्रेम बायोलॉजिकल आहे तर लग्न ही सोशल संकल्पना आहे. सामाजिक व्यवस्था उलथू नये म्हणून लग्नपद्धती उदयास आली. मानवी मनाला सौंदर्य, विद्वत्ता, स्वभाव, ऐश्वर्य, व्यक्तिमत्व यासारख्या गोष्टी आकर्षित करतात. लग्नानंतरही या सगळ्याच गोष्टी आपल्या जोडीदाराकडे असतीलच असे नाही. लग्न झाले तरी सात फेरे घेऊन किंवा कबूल है म्हणून आपले मन बदलत नाही. ज्या गोष्टी आपल्या जोडीदाराकडे नाहीत व त्याच्याकडून मिळत नाहीत आपला मेंदू इतर लोकांमध्ये त्या गोष्टी दाखवतो व त्यांच्याकडे आकर्षित करून तुम्हाला व्यक्त होण्यासाठी भाग पाडतो. काहीजण आपण विवाहित आहोत या विचारांनी या भावनांचे दमन करतात तर काही जण या भावना कृतीत उतरतात व लग्नानंतरही इतरांच्या प्रेमात पडतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकटेपणा व त्यामुळे मन मोकळं करायला प्रियजनांचा अभाव यामुळे मेंदू तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून तुम्हाला मित्र - मैत्रिणी असतील तर आपल्या जोडीदाराबरोबर याबाबत पारदर्शकता ठेवा. या नात्यात पवित्रता ठेवा. नवरा-बायकोने एकमेकांच्या भावनांचा मित्र-मैत्रिणींचा स्वीकार करून एकमेकांना व्यक्तिस्वातंत्र्य, पुरेशी मोकळीक व विश्वास देऊन प्रत्येक नात्यात लक्ष्मण रेषा व पवित्रता ठेवली तर  मैत्री बांधाचा आदर केला होईल आणि नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही.  मनाला प्रेम हवं असतं. गालिब उगीच म्हणत नाही - "कहते है, जिसको इश्क, खलल है दिमाग का"  कौन्सलिंग नंतर राणी हसली व अपराधीपणाची तिची भावना दूर झाली व या नात्यात लक्ष्मण रेषा व पवित्रता ठेवून आपल्या पती राजाबरोबर पारदर्शकता ठेवण्यास तयार झाली. खरोखर भावभावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाला मित्र-मैत्रिणींची गरज असते. काही जण त्या भावना समाज बंधनाचा पगडा घेऊन नाकारतात. तुम्ही जर तुमचं कोणावर प्रेम आहे, हे मान्य केलं तर तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम.

म्हणतात ना, "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे."  नवरा बायकोने एकमेकांच्या मित्र मैत्रीणीचा स्वीकार करून एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांना समजुन घेणे ही आज काळाची गरज आहे. या नात्यात विश्वासाला तडा न जाता आनंदाची अनुभूती घ्या. हा माझा मित्र किवां मैत्रीण हे आपल्या जोडीदाराला निर्भयपणे सांगता येईल एवढा एकमेकांवर विश्वास ठेवा.एकमेकांना स्पेस दया.जो या विश्वासाला तडा देईल त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच असते यावर विश्वास ठेवा.नवरा बायकोने एकमेकांना खुपच नजरकैदेत व बंधनात ठेवले तर विवाहबाह्य  संबंधांचा जन्म होऊ शकतो.म्हणून आजच्या या विभक्त कुटूंब पद्धतीत एकमेकांच्या मित्र मैत्रिणींचा आदराने स्वीकार करा, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न