शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

मैत्री बंधाचा आदर काळाची गरज...    

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 20:32 IST

मानवी मनाला सौंदर्य, विद्वत्ता, स्वभाव, ऐश्वर्य, व्यक्तिमत्व यासारख्या गोष्टी आकर्षित करतात...

डॉ. दत्ता कोहिनकर -                प्रेम जीवनाच्या उत्पत्तीपासून अस्तित्वात आहे तर विवाह संस्था ही पाच हजार वर्षांपासूनची सामाजिक व्यवस्था आहे. प्रेम बायोलॉजिकल आहे तर लग्न ही सोशल संकल्पना आहे. सामाजिक व्यवस्था उलथू नये म्हणून लग्नपद्धती उदयास आली. मानवी मनाला सौंदर्य, विद्वत्ता, स्वभाव, ऐश्वर्य, व्यक्तिमत्व यासारख्या गोष्टी आकर्षित करतात. लग्नानंतरही या सगळ्याच गोष्टी आपल्या जोडीदाराकडे असतीलच असे नाही. लग्न झाले तरी सात फेरे घेऊन किंवा कबूल है म्हणून आपले मन बदलत नाही. ज्या गोष्टी आपल्या जोडीदाराकडे नाहीत व त्याच्याकडून मिळत नाहीत आपला मेंदू इतर लोकांमध्ये त्या गोष्टी दाखवतो व त्यांच्याकडे आकर्षित करून तुम्हाला व्यक्त होण्यासाठी भाग पाडतो. काहीजण आपण विवाहित आहोत या विचारांनी या भावनांचे दमन करतात तर काही जण या भावना कृतीत उतरतात व लग्नानंतरही इतरांच्या प्रेमात पडतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकटेपणा व त्यामुळे मन मोकळं करायला प्रियजनांचा अभाव यामुळे मेंदू तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून तुम्हाला मित्र - मैत्रिणी असतील तर आपल्या जोडीदाराबरोबर याबाबत पारदर्शकता ठेवा. या नात्यात पवित्रता ठेवा. नवरा-बायकोने एकमेकांच्या भावनांचा मित्र-मैत्रिणींचा स्वीकार करून एकमेकांना व्यक्तिस्वातंत्र्य, पुरेशी मोकळीक व विश्वास देऊन प्रत्येक नात्यात लक्ष्मण रेषा व पवित्रता ठेवली तर  मैत्री बांधाचा आदर केला होईल आणि नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही.  मनाला प्रेम हवं असतं. गालिब उगीच म्हणत नाही - "कहते है, जिसको इश्क, खलल है दिमाग का"  कौन्सलिंग नंतर राणी हसली व अपराधीपणाची तिची भावना दूर झाली व या नात्यात लक्ष्मण रेषा व पवित्रता ठेवून आपल्या पती राजाबरोबर पारदर्शकता ठेवण्यास तयार झाली. खरोखर भावभावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाला मित्र-मैत्रिणींची गरज असते. काही जण त्या भावना समाज बंधनाचा पगडा घेऊन नाकारतात. तुम्ही जर तुमचं कोणावर प्रेम आहे, हे मान्य केलं तर तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम.

म्हणतात ना, "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे."  नवरा बायकोने एकमेकांच्या मित्र मैत्रीणीचा स्वीकार करून एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांना समजुन घेणे ही आज काळाची गरज आहे. या नात्यात विश्वासाला तडा न जाता आनंदाची अनुभूती घ्या. हा माझा मित्र किवां मैत्रीण हे आपल्या जोडीदाराला निर्भयपणे सांगता येईल एवढा एकमेकांवर विश्वास ठेवा.एकमेकांना स्पेस दया.जो या विश्वासाला तडा देईल त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच असते यावर विश्वास ठेवा.नवरा बायकोने एकमेकांना खुपच नजरकैदेत व बंधनात ठेवले तर विवाहबाह्य  संबंधांचा जन्म होऊ शकतो.म्हणून आजच्या या विभक्त कुटूंब पद्धतीत एकमेकांच्या मित्र मैत्रिणींचा आदराने स्वीकार करा, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न