शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 6:55 PM

क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ति । अवघी हे क्षिति एकरूप ॥१॥ शांति दया पैसे क्षमा जयारूप । अवघेंचि स्वरूप आत्माराम ...

ठळक मुद्देआपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे क्षमा हा गुण विस्ताराला येतो

क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ति ।अवघी हे क्षिति एकरूप ॥१॥शांति दया पैसे क्षमा जयारूप ।अवघेंचि स्वरूप आत्माराम ॥२॥निंदा द्वेष चेष्टा या अभिमान भाजा ।सांडुनिया भजा केशवासी ॥३॥निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्त ।अवघींच समस्त गिळियेलीं ॥४।

प्रस्तुत सेवेसाठी आलेला अभंग श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा उपदेश प्रकरणातील असुन आपल्या अज्ञानी जीवांना उपदेश करणारा असा चार चरणाचा अतिशय सुंदर आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की क्षमेचा विस्तार हीच क्षेत्रज्ञाची वृत्ती आहे म्हणजे आपल्या देहरुपी क्षेत्रात वास करणारा क्षेत्रज्ञ किंवा आत्मा, परमात्मा क्षमाशील आहे , याचीच प्राप्ती सदगुरू कृपेने करुन घेतली असता आपल्या वृत्तीच्या द्वारे त्याच क्षेत्रज्ञाच्या गुणाचा विस्तार होतो म्हणजे आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे क्षमा हा गुण विस्ताराला येतो किंवा आपल्या वृत्तीच्या सामर्थ्यावर इंद्रियाद्वारे क्षमा बाहेर प्रसवते म्हणजे विस्तार पावते. अशी अवस्था झाली असता आपण अपकार्यावर सुद्धा उपकार करायला लागतो कारण सर्व विश्व हे आपलेच एकाचे स्वरुप आहे अशी त्यांची दृष्टी स्वस्वरुपाच्या ठिकाणी एकरुप झालेली असुन त्यांच्याच ठिकाणी शांती, दया, क्षमा नांदुन आहे हेच ज्यांचे रुप आहे त्यांनाच अवघ्या विश्वात एका आत्मारामाचे स्वरुपाचा अनुभव येतो.

कारण दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती म्हणजे ज्यांच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हे गुण नांदत आहेत तेथे साक्षात देवाची वस्ती असुन तोच देह देवाचे साक्षात घरच आहे आणि देवच वस्तीला आले म्हटल्यावर त्यांना सहजच आत्मरामाच्या स्वरुपाचा साक्षात्कार झाला आहे म्हणून त्यांना अवघ्या विश्वात एका आत्मरामा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. म्हणून आपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा किंवा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश करीत आहेत. एवढेच नाही तर निंदा, द्वेष, चेष्टा ज्या अभिमानाच्या संगतीने घडतात त्या अभिमाला भाजा म्हणजे जाळून टाका मग अभिमान गेला  तुका म्हणे देव झाला अशी अवस्था प्राप्त होईल. या करीता अभिमान सांडून किंवा सोडुन केशवाला भजा म्हणजे भगवंताचे अखंड प्रेमपुर्वक नामस्मरण, भजन करा. असा उपदेश करीत आहेत.

शेवटच्या चरणात महाराज सांगतात की आम्ही ( या निवृत्तीने ) सुद्धा सदगुरू कृपेने अभिमान रहित होऊन एकरुप चित्ताने भगवंताचे भजन केले आहे म्हणून अवघ्याच गुणदोषांना गिळून टाकले आहे म्हणजे गुणदोषांच्या पलिकडे असलेल्या किंवा दोषरहीत, गुणातीत असलेल्या पांडुरंग परमात्म्याला आपलेसे करुन अवीट आनंदाचा उपभोग घेत आहोत. आणि आपण इतरांनी सुद्धा याच ( संतांच्या, सदगुरुंच्या ) वाटेने जाऊन अवीट असा अपरिमित आनंद प्राप्त करुन घ्यावा. 

-  ह.भ.प. वसंत साठे महाराज,बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक