शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात शाश्वत सापडत नाही, तोवर जीवन आनंदी नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 05:41 IST

तुम्ही स्वत:ला जे काही समजता त्यापेक्षा जरा जास्त विलक्षण अशा कशाचा तरी जर तुम्हाला स्पर्श झाला असेल, तर कृपया तुमच्या जीवनाचा काही भाग त्या दिशेने समर्पित करा.

- सद्गुरू जग्गी वासुदेवतुम्ही स्वत:ला जे काही समजता त्यापेक्षा जरा जास्त विलक्षण अशा कशाचा तरी जर तुम्हाला स्पर्श झाला असेल, तर कृपया तुमच्या जीवनाचा काही भाग त्या दिशेने समर्पित करा. आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही गुंतवणूक केलेली आहे. तुमच्या उदरनिर्वाहासाठी, तुमच्या सुख-सुविधांसाठी, तुमच्या भावनांप्रति. तर मग हे अगदी महत्त्वाचे आहे की तुमचे जीवन, तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ तुमच्या सीमित मर्यादांपलीकडे जाण्याच्या दिशेने गुंतवला पाहिजे. जेंव्हा मी ‘‘तुम्ही कोण आहात’’ असे विचारतो तेव्हा तुम्ही जर प्रामाणिकपणे आपल्या आत डोकावून पाहिलेत, तर सध्या तुम्ही म्हणजे केवळ एक मन आहात - मतांचा ढिगारा ङ्क्त आणि एक शरीर. कितीतरी लोकांची मते, अभिप्राय साठवले गेले आहेत तुमच्या मनात तुमचं शिक्षण, तुमचा समाज, तुमचा धर्म, तुमची संस्कृती.. मतांचे हे मोठे ढीग आणि सोबत हे शरीर. यावाचून आणखी काहीही नाही. आणि या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे बाहेरून आल्या आहेत. या गोष्टी म्हणजे ‘‘मी’’ असं म्हणण्यासारखं त्यात काहीही नाही. जोपर्यंत तुमच्या आत, शाश्वत, असं काही जोपर्यंत तुम्हाला सापडत नाही, तोवर तुम्ही हे जीवन आनंदी, समाधानी आणि परिपूर्णतेने जगू शकणार नाही. बाहेरून मिळवलेलं कधीही तुमच्याकडून हिरावून घेतलं जाऊ शकतं, म्हणून नेहमी तुम्ही ती गोष्ट तुमच्याकडून हिरावून घेतली जाण्याच्या भीतीत जगत राहणार. तुम्ही कदाचित असा विचार कराल, ‘‘नाही, हा सर्व मूर्खपणा आहे. मी यशस्वी आहे, मी मजेत आहे.’’ आपण यशस्वी आणि मजेत आहात ही उत्तम गोष्ट आहे, पण अशा सुख-सुविधांवर विश्वास ठेवू नका, कारण या प्रकारच्या खुशी आणि स्वास्थ्याची उद्या सकाळी उलथापालथ होऊ शकते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक