शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आनंद तरंग - पश्चात्ताप खरा हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 3:45 AM

अनंत आनंद आणि शांती केवळ त्यातूनच साध्य करता येऊ शकते.

माता अमृतानंदमयीचुका करणं हा मानवी स्वभाव आहे. आयुष्यात कधीच चूक केली नाही असं कुणीही नाही. चूक म्हणजे केवळ जे करता कामा नये ते करणं नव्हे, तर जे करायला पाहिजे ते न करणंही चूक असतं. काही लोक अज्ञानातून चुका करतात. काही जण परिस्थितीच्या दबावामुळे चुका करतात. कारण काहीही असलं, तरी चूक सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे, चूक झाली आहे हे मान्य करणं. एकदा आपली चूक समजली, की आपण पश्चात्ताप करायला हवा. पश्चात्ताप हे एक प्रकारचे प्रायश्चित्त असतं. पश्चात्तापाच्या अश्रूंनी धुतलं जाणार नाही असं कोणतंही पाप नसतं, मात्र आपल्याला काय योग्य आहे हे माहीत असते, तेव्हा चूक परत होता कामा नये. काही लोक फक्त दाखवण्यापुरतं पश्चात्तापाचं ढोंग आणतात. पश्चात्ताप प्रामाणिक असायला हवा. एकदा चूक समजल्यानंतर ती सुधारण्याचा आणि परत न करण्याचा ठाम निर्णय घेतला गेला पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस चूक करतो तेव्हा आपली विवेकबुद्धी आपल्या अंतर्मनात कुजबुजत असते, ‘हे करू नको, ते करू नको.’ या सदसद्विवेकबुद्धीचं ऐकलं, तर आपण कधीच भटकणार नाही. माणूस कित्येकदा अज्ञानातून चूक करतो. देव अशा चुकांना माफ करो. मात्र, चूक परत परत झाल्यास तो माफ करणार नाही. म्हणूनच चूक पुन:पुन्हा घडता कामा नये. मानवी आयुष्य हे अयोग्याकडून योग्यतेकडे जाणारा प्रवास आहे. पश्चात्ताप झाला की मनुष्य योग्य मार्गावर चालण्याचा किमान विचार तरी करतोच. चुका तर होणारच. मात्र, त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण प्रत्येक विचार, शब्द आणि कृती चांगुलपणाने करायला हवी. क्षुल्लक चुकांचाही पश्चात्ताप करणं, त्या सुधारण्यासाठी पुढे होणं आवश्यक आहे. तरच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रारंभ होतो. हा मार्ग कधीही न संपणाऱ्या विजयाचा आहे. अनंत आनंद आणि शांती केवळ त्यातूनच साध्य करता येऊ शकते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक