शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

आनंद तरंग: भगवंताची कृपा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 2:13 AM

अर्जुनाची इच्छा होती की, भगवंतांच्या अगणित विभूती आपल्या या मर्त्य डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहाव्यात. भगवंतांनी आपल्या या लाडक्या परमभक्ताची इच्छा पूर्ण करण्याचे मनाशी निश्चित केले.

वामनराव देशपांडेआपल्या मनासारखे दान पडले तर ती भगवंतांची कृपा समजावी, त्याहून अधिक काय तर मनासारखे दान पडले नाही तर, भगवंतांनी आपले भविष्यात रक्षण व्हावे म्हणून हा अनुभव दिला आहे. आपण कायम एक लक्षात ठेवावे की आपल्या इच्छा-आकांक्षा जर योग्य असतील तर भगवंतच त्या पूर्ण करतो. भगवंतांनी म्हणूनच भक्तश्रेष्ठ अर्जुनाला दिव्य संदेश दिला की,तेषां नित्याभियुक्तांना योगक्षेमं वहाम्यहम।।अर्जुनाची इच्छा होती की, भगवंतांच्या अगणित विभूती आपल्या या मर्त्य डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहाव्यात. भगवंतांनी आपल्या या लाडक्या परमभक्ताची इच्छा पूर्ण करण्याचे मनाशी निश्चित केले. कारण एकच. अर्जुन हा भगवंतांचा अनन्य भक्त होता. भगवंतांनी आपल्या या भक्ताला आपल्या अंत:करणातले गुह्य सांगताना म्हटलेच होते की,अन्यन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।‘पार्था, जे माझे अनन्यभावाने, अखंडपणे चिंतन करीत असतात, या दृश्य विश्वातले जे जे ते अनुभवत असतात ते माझेच स्वरूप आहे, असा ज्यांचा भाव असतो, जे दृढ बुद्धीने मलाच मानत श्रद्धा जपत मानतात, माझीच केवळ पूजा करतात, त्यातच मग्न असतात त्या भक्तांची मी पूर्ण जबाबदारी घेतो. त्यांचे मनोवांछित पुरे करतो.’ म्हणून भगवंतांनी आपले विश्वदर्शन भक्तश्रेष्ठ अर्जुनाला दाखवायचे निश्चित केले. परंतु आपला हा लाडका परमभक्त मर्त्य डोळ्यांनी पाहू शकणार नाही हे लक्षात आल्यावर भगवंत अर्जुनाला म्हणाले,न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा।दिव्यं ददामि ते चक्षु: पश्य मे योगमैश्वरम ।।गीता।। पार्था, तुला तुझ्या मर्त्य डोळ्यांनी माझे अथांग विश्वरूप प्रत्यक्ष अनुभवता येणार नाही म्हणून मी तुला दिव्यदृष्टी देतो. त्या दिव्यदृृष्टीने तू माझी परमेश्वरी शक्ती प्रत्यक्ष अनुभव...

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक