शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

नाती जपणे ही सुद्धा एक अप्रतिम '' साधना '' च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 21:02 IST

आई-वडील, पत्नी, मुले, भाऊ- बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते.

 - डॉ. दत्ता कोहिनकरआदित्य आमच्या ग्रुपमधला. सर्वांचा लाडका, समंजस, विनम्र, आध्यात्मिकतेची आवड असणारा. आदित्याला लग्नानंतर दहा वर्षांनी मुलगा झाला. अतिशय प्रेमळ जोडपं. मुलावर त्यांचं अतोनात प्रेम. मुलगा दोन वर्षांचा असताना, एके दिवशी आदित्यला कामावर जायला उशीर झाला. कंपनीची बस पकडण्याच्या घाईत घरातून बाहेर पडताना त्याच्या लक्षात आलं, की एका औषधाच्या बाटलीचं झाकण उघडं आहे. त्यानं बायकोला बाटलीचं झाकण लावून ती कपाटात ठेवण्यास सांगितलं. बायको हो म्हणाली; पण घरातल्या कामामुळे ती विसरली. दुर्दैवाने त्यांचा मुलगा त्या बाटलीजवळ गेला व त्या बाटलीचा रंग आवडल्यामुळे खेळता खेळता त्याने ते सर्व औषध पिऊन टाकलं. ते मोठ्या माणसांचं औषध होतं. त्याची मात्रा कमी प्रमाणात घ्यावयाची होती. पूर्ण बाटली प्याल्यामुळे औषधाचा विषाप्रमाणे परिणाम झाला. बेशुद्ध झालेल्या त्या छकुल्याला घेऊन बायको दवाखान्यात गेली; पण तोवर ते मूल मृत झालं होतं. त्यामुळे ती हादरली. नवऱ्याला हे कसं सांगू? याला मीच जबाबदार आहे, या विचारांनी भ्रमिष्ट होऊन रडू लागली. ही बातमी ऐकून उद्विग्न झालेला आदित्य दवाखान्यात आला. पत्नीपाशी बसून खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ह्यह्यआय लव्ह यू डार्लिंग - टेक केअर, नातेसंबंध जपण्याच्या बाबतीत आदित्य हुशार होता. मुलगा पुन्हा जिवंत होणार नव्हता. बायकोला अपराधी ठरवल्याने ती बेशुद्ध होण्याची शक्यता होती. ते तिचंही बाळ होतंच ना. याक्षणी आदित्यकडून तिला सहानुभूती व धीर हवा होता. त्यानं परिस्थिती ओळखून तिला धीर दिला. तिला प्रेमानं जवळ घेतलं. नातेसंबंध टिकवण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. त्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन चिंतनाची गरज असते. संत कबीर म्हणतात, प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला. थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करुणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वाथार्चाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते. सफल प्रेम हे फळासारखे असते. ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी, मुले, भाऊ- बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते. अहंकाराला तिलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्याचा अधिकार देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले व एकमेकांना समजून घेतले, तर कुठलेही नाते अभंग राहील. रिश्ते और नाते बननेसे नही, माननेसे होते है म्हणून वडीलधाऱ्यांच्या आठवणींतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे नवरात्रौत्सव घरात साजरे करावे, पोरांच्या कल्लोळात कुरूक्षेत्रावर समतेत राहावे व सभोवतालच्या समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता आणि घरातील व घराबाहेरची माणसे सुखी होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. थोडक्यात घराचे घरपण राखता राखता भिंतीवरील त्या ओळींना न्याय द्यावा. घर असावे- घरासारखे नकोत नुसत्या भिंती परस्परांवर प्रेम असावे नकोत नुसती नाती.

टॅग्स :Puneपुणेrelationshipरिलेशनशिप