शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शांतीसाठी मनाचा निग्रह हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 08:26 IST

मनाचे कल्याण झाल्यास बुद्धी सतेज होते.

मनाला एखाद्या गोष्टीची गोडी लागली की, ते मन तेथे चिटकून राहाते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

‘का जे यया मनाचे एक निके। जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके। म्हणून अनुभव सुखचि कवतिके। दावित जाईजे।’

म्हणून मानवी मनाला आत्मानुभवासारखे सुखच वारंवार दाखवित चला. आपल्या मनाला जन्मल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा लावला नाही तर ते स्थिर होणार नाही. स्थिर मनाशिवाय मनात शांती येणार नाही. म्हणून मनाचा निग्रह महत्त्वाचा आहे. कारण मनाचा स्वभाव चंचल आहे. मनाचे मूलभूत सात्त्विकपण जन्म-जन्मांतरीच्या रजोगुण-तमोगुणांच्या प्रभावाने लुप्त झालेले असते. स्वार्थी प्रवृतीतून निर्माण झालेले विकार माणसाला झाकोळून टाकतात. तेच संस्कार मनावर होतात. संस्कारी मन जगात कल्याणकारी कार्य करायला प्रवृत्त करते. कोणत्या परिस्थितीत कोणाचे मनावर किती आघात होतात, किती सुख होते याचा विचार संस्कारी मन करू शकते. आपल्या मनाला चांगले किंवा वाईट वळण लावणे आपल्यावरच आहे.

समर्थ रामदास स्वामींनीही मनाला सज्जन म्हणून समजाविले. मनाला विनवणी केली, ‘तू स्वार्थात, विषयभोगात, लबाड-लांछनतेत अडकू नकोस, तू सज्जन आहेस. सज्जन माणसाचे लक्षण असे नसते. म्हणून तू भक्तिपंथाकडे वळ, तेथेच तू शांत होशील. कारण सर्वसामान्यांच्या मनोवृत्तीला भक्तिपंथ जास्त आवडतो. म्हणून त्या मार्गाने गेल्यास मना कल्याण होईल. मनाचे कल्याण झाल्यास बुद्धी सतेज होते. शरीर स्वच्छ व हलके झाल्यासारखे वाटते. जीवन शुद्ध, सात्त्विक व पवित्र होते. आचार-विचारातील पवित्रता वाढते. मनातील विचारतरंग बदलून जातात. नको त्या गोष्टी मनात येत नाहीत. नाहीतर इतर वेळेला मन काहीपण चिंतन करत असते. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी म्हण आहे. माणसाचे मन केव्हा काय चिंतन करेल ते सांगताच येत नाही. अनेक विचारांनी मन गोंधळून जाते. त्यामुळे मनाने चिंतन केले पाहिजे. चिंतन हा मनाचा विषय आहे. चिंतन करताना दुष्टवासना आणि पापबुद्धी यांना मनात थारा मिळता कामा नये. मनात येणाऱ्या वाईट वासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. क्रमाक्रमाने मन शुद्ध करायचे असले तर धर्म व नीतीचा अवलंब करा. मनाला चांगल्या विचारांची सवय लावा. कारण माणसाच्या हातून घडणाऱ्या कृतीचा विचार सर्वप्रथम मनात येतो. मग बुद्धी-इच्छा आणि क्रिया असा क्रम आढळून येतो. त्यामुळे मनाला संस्कारशील बनवा व दुष्टप्रवृत्तीवर विजय मिळवा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक