शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

चांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:28 IST

रमजान ईद विशेष

ठळक मुद्देखरं म्हणजे माणसाला चांगला माणूस म्हणून घडविणारा महिना म्हणजे रमजान प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेम आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत, गरिबांना मदत करावी, याचं शिक्षण आणि प्रेरणाच रमजानच्या माध्यमातून मिळते.कुणी कधीही कुणाशी वाईट बोलू नये, अगदी हिंसात्मक विचारही मनात आणू नयेत आणि कुणाची चहाडी करू नये, हे इस्लामचे मूलभूत शिक्षणही हा महिना देतो

खरं म्हणजे माणसाला चांगला माणूस म्हणून घडविणारा महिना म्हणजे रमजान. रमजान हा प्रशिक्षणाचा महिना आहे. प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेम आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत, गरिबांना मदत करावी, याचं शिक्षण आणि प्रेरणाच रमजानच्या माध्यमातून मिळते. रमजान महिना आपणाला अहिंसा हे मूल्य अंगी बाणवण्याचीही प्रेरणा देतो. कुणी कधीही कुणाशी वाईट बोलू नये, अगदी हिंसात्मक विचारही मनात आणू नयेत आणि कुणाची चहाडी करू नये, हे इस्लामचे मूलभूत शिक्षणही हा महिना देतो.

प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी सांगितले आहे की, ‘‘जो तुझ्यावर अन्याय करेल, त्याला माफ कर. जो तुझ्याशी असलेले नाते तोडेल, त्याच्याशी तू नाते जोड, जो तुला वंचित ठेवेल, त्याला तू भरभरून दे’’ पैगंबरांची ही शिकवण अतिशय महत्त्वाची आणि प्रेरणादायी आहे. अगदी शेजाºयाशीही कसे वागावे, याबद्दलही मार्गदर्शन केलेले आहे. ज्याची श्रद्धा दृढ आहे तो नेहमीच शेजाºयाबरोबर चांगले वागतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जो  स्वत:साठी एखादी गोष्ट पसंद करतो, तीच गोष्ट तो इतरांसाठीही पसंद करतो. म्हणजेच इस्लाममध्ये माणसांमधील भेदभावाला स्थान नाही.

प्रेषितांनी मानवाला देशाबद्दलचे कर्तव्यही सांगितले आहे. त्यांनी सांगितले होते की, माणूस ज्या भूमीत राहतो त्या भूमीशी त्याने प्रामाणिक असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुसलमान स्वत:च्या देशासाठी आपले प्राण, धनदौलतीची आहुती देण्यासाठी सदैव तत्पर असतो; पण काही समाजकंटक मात्र आपल्या स्वार्थासाठी समाजात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. देशाला जर प्रगतिपथावर न्यायचे असेल तर एकमेकांशी विश्वास, बंधुभाव, प्रेम आणि मैत्रभावाने मिळून मिसळून राहिले पाहिजे. या देशाची गंगा - यमुना संस्कृत सदैव जिवंत ठेवली पाहिजे. ही आपल्या देशाची खरी मूलभूतता आहे.

इस्लाममध्ये जी प्रार्थना केली जातो तिचे धार्मिक आणि सामाजिक असे दोन स्वरूप आहेत. हीच या धर्माची विशेषता आहे. रोजा, जकात आणि दानधर्म करणे हे सारे धार्मिक आणि पुण्याचे आहे. यामुळेच सामाजिक जागरुकता निर्माण होते. रोजामध्ये माणूस खाणे - पिणे, स्त्रीसंबंध याबद्दल संयम बाळगला जातो. वस्तुत: हा संयम म्हणजे रोजा आहे. याशिवाय रोजेदारावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. प्रेषित पैगंबरांनी सांगितले आहे की, ‘‘तुम्ही चुकीचे काम कधीच करू नका, खोटे बोलू नका, चहाडी करू नका. हे नियम तुमच्यासाठी नित्याचेच आहेत; पण जर रोजेदार असाल तर यासंदर्भात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.’’ पैंगबर म्हणतात, तुम्ही कुणाशीही भांडण करायचं नाही, इतके की, कुणी तुमच्याशी भांडायला आलं तरी त्याला सांगायचं की, मला भांडण करायचं नाही, कारण मी रोजेदार आहे. (बुखारी/ मुस्लीम).

रमजान महिना आपणाला अहिंसेची प्रेरणा देतोच. शिवाय गोरगरीब, गरजवंतांना आर्थिक मदत करण्याचाही आदेश करतो. आपल्याकडे काम करणाºया नोकरावरही रमजानच्या महिन्यात कामाचा बोजा टाकू नका, हा संदेशही देण्यात आला आहे. या महिन्यात दानधर्माला अतिशय महत्त्व आहे. स्वत: पैगंबर नेहमीच गरिबांवर खूप खर्च करीत; पण रमजानच्या पवित्र महिन्यात ते गरिबांसाठी अधिक खर्च करायचे. प्रेषितांचे अनुयायी सांगत की, एखादा मेघ ज्याप्रमाणे ओसाड जमिनीवर पावसाची बरसात करतो, अगदी त्याप्रमाणे प्रेषित मोहम्मद गरिबांवर मदतीचा वर्षाव करत असतो... रमजानच्या पवित्र महिन्याचे हे असे महत्त्व आहे.- शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी

टॅग्स :SolapurसोलापूरRamzan Eidरमजान ईदAdhyatmikआध्यात्मिक