शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

तत्वाचरण शिकविणारे भगवान महावीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 10:37 IST

चोविसावे तीर्थंकर म्हणून इ. स. पूर्व ५९९ मध्ये कुडलपूर येथे राणी त्रिशलादेवी व राजा सिद्धार्थ यांच्यापोटी वर्धमान भगवान महावीर यांचा जन्म झाला.

चोविसावे तीर्थंकर म्हणून इ. स. पूर्व ५९९ मध्ये कुडलपूर येथे राणी त्रिशलादेवी व राजा सिद्धार्थ यांच्यापोटी वर्धमान भगवान महावीर यांचा जन्म झाला. जन्मनाव वर्धमान ठेवण्यात आले असले तरी त्यांना महावीर, वीर, अतिवीर, सन्मती ही नावे त्यांनी बालपणी केलेल्या अतिविशेष कार्यामुळे देण्यात आली.

महावीर जन्माने राजपुत्र असले तरी त्यांनी आपल्या आयुष्यात कधी राज्यकारभार केला नाही. कारण जन्मापासूनच त्यांची मानसिकता वैराग्य भावनेची होती. त्यामुळे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांच्यातील वैराग्य भावनेने संसार भावनेवर मात केली. स्वयंप्रेरणेने सर्वस्वाचा त्याग करीत त्यांनी मुनीदीक्षा धारण केली व आपल्या अंगीकृती व आपल्या अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या पाच महाव्रतांना धारण करून त्याचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात केली.

भगवान महावीरांच्या ‘अहिंसा परमो धर्म:। धर्मस्य मूलं दया।’ जगा व जगू द्या आणि ‘परस्परोपग्रहो जीवानाम्’ या दोन संदेशाचा जनमानसावर इतका सखोल परिणाम झाला की, त्यामुळे समाज अहिंसक बनून स्त्री-पुरुष असमानता व पशुपक्ष्यांना यज्ञयागात बळी देण्याची प्रथा एकदम थांबली. मनुष्य हा जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो, या महावीर प्रणीत तत्त्वाने जनमानसातील वर्णवादास व उच्च-नीचतेच्या भावनेस तिलांजली मिळाली.

भगवान महावीरांनी सांगितलेल्या तत्त्वांचा राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्यावर विशेष प्रभाव होता हे त्यांनी अंगीकारलेले अहिंसेचे धोरण, त्यांनी केलेले सत्याचे प्रयोग तसेच त्यांनी अपरिग्रही व अनेकांतवादी दृष्टी यावरून स्पष्ट दिसून येते.

वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांनी ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयू, नाम, गोत्र व अंतराय या आठही कर्माचा क्षय केला व इसवी सन पूर्व ५२७ कार्तिक कृष्ण अमावस्या या शुभदिनी बिहार राज्यातील ‘पावापुरी’ या तीर्थस्थानी मोक्षाची प्राप्ती केली. भगवान महावीरांना मोक्षप्राप्ती झाल्याने त्या दिवशी असंख्य दिवे लावून व गुढ्या, तोरणे उभारून लोकांनी दिवाळी साजरी केली. तीच दिवाळी आपण आजही त्याच पद्धतीने साजरी करून भगवान महावीरांचे व त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे स्मरण व चिंतन करून त्यानुसार आचरण करण्याचा आपण प्रयत्न करतो.

जैन धर्मास अतिप्राचीनतेचे ऐश्वर्य लाभलेले आहे. त्यांनी क्रोध, मान, माया, लोभ अशा विकारांवर विजय प्राप्त केला आहे. इंद्रिये इच्छांना जिंकले आहे. ते ‘जिन’ असे मानले जाते. या जिनाचे अनुयायी  ते जैन धर्मात जिनेंद्रांना तीर्थंकर म्हणतात. वृषभदेव ते महावीर असे २४ तीर्थंकर आहेत.

जैन धर्मात सर्वतोपरी मनुष्याला महत्त्व आहे. तीर्थंकरांनी सर्व प्राणी-मात्रांच्या कल्याणाचा आदर्श जगापुढे उभा केला. धर्माच्या व तीर्थांच्या सहायाने या भवसागरातून तरून जाता येते, असा उपदेश तीर्थंकरांनी दिला. सर्व प्राणी-मात्रांमध्ये चैतन्यरूपी आत्मा आहे. त्या आत्म्यास जाणणे हाच जैन धर्माच्या तत्त्वचिंतनाचा केंद्रबिंदू आहे. जेव्हा यज्ञामध्ये बळी देण्याची प्रथा प्रचलित होती, सर्वत्र हिंसेचे प्रमाण वाढले होते, त्यावेळी आत्म्याच्या सन्मानासाठी भगवान महावीरांनी ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश दिला. अंधश्रद्धा, चमत्कार, नवस-सायासांना जैनधर्म पुष्टी देत नाही. ‘तूच माझ्या जीवनाचा शिल्पकार’ हाच मौलिक विचार जैनधर्माकडून आपल्याला मिळतो.

जैन समाजात परस्परांना ‘जय जिनेंद्र’ असे संबोधून परस्परांना जिनेंद्र आत्म्यास वंदन असे म्हणण्याची सुंदर प्रथा आहे, म्हणून जैन धर्म यशस्वी जीवन जगण्याची कला शिकवतो.- प्रदीपकुमार शिंगवी (लेखक हे उद्योग क्षेत्रात आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकMahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८