शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

मित्रांनो.... सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 18:08 IST

" कोण म्हणतं जीवनात प्रत्येकवेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा.. प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत .

मनासारखा नवरा नाही मिळाला . करायचा म्हणून संसार करते . जगण्यात काही मजाच नाही सर , खूप नैराश्य येते , रोजचीच भांडणं , हेवे - दावे - तूतू मैं - मै जीवन नकोसे वाटतंय , झोप येत नाही , जेवण जात नाही असं उदास व रडक्या आवाजात रडगाणं गाणाऱ्या महिलेला पाहून वाटलं . या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर तरी आहे , ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे ? त्याचवेळी एक गाणं आठवलं . " चाँद मिलता नहीं - सबको संसार मे । है दिया ही बहोत रोशनी के लिए ।  " खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे . मनात दररोज ( २४ तासांत ) ६० हजार विचार येतात . यातील ६० % ते ७० % विचार हे नकारात्मक असतात . दर १५ ते २० सेकंदाला नवीन विचार येतो हे चक्र अव्याहतपणे चालू असतं . ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढे नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन . नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती जमते त्यामुळे उदास वाटायला लागतं यातून त्या व्यक्तीची  नैराश्याकडे वाटचाल सुरू होते . रेडिओ किंवा वाहिन्या ज्या बॅडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते . म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते .सकारात्मक विचार आपली शक्ती , आत्मविश्वास , मनोबल वाढवतात , नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय . यालाच तुकाराम महाराज म्हणतात . " रात्रदिनं आम्हां युदधाचा प्रसंग " ! थॉमस अल्वा एडिसनने ९९९ प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला , थॉमसला ज्यावेळेस पाकारांनी मुलाखतीत विचारलं , - थॉमस ९९९ प्रयोग फसले याबाबत तुला काय वाटले ? थॉमस म्हणाला - ९९९ प्रयोग फसले असे म्हणू नका . ९९९ वेळा मी हे सिध्द केलं , या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही . हा माझा सकारात्मक दृष्टीकोन .  दृष्टीटेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे . जर असा विचार केला की , अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं . पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की , नैराश्य , व्याकुळता , हताशपण येतं , सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो . नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो . परिणामी कमांची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य येते.माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले . आकाशवाणीवर आवाजाच्या खरखरपणामुळे नाकारल्या गेलेल्या अभिनेते अमिताभ बच्चनने त्याच आवाजाच्या जोरावर चित्रपटसृष्टीला हलवून सोडले . काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते . म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा . " कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा - प्रत्येकाला उडण्यासाठी - फुलपाखरासारखे पंख आहेत . "मित्रांनो सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र आहे .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिपMeditationसाधना