शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

मित्रांनो.... सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 18:08 IST

" कोण म्हणतं जीवनात प्रत्येकवेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा.. प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत .

मनासारखा नवरा नाही मिळाला . करायचा म्हणून संसार करते . जगण्यात काही मजाच नाही सर , खूप नैराश्य येते , रोजचीच भांडणं , हेवे - दावे - तूतू मैं - मै जीवन नकोसे वाटतंय , झोप येत नाही , जेवण जात नाही असं उदास व रडक्या आवाजात रडगाणं गाणाऱ्या महिलेला पाहून वाटलं . या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर तरी आहे , ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे ? त्याचवेळी एक गाणं आठवलं . " चाँद मिलता नहीं - सबको संसार मे । है दिया ही बहोत रोशनी के लिए ।  " खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे . मनात दररोज ( २४ तासांत ) ६० हजार विचार येतात . यातील ६० % ते ७० % विचार हे नकारात्मक असतात . दर १५ ते २० सेकंदाला नवीन विचार येतो हे चक्र अव्याहतपणे चालू असतं . ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढे नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन . नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती जमते त्यामुळे उदास वाटायला लागतं यातून त्या व्यक्तीची  नैराश्याकडे वाटचाल सुरू होते . रेडिओ किंवा वाहिन्या ज्या बॅडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते . म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते .सकारात्मक विचार आपली शक्ती , आत्मविश्वास , मनोबल वाढवतात , नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय . यालाच तुकाराम महाराज म्हणतात . " रात्रदिनं आम्हां युदधाचा प्रसंग " ! थॉमस अल्वा एडिसनने ९९९ प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला , थॉमसला ज्यावेळेस पाकारांनी मुलाखतीत विचारलं , - थॉमस ९९९ प्रयोग फसले याबाबत तुला काय वाटले ? थॉमस म्हणाला - ९९९ प्रयोग फसले असे म्हणू नका . ९९९ वेळा मी हे सिध्द केलं , या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही . हा माझा सकारात्मक दृष्टीकोन .  दृष्टीटेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे . जर असा विचार केला की , अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं . पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की , नैराश्य , व्याकुळता , हताशपण येतं , सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो . नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो . परिणामी कमांची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य येते.माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले . आकाशवाणीवर आवाजाच्या खरखरपणामुळे नाकारल्या गेलेल्या अभिनेते अमिताभ बच्चनने त्याच आवाजाच्या जोरावर चित्रपटसृष्टीला हलवून सोडले . काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते . म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा . " कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा - प्रत्येकाला उडण्यासाठी - फुलपाखरासारखे पंख आहेत . "मित्रांनो सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र आहे .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिपMeditationसाधना