शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांनो.... सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 18:08 IST

" कोण म्हणतं जीवनात प्रत्येकवेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा.. प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत .

मनासारखा नवरा नाही मिळाला . करायचा म्हणून संसार करते . जगण्यात काही मजाच नाही सर , खूप नैराश्य येते , रोजचीच भांडणं , हेवे - दावे - तूतू मैं - मै जीवन नकोसे वाटतंय , झोप येत नाही , जेवण जात नाही असं उदास व रडक्या आवाजात रडगाणं गाणाऱ्या महिलेला पाहून वाटलं . या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर तरी आहे , ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे ? त्याचवेळी एक गाणं आठवलं . " चाँद मिलता नहीं - सबको संसार मे । है दिया ही बहोत रोशनी के लिए ।  " खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे . मनात दररोज ( २४ तासांत ) ६० हजार विचार येतात . यातील ६० % ते ७० % विचार हे नकारात्मक असतात . दर १५ ते २० सेकंदाला नवीन विचार येतो हे चक्र अव्याहतपणे चालू असतं . ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढे नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन . नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती जमते त्यामुळे उदास वाटायला लागतं यातून त्या व्यक्तीची  नैराश्याकडे वाटचाल सुरू होते . रेडिओ किंवा वाहिन्या ज्या बॅडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते . म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते .सकारात्मक विचार आपली शक्ती , आत्मविश्वास , मनोबल वाढवतात , नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय . यालाच तुकाराम महाराज म्हणतात . " रात्रदिनं आम्हां युदधाचा प्रसंग " ! थॉमस अल्वा एडिसनने ९९९ प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला , थॉमसला ज्यावेळेस पाकारांनी मुलाखतीत विचारलं , - थॉमस ९९९ प्रयोग फसले याबाबत तुला काय वाटले ? थॉमस म्हणाला - ९९९ प्रयोग फसले असे म्हणू नका . ९९९ वेळा मी हे सिध्द केलं , या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही . हा माझा सकारात्मक दृष्टीकोन .  दृष्टीटेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे . जर असा विचार केला की , अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं . पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की , नैराश्य , व्याकुळता , हताशपण येतं , सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो . नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो . परिणामी कमांची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य येते.माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले . आकाशवाणीवर आवाजाच्या खरखरपणामुळे नाकारल्या गेलेल्या अभिनेते अमिताभ बच्चनने त्याच आवाजाच्या जोरावर चित्रपटसृष्टीला हलवून सोडले . काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते . म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा . " कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा - प्रत्येकाला उडण्यासाठी - फुलपाखरासारखे पंख आहेत . "मित्रांनो सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र आहे .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिपMeditationसाधना