शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

हरी चिंतनाने मनाला सर्व सुखांचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 8:31 AM

मन हे लोलूप होऊन विषयात गुंतलेले आहे. त्यामुळे ते प्रत्येकवेळी विषयाकडे धाव घेते. त्या मनाला विषयापासून मागे फिरवायचे असेल तर भगवंताचे चरण किंवा त्याचे नामस्मरण हेच त्यासाठी बलवान व शूर आहे.

मन हे लोलूप होऊन विषयात गुंतलेले आहे. त्यामुळे ते प्रत्येकवेळी विषयाकडे धाव घेते. त्या मनाला विषयापासून मागे फिरवायचे असेल तर भगवंताचे चरण किंवा त्याचे नामस्मरण हेच त्यासाठी बलवान व शूर आहे. मनात जेव्हा एखादी वासना तयार होते, ती वासना त्या विषयाला चिटकून राहाते. त्यापासून ती दूर जाऊच शकत नाही. मग त्यापासून काही साध्य होईल का अनर्थ होईल, याचाही विचार ते मन करू शकत नाही. फक्त त्या मनाला आपली भूक भागविणे एवढेच माहीत असते. त्याच्या विपरीत परिणामाचा ते मन विचार करत नाही. मनाला आवर घालायचा असेल तर विठोबाचे पाय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मनाला स्थिर करायचे असेल तर भगवंताचे चरणच स्थिर करू शकतात

‘मना तेथे धाव घेई ।राहे विठोबाच्या पायी ।।तुका म्हणे जीवा।नको सोडू या केशवा।।’

या अभंगावरूनही हे लक्षात येते. म्हणून मनुष्य जातीला संतांनी जो उपदेश केला तो हाच की, मनाला स्थिर करा- त्यासाठी अखंड चिंतन करा. मनापासून हरिचिंतन करून मनाला सर्वसुखांच्या लहरी अनुभवू द्या. ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ नसेल तर साबण काय करू शकेल, त्याप्रमाणे ‘मन’ स्थिर किंवा शुद्ध नसेल तर ब्रह्मज्ञानाचा उपदेशही लागू पडत नाही. कारण विषयासक्त मन भजनाकरिता सवड मिळू देत नाही. ‘मन’ भव नदीत बुडवून टाकते; पण त्या परमात्म्याला शरण गेल्यास तो त्यातून तारत असतो.

काया, वाचा, मनाने भक्ती केल्यास ईश्वरूपी सगुण संपत्ती आपल्या हाती लाभते. त्या रूपाला नावारूपाला आणता येते. सगळ्या जगाला त्या नियंत्याची ओळख करून देता येईल. हा सर्व मनाचा खेळ आहे. स्थिर मन भवसिंधूच्या पार पोहोचवणारे ठरते. सर्व साधनांचे सार मनाला स्थिर करणे होय. कारण मन स्थिर झाल्याशिवाय योग-यागादी-तपे साध्य होणार नाहीत. भक्तवत्सल, दीननाथ म्हणून ज्याची त्रैलोक्यात ओळख आहे अशा विठ्ठलाच्या भक्तीचा कळस होणे हे मनाचे प्रथम काम आहे. मनाचा विश्वास असला की सर्व साधने सफळ होतात. द्वंद्व राहात नाही. सर्व द्वंद्वापासून मुक्त होऊन मनाची अवस्था स्थिर बनते. मन स्थिर झाल्यास कशाचाही निर्बंध राहात नाही.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक