शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३१, प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 2:54 PM

जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे दोष हे असतातच. प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो. कुटूंबात सासूसुनांची भांडणे का होतात? सासू म्हणते सून वाईट तर सून म्हणते सासू वाईट. खरंतर दोघीही चांगल्या असतात.

ठळक मुद्देबोलताना जर तुम्ही चांगले बोललात तर भांडणे होणारच नाहीत.सासू सांगते सूनेचे दोष तर सून सांगते सासूचे दोष.सूनेच्या ठिकाणी गुणही आहेत व दोषही आहेत

- सदगुरू श्री वामनराव पैजगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे दोष हे असतातच. प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो. कुटूंबात सासूसुनांची भांडणे का होतात? सासू म्हणते सून वाईट तर सून म्हणते सासू वाईट. खरंतर दोघीही चांगल्या असतात. कुणीच वाईट नसतं पण त्यांचं बोलणं वाईट असते. बोलताना जर तुम्ही चांगले बोललात तर भांडणे होणारच नाहीत. सासू सांगते सूनेचे दोष तर सून सांगते सासूचे दोष. सूनेच्या ठिकाणी गुणही आहेत व दोषही आहेत. पण त्यातील गुण पहायचे की दोष पहायचे हे सासूने ठरवायला हवे.

सूनेच्या ठिकाणी जे दोष आहेत तेच फक्त जर सासूने पाहिले व दुस-याला सांगत सुटली तर ते  ऐकणारे नंतर तिच्याच सूनेला जाऊन सांगतात तुझी सासू असं असं बोलत होती. सुनेची देखील तिच गोष्ट.तिने जर सासूचे दोष पाहिले व दुस-यांना सांगितले तर सासू भेटल्यावर ही माणसे तिच्या सासूला सांगतात की तुझी सून असं असं म्हणत होती.मग त्यामुळे काय होतं. संत सांगतात त्याप्रमाणे मुळात माकड त्यात मद्य प्याला त्यात विंचू चावला त्यात डोके फिरले.तसे सासूसुनेचे नाते म्हणजे विळाभोपळा आता त्यात अशा त-हेने जर कुणी आगीत तेल ओतले की आग अधिकच भडकणार. कुटुंबात अशाच प्रकारे भांडणे होतात. घरांत भांडणे होवू लागली की घरातले स्वास्थ बिघडते.

कुटुंबातील प्रत्येक स्त्री फार महत्वाची असते. पुरूष श्रेष्ठ असे समाज जे म्हणतो ते खरे नाही कारण कुटूंबातील स्त्री श्रेष्ट असते. घरातील स्त्री जर शहाणी  तर त्या घरात सुख नांदेल पण तिच जर मुर्ख असतील तर त्या घरात ब्रम्हदेव जरी आला तरी सुख नांदू शकणार नाही. जर स्त्री शहाणी असेल तर ती त्या घरात स्वर्ग निर्माण करेल पण जर ती मूर्ख असेल तर ती त्या घराचा नर्क करेल. याचे कारण तिचे बोलणे. घरातील सगळे चांगले असले तरी त्यांचे बोलणे फार महत्वाचे असते. एक सिनेमा आला होता. बावर्जी नावाचा सिनेमा होता. खरंतर तो मी काही पाहिला नाही पण मला त्याची कथा माहित आहे. त्या सिनेमातील माणसे एकमेकांशी भांडत असतात कारण प्रत्येकाला एकमेकांबद्दल गैरसमज असतात. पण हा बावर्जी काय करतो. तो प्रत्येकाला सांगतो की घरातील प्रत्येकजण तुझ्याबद्दल कसे चांगले बोलत. त्यामुळे त्या माणसांना वाटते अरे दुसरे आपल्याबद्दल चांगले बोलतात आणि आपण उगीच गैरसमज करून घेतो.

अशा प्रकारे तो बावर्जी चांगले बोलून त्या घरात स्वर्ग निर्माण करतो. त्या बावर्जीला जर ही अक्कल होती तर घरातल्या इतर लोकांना ती नव्हती का? पण असे करायला कुणी सांगत नाहीत किंवा कुणी शिकवित नाही. जेव्हा तुम्ही चांगले बोलाल चांगले चिंतन कराल चांगली इच्छा कराल आणि जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले कराल तर मनाला किती शांती मिळते ते अनुभवा.