शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 5:47 PM

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते.

- सदगुरू श्रीवामनराव पै

धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते. मी हिंदू आहे  असे म्हटले म्हणजे आपली गाडी चुकली.मी मुस्लिम आहे असे म्हणतो तेव्हा आपली गाडी चुकते.ही गाडी चुकलेली आहे हे देखील आपल्या लक्षात येत नाही.प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ वाटतो.तुझा धर्म श्रेष्ठ बरोबर आहे पण आमचा धर्म आम्हांला श्रेष्ठ आहे.आमची आई आम्हांला बरी तुमची आई तुम्हांला बरी.नाही माझी आईच चांगली आहे तू तुझ्या आईला सोड व माझ्या आईकडे ये असे म्हटले तर चालेल का? असे म्हटले तर तो म्हणेल तुझी आई चांगली आहे हे ठीक आहे पण माझी आई जशी आहे तशी मला प्रिय आहे.या ठिकाणी वाद करण्याचा प्रश्नच येत नाही.हा हट्ट कशाला की तू आमच्या धर्मात आले पाहिजे.धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.मानव ही एकच जात आहे व माणूसकी हा एकच धर्म आहे.पण हे कुठे सांगितले जात नाही.कुठे शिकविले जात नाही.आपल्याला चुकलेल्या गाडीत बसविण्याची जी एक सवय झालेली आहे त्यामुळे आपला प्रवास असा खडतर होतो, कष्टाचा होतो, दु:खाचा होतो.त्यासाठी जीवनविद्येच्या ज्ञानाला पर्याय नाही.माणूस दु:खी का होतो याचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे ज्याला आपण निदान म्हणतो हे निदान होणे आवश्यक आहे.डॉक्टर जसे रोगाचे परिक्षण करतो व त्याचे परिक्षण जर चुकले तर रोगाचे निदान देखील चुकते व रोग बरा होण्याऐवजी तो बळावत जातो व रोगी मरण्याची शक्यता असते.तसे मानवजातीचे झालेले आहे.मी मानवजात म्हणतो तेव्हा हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असे कोणीही नाही तर अखिल मानवजात डोळ्यासमोर ठेवून माझे प्रबोधन करतो हे लक्षात ठेवा.अखिल मानवजात ही आज दु:खाच्या खाईत आहे असे आपल्या लक्षांत येईल.आपण जर दहशतवाद, दंगेधोपे, तंटेबखेडे, बॉम्बस्फोट हे सर्व पाहिले तर लोक दु:खाच्या खाईत ढकलले गेलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल.याचे प्रमुख कारण आपण शोधून काढत नाही तोपर्यंत हे बदलणे कठीण आहे.त्यासाठी अचूक निदान होणे गरजेचे आहे.माणसाच्या सर्व दु:खाचे कारण अज्ञान आहे.हे अज्ञान म्हणजे तरी काय हे अज्ञान वेगवेगळ्या प्रकारचे असते.माणसाला व्यवहारिक ज्ञान नसेल तर तो फसेल.तो बुवाबाबाकडे जातो व फसतो कारण अज्ञान.शेतकरी सावकाराकडे जातात व सावकार त्यांना फसवतो कारण अज्ञान.माणसाला मनशांती मिळत नाही त्याला कारण अज्ञान.