शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

विरहभक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 3:07 AM

कृष्ण मथुरेला गेला. कंसाचा वध केला, पण गोकुळात परत आला नाही. तरी गोपींबद्दल त्याच्या मनात काळजी होतीच.

- शैलजा शेवडेकृष्ण मथुरेला गेला. कंसाचा वध केला, पण गोकुळात परत आला नाही. तरी गोपींबद्दल त्याच्या मनात काळजी होतीच. त्या आपल्या विरहात वेड्या झाल्या असतील, ही जाणीव होतीच. म्हणून त्याने आपल्या मित्राला, उद्धवाला, जो खूप ज्ञानी-थोडा अहंकारी होता. त्याला गोकुळात पाठविले. हेतू हाच की, त्याला भक्ती म्हणजे नेमके काय, ते कळावे. उद्धव गोकुळात आला. गोपींना भेटला. कृष्णाचा सखा आपल्यासमोर असल्याचे पाहताच त्यांच्या भावनांचा बंध सुटला. त्या रडू लागल्या. रडता-रडता म्हणू लागल्या, ‘कृष्ण मथुरेला जाऊन आम्हाला विसरला. तिथे त्याला सुंदर स्त्रिया भेटल्या असतील, ज्या त्याच्यावर मोहीत झाल्या असतील. तो का आमची आठवण काढेल.’ तेवढ्यात तिथे एक भुंगा आला. कृष्णविरहात दग्ध गोपीला तो भुंगा कृष्णाचा दूत वाटला. त्याला उद्देशून उपरोधिक स्वरात म्हणू लागली,जा जा जा मधुकरा, कृष्णदूता भ्रमरा,स्पर्शू नको चरणांना अमुच्या, चंचला भ्रमरा,गुंजारव की गीत तुझे हे, गुणवर्णन कृष्णाचे,दाखव गाऊनी त्याच्या सांप्रतच्या प्रियतमांनाकृष्णापरी तू कपटी चंचल, समजले आम्हाला,सुमनामधला सेवून मधु तो, सहजच त्यागी त्यालामधुर बोलुनी, अनुनय करसी, ओळखले परी तुला,त्या कृष्णाचा दूत तू असशी, तशाच तुझ्याही लीलागोपींचा तो उत्कंठीत भाव बघून उद्धवाने त्यांची स्तुती केली. कृष्णाचा निरोप दिला. ‘गोपींनो, मी सर्वत्र आत्मरूपाने असल्यामुळे तुमचा आणि माझा वियोग संभवत नाही. विरहामुळे तुम्हाला माझा अहर्निश ध्यास लागून तुमचे मन वेगाने माझ्याकडे ओढले जावे. तुम्ही अहर्निश माझे स्मरण करा. म्हणजे लवकरच माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हाल.’ कृष्णाचा तो संदेश ऐकून गोपींचे विरहदु:ख नाहीसे झाले. श्रीकृष्ण आपल्या अंतर्यामी नित्य आहे, हे जाणून त्यांनी गुरुबुद्धीने उद्धवाची पूजा केली.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक