शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

मोक्षाची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 5:39 AM

भगवंतांनी अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा विचार ‘राजविद्याराजगुह्य’ या नवव्या अध्यायात दिला होता की, प्रापंचिक भोग आणि धनादी संग्रहाची मनोकामना ...

भगवंतांनी अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा विचार ‘राजविद्याराजगुह्य’ या नवव्या अध्यायात दिला होता की, प्रापंचिक भोग आणि धनादी संग्रहाची मनोकामना आणि विविध प्रकारच्या इच्छा-आकांक्षा अंत:करणात सदैैव जपत यज्ञादी कर्मे करतात त्यांना देवतांची प्रार्थना करावी लागते, आपले साध्य पूर्ण व्हावे म्हणून याचना करावी लागते. पुण्य संपादन करीत स्वर्गलोकाची प्राप्ती करून घ्यायची असते. परंतु या सकाम वृत्तीने उपासना करणाऱ्या माझ्या भक्तांच्या हे लक्षात येत नाही की या विविध देवतासुद्धा माझीच रूपे आहेत. परंतु जे परमभक्त केवळ माझीच उपासना करतात, मलाच शरण येतात, केवळ माझाच आश्रय घेत, निष्काम भावनेने माझी पूजा करतात त्यांना माझी याचना कधीच करावी लागत नाही. मी त्यांची मोक्षाची इच्छा स्वत:च पूर्ण करतो.

अन्यन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते!तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम।।

भगवंत अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाले की, ‘‘पार्था, माझी जी अन्यन्यभावाने भक्ती करतात, माझ्याच उपासनेत अखंड दंग असतात, ज्या माझ्या परमभक्तांना फक्त माझीच प्राप्ती करून घ्यायची इच्छा असते, जे सतत माझेच चिंतन करतात, माझ्या नामातच जे अखंड दंग असतात ना, त्यांना जे प्राप्त करून घ्यायचे आहे ती कामना पूर्ण करीत त्या त्यांच्या इच्छेचे रक्षण मीच करतो. त्यासाठी त्यांना माझी याचना करावी लागत नाही. त्यांचा योगक्षेम मीच सांभाळतो आणि मोक्षापर्यंत त्यांचा सांभाळ करतो, पार्था... प्रत्येक भक्ताने हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, आपले संपूर्ण आयुष्य, आपले सुखदु:खाने व्याप्त नित्याचे जगणे भगवंतांच्याच हातात आहे. आपण सर्व खरे तर त्या कृपाळू भगवंतांच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्याच आहोत. भगवंत आपले कधीच अहित करीत नाहीत यावर आपली श्रद्धा हवी. प्रत्येक साधक भक्ताने श्रद्धेय मनाने भगवंतांची निष्काम भावनेने फक्त उपासना करावी.

वामनराव देशपांडे