शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

शरीर व मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 9:24 AM

जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनाचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. शरीराला जेव्हा मनाची जोड लाभते, तेव्हा खरा आनंद निर्माण होऊ शकतो.

जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनाचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. शरीराला जेव्हा मनाची जोड लाभते, तेव्हा खरा आनंद निर्माण होऊ शकतो. शरीराची आणि मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी असते. मानवी मनाचे विश्वचैतन्य अनुभवण्यासारखे असते. शरीर आणि मनासह अंतर्बाह्य चैतन्याचा संवाद हा अध्यात्माचा गाभा असतो. मनाच्या प्रगल्भ विचारांनी जगता जगता जीवनाच्या वाटेवरचा आनंद उपभोगता येतो.

मनामध्ये निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या कल्पना आश्चर्यकारक असतात. मनामध्ये केव्हाही, कुठल्याही कल्पना येऊ शकतात. उदा. नैसर्गिक-अनैसर्गिक, श्लील-अश्लील इ., पण मनाला सात्त्विकतेमुळे चैतन्यत्व प्राप्त होते. त्यामुळे मन धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते. मग मान-अपमान यामुळे मन दुखावले जात नाही. मोठ्या ताकदीने आणि आत्मशक्तीने कुठलेही दु:ख पेलण्याला ते समर्थ बनते. मग स्वत:च स्वत:च्या आनंदात रममाण होते. आपल्यामध्येच ते स्वत:ला शोधत असते. एका नव्या शोधामध्ये ते राहते. आव्हानात्मक गोष्टी स्वीकारते. ते मन जगण्याचे सर्व सोहळे पूर्ण करते. त्याला रुचेल, पचेल तेवढेच ते स्वीकारते. वेगवेगळे प्रयोग राबविते. त्यामुळे मन प्रफुल्लित होते. तत्त्वज्ञानात्मक बनते. मनाप्रमाणे ती व्यक्ती त्याच्या प्रत्येक कामातून, वागण्यातून कळते. बऱ्या वाईटाचा परिणाम काय होतो याचा विचार मन करते.

मन नेहमीच स्वत:चा मार्ग, स्वत:चे अस्तित्व शोधत असते. अशा मनात अध्यात्माची बिजे सापडतात. व्यक्तिगत जीवनात विचार न अनुभवता मन त्याचे रूपांतर एका शुद्ध अनुभूतीमध्ये करते. मनाचे उत्कट अनुभव जीवनाचे सुंदर, संवेदनक्षम पदर उलगडून दाखविते. त्यामुळे मनात आणि शरीरामध्ये जेवढे स्मरण आतून येते, ती मनाच्या शुद्धतेची पावती असते. कारण आपण जे अनुभवतो, ते मनापासून. आपण त्या गोष्टीत रमलेलो असतो तेव्हा आपले मन आपल्या जगण्याशी एकरूप झालेले असते. त्यामधूनच आपला आशय बनत असतो. मन त्या व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. आतून, बाहेरून ते त्या व्यक्तीला कृतिशील बनविते. असे कृतिशील मनच मनुष्याला योग्य दिशेला नेण्याचे काम करीत असते.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक