शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

" क्रोधाची साखळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 21:36 IST

क्रोध ही एक उर्जा आहे. तिचे दमन केले तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते..

डॉ.दत्ता कोहिनकर- (माईंड पॉवर ट्रेनर)मित्रांनो, जगाच्या बाजारात  जागोजागी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात आपण एक उदाहरण घेऊ या ,समजा एखाद्या नोकरदार माणसाची त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने खरडपट्टी काढली त्याला झाप झाप झापले .  त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याचा आतुन खूप राग येतो पण नोकरी टिकवायचीय , पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून तो कर्मचारी हा क्रोध आतच दाबून टाकतो .क्रोध ही एक उर्जा आहे. तिचे दमन केले तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते. सायंकाळी हा कर्मचारी कामावरून घरी येतो ,त्याच्या आत दबलेली क्रोधाची ऊर्जा बाहेर पडण्यासाठी दिवसभर धडपडत असते. क्षणार्धात पत्नी काहीतरी गाऱ्हाणे सांगायला लागते, तत्क्षणी हा क्रोध बाहेर पडून पत्नीवर काढला जातो. पती हा परमेश्वर ,तो म्हणेल ती पूर्वदिशा हे आजपर्यंत स्त्रियांच्या मनावर बिंबवल आहे . त्यामुळे पतीच्या आरडाओरडीमुळे तिला आलेला क्रोध ती दाबून टाकते .तेवढ्यात मुलगा शाळेतून घरी येतो, पहाते तर काय, त्याचे सर्व कपडे मातीने मळलेले. यापूर्वी अनेकदा तो ग्राउंडवरून  मळलेल्या कपड्यानिशी घरी आलेला पण तिला कधीच क्रोध आला नव्हता.  आज मात्र ती नवऱ्याने तिच्या अंगावर टाकलेला क्रोध ती मुलाच्या अंगावर टाकते व त्याला बदडते . मुलगा आईला काय करणार? आईने मारल्यामुळे त्याला आलेला क्रोध तो पाटी किंवा वॉटर बॉटल किंवा खेळणे जोरात आपटून तोडतो व त्याचा क्रोध बाहेर काढतो .मित्रांनो ही क्रोधाची साखळी अशा पद्धतीने कार्य करते. व घराघरात अशांतता निर्माण होते. वरपासून  क्रोध का खालपर्यंत वहन होतो .लॉक डाऊनचे नियम तोडल्यानंतर पोलिसांचा काठीचा प्रसाद जोरात मिळतो याचे कारण तुम्हाला आता लक्षात आले असेल. ऊर्जा नष्ट होत नाही तिचं वहन किंवा रूपांतर होत.त्यामुळे क्रोधाची साखळी तोडायची असेल व ज्याला सुखी व्हायच असेल त्याने मनाचा व्यायाम करून मनाला सबल व संयमी बनवणे गरजेचे असते. त्यासाठी प्रत्येकाने ध्यान करणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैली मध्ये मी तुम्हाला फक्त दहा मिनिटाचे आनापान सती ध्यान करावयाची विनंती करतो . हे ध्यान रोज सकाळ-संध्याकाळ करा.कुठल्याही पंथाचा, वर्णाचा ,संप्रदायाचा माणूस हे ध्यान करू शकतो. .यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल, एकाग्रता वाढेल बुद्धिमत्ता वाढेल, चंचलता दूर होईल व भय दूर होईल .समतायुक्त मन , इंद्रियाचे व ऊर्जेचे व जीवनाचे व्यवस्थापन उत्तमरीत्या करू शकते. लॉकडाऊनच्या या काळात घरातच रहा .योग्य आहार घ्या. रोज व्यायाम करा व ध्यानधारणा करा...

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना