शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

" क्रोधाची साखळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 21:36 IST

क्रोध ही एक उर्जा आहे. तिचे दमन केले तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते..

डॉ.दत्ता कोहिनकर- (माईंड पॉवर ट्रेनर)मित्रांनो, जगाच्या बाजारात  जागोजागी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात आपण एक उदाहरण घेऊ या ,समजा एखाद्या नोकरदार माणसाची त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने खरडपट्टी काढली त्याला झाप झाप झापले .  त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याचा आतुन खूप राग येतो पण नोकरी टिकवायचीय , पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून तो कर्मचारी हा क्रोध आतच दाबून टाकतो .क्रोध ही एक उर्जा आहे. तिचे दमन केले तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते. सायंकाळी हा कर्मचारी कामावरून घरी येतो ,त्याच्या आत दबलेली क्रोधाची ऊर्जा बाहेर पडण्यासाठी दिवसभर धडपडत असते. क्षणार्धात पत्नी काहीतरी गाऱ्हाणे सांगायला लागते, तत्क्षणी हा क्रोध बाहेर पडून पत्नीवर काढला जातो. पती हा परमेश्वर ,तो म्हणेल ती पूर्वदिशा हे आजपर्यंत स्त्रियांच्या मनावर बिंबवल आहे . त्यामुळे पतीच्या आरडाओरडीमुळे तिला आलेला क्रोध ती दाबून टाकते .तेवढ्यात मुलगा शाळेतून घरी येतो, पहाते तर काय, त्याचे सर्व कपडे मातीने मळलेले. यापूर्वी अनेकदा तो ग्राउंडवरून  मळलेल्या कपड्यानिशी घरी आलेला पण तिला कधीच क्रोध आला नव्हता.  आज मात्र ती नवऱ्याने तिच्या अंगावर टाकलेला क्रोध ती मुलाच्या अंगावर टाकते व त्याला बदडते . मुलगा आईला काय करणार? आईने मारल्यामुळे त्याला आलेला क्रोध तो पाटी किंवा वॉटर बॉटल किंवा खेळणे जोरात आपटून तोडतो व त्याचा क्रोध बाहेर काढतो .मित्रांनो ही क्रोधाची साखळी अशा पद्धतीने कार्य करते. व घराघरात अशांतता निर्माण होते. वरपासून  क्रोध का खालपर्यंत वहन होतो .लॉक डाऊनचे नियम तोडल्यानंतर पोलिसांचा काठीचा प्रसाद जोरात मिळतो याचे कारण तुम्हाला आता लक्षात आले असेल. ऊर्जा नष्ट होत नाही तिचं वहन किंवा रूपांतर होत.त्यामुळे क्रोधाची साखळी तोडायची असेल व ज्याला सुखी व्हायच असेल त्याने मनाचा व्यायाम करून मनाला सबल व संयमी बनवणे गरजेचे असते. त्यासाठी प्रत्येकाने ध्यान करणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैली मध्ये मी तुम्हाला फक्त दहा मिनिटाचे आनापान सती ध्यान करावयाची विनंती करतो . हे ध्यान रोज सकाळ-संध्याकाळ करा.कुठल्याही पंथाचा, वर्णाचा ,संप्रदायाचा माणूस हे ध्यान करू शकतो. .यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल, एकाग्रता वाढेल बुद्धिमत्ता वाढेल, चंचलता दूर होईल व भय दूर होईल .समतायुक्त मन , इंद्रियाचे व ऊर्जेचे व जीवनाचे व्यवस्थापन उत्तमरीत्या करू शकते. लॉकडाऊनच्या या काळात घरातच रहा .योग्य आहार घ्या. रोज व्यायाम करा व ध्यानधारणा करा...

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना