शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भज गोविंदम ...भज गोविंदम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:54 IST

श्रीमद आद्य शंकराचार्यांनी बरिच स्तोत्रे लिहीली. काव्य कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच आचार्यांनी आपल्या काव्यरचनेतून दाखवून दिले आहे

श्रीमद आद्य शंकराचार्यांनी बरिच स्तोत्रे लिहीली. काव्य कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच आचार्यांनी आपल्या काव्यरचनेतून दाखवून दिले आहे. लालित्यपूर्ण रचना, गेयता, अर्थभरित आशय, लय व शब्दसौंदर्य यामुळे ती स्तोत्रे पटकन पाठ होतात. माऊली म्हणतात, वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्वे परतत्व । स्पर्शु जैसा ॥ याप्रमाणे आचार्यांचे काव्य आहे.अल्प वयामध्ये चारही वेदाचे अध्ययन करुन प्रकांड पंडिताना वादविवादामध्ये हरवले. धर्मध्वज फडकत ठेवला. रुतंभरा प्रद्न्या प्राप्त असलेला हा महात्मा वेदातील तत्वज्ञान सहज काव्यात प्रगट करतो आहे आणि त्यांनी केलेले स्तोत्रे आजही लाखो लोकांच्या मुखोद्गत आहेत.त्यातीलच एक स्तोत्र अतिशय प्रसिध्द आहे त्याचे नाव चर्पटपंजारीका स्तोत्र आहे. चर्पट म्हणजे खमंग आणि पंजरी म्हणजे खाद्य. हे स्तोत्र म्हणजे एक खमंग खाद्य आहे यात लालित्य,ओज, भक्ती आहे. हे पाठ करण्यास सोपे व मधुर आहे. मरण जवळ आले असता व्याकरणाचे पाठ सुख देत नाहीत तेथे गोविंदाला शरण जाणे हाच एक सर्वोत्तम उपाय आहे.एक म्हातारा मनुष्य काशीमध्ये गंगेवर घाटावर व्याकरण घोकीत बसला होता. त्याच्या वयाकडे बघुन आचार्यांना नवल वाटले. जेव्हा पाठ पाठांतर करावयाचे होते त्या वयात केले नाही. बालपण गेले नेणता । तरुणपणी विषयव्यथा । वृध्दपणी प्रवर्तली चिंता । मरे मागुता जन्म धरी ॥ आणि आयष्याचा शेवट आला आणि हा व्याकरण घोकित बसला. खरे तर आता भगवंताचे नाम घेणे श्रेयस्कर असताना हा घोकीत बसला कि जे आता पाठांतर होऊ शकत नाही. म्हणून आचार्य म्हणतात, जेव्हा भगवंताने नियोजित केलेली वेळ म्हणजे मृत्यूची वेळ येते. तेव्हा तू पाठ केलेले व्याकरण तुझ्या रक्षणार्थ येणार नाहीत. म्हणून तू त्या गोविंदाचे भजन कर.           जगदगुरू श्री तुकाराम महराज एका अभंगात म्हणतात, गोविंद गोविंद। मना लगलिया छंद॥  मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥          खरे तर माणूस आयुष्यभर शिकत असतो. त्याला तसे वाटत नसते हा भग वेगळा. उच्चविद्याविभुषित माणसास वाटत असते कि आपली विद्या आपणास तारील, पण तसे घडत नाही. उलट अहंकार आडवा येतो. तो अहंकार भावनेला स्थान देत नाही. तो तर्कट वनवतो. प्रेमभक्तिला पोषक राहत नाही. त्यामुळे समाधान मिळत नाही. चार वेद, सतरा पुराणे, ब्रम्हसुत्रे, उपनिषदे संपादन केले परंतु चित्ताची तळमळ शांत झाली नाही. त्यावेळी त्यांना श्री नारद महर्षी नारदांनी भगवान श्रीकृष्णाच्या मधुर लीला वर्णन करायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी लीला वर्णन केल्यामुळे त्यांचे खरे समाधान प्राप्त झाले. म्हणून हे मानवा तू तर्कट बनण्यापेक्षा गोविंदाचे भजन कर.                    भजन म्हणजे भज-भजति म्हणजे भज-सेवया म्हणजे सेवा करणे भजन करणे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम ॥  माउली म्हणतात, तेथ सेवा हा दारवंठा । तो स्वाधीन करि सुभटा । वोळगोनि ॥ भगवतप्राप्तिचा मार्ग म्हणजे भजन प्रेमाने त्याला आळवणे. तुम्ही करा घट पटा । आम्हि न वजो तया वाटा ॥                   घट, पट, वगैरे परिभाषिक शब्दांच्या जंजाळात आम्ही अडकणार नाही. कारण  प्रेमाविण नाही समाधान ॥ म्हणून हे जीवा तू गोविंदाचेच भजन करुन भगवतप्राप्ति करुन घे.- हभप भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागावाताश्रम, चिचोंडी (पा.)ता. नगरमो. ९४२२२२०६०३                    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर