शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

भज गोविंदम ...भज गोविंदम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:54 IST

श्रीमद आद्य शंकराचार्यांनी बरिच स्तोत्रे लिहीली. काव्य कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच आचार्यांनी आपल्या काव्यरचनेतून दाखवून दिले आहे

श्रीमद आद्य शंकराचार्यांनी बरिच स्तोत्रे लिहीली. काव्य कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच आचार्यांनी आपल्या काव्यरचनेतून दाखवून दिले आहे. लालित्यपूर्ण रचना, गेयता, अर्थभरित आशय, लय व शब्दसौंदर्य यामुळे ती स्तोत्रे पटकन पाठ होतात. माऊली म्हणतात, वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्वे परतत्व । स्पर्शु जैसा ॥ याप्रमाणे आचार्यांचे काव्य आहे.अल्प वयामध्ये चारही वेदाचे अध्ययन करुन प्रकांड पंडिताना वादविवादामध्ये हरवले. धर्मध्वज फडकत ठेवला. रुतंभरा प्रद्न्या प्राप्त असलेला हा महात्मा वेदातील तत्वज्ञान सहज काव्यात प्रगट करतो आहे आणि त्यांनी केलेले स्तोत्रे आजही लाखो लोकांच्या मुखोद्गत आहेत.त्यातीलच एक स्तोत्र अतिशय प्रसिध्द आहे त्याचे नाव चर्पटपंजारीका स्तोत्र आहे. चर्पट म्हणजे खमंग आणि पंजरी म्हणजे खाद्य. हे स्तोत्र म्हणजे एक खमंग खाद्य आहे यात लालित्य,ओज, भक्ती आहे. हे पाठ करण्यास सोपे व मधुर आहे. मरण जवळ आले असता व्याकरणाचे पाठ सुख देत नाहीत तेथे गोविंदाला शरण जाणे हाच एक सर्वोत्तम उपाय आहे.एक म्हातारा मनुष्य काशीमध्ये गंगेवर घाटावर व्याकरण घोकीत बसला होता. त्याच्या वयाकडे बघुन आचार्यांना नवल वाटले. जेव्हा पाठ पाठांतर करावयाचे होते त्या वयात केले नाही. बालपण गेले नेणता । तरुणपणी विषयव्यथा । वृध्दपणी प्रवर्तली चिंता । मरे मागुता जन्म धरी ॥ आणि आयष्याचा शेवट आला आणि हा व्याकरण घोकित बसला. खरे तर आता भगवंताचे नाम घेणे श्रेयस्कर असताना हा घोकीत बसला कि जे आता पाठांतर होऊ शकत नाही. म्हणून आचार्य म्हणतात, जेव्हा भगवंताने नियोजित केलेली वेळ म्हणजे मृत्यूची वेळ येते. तेव्हा तू पाठ केलेले व्याकरण तुझ्या रक्षणार्थ येणार नाहीत. म्हणून तू त्या गोविंदाचे भजन कर.           जगदगुरू श्री तुकाराम महराज एका अभंगात म्हणतात, गोविंद गोविंद। मना लगलिया छंद॥  मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥          खरे तर माणूस आयुष्यभर शिकत असतो. त्याला तसे वाटत नसते हा भग वेगळा. उच्चविद्याविभुषित माणसास वाटत असते कि आपली विद्या आपणास तारील, पण तसे घडत नाही. उलट अहंकार आडवा येतो. तो अहंकार भावनेला स्थान देत नाही. तो तर्कट वनवतो. प्रेमभक्तिला पोषक राहत नाही. त्यामुळे समाधान मिळत नाही. चार वेद, सतरा पुराणे, ब्रम्हसुत्रे, उपनिषदे संपादन केले परंतु चित्ताची तळमळ शांत झाली नाही. त्यावेळी त्यांना श्री नारद महर्षी नारदांनी भगवान श्रीकृष्णाच्या मधुर लीला वर्णन करायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी लीला वर्णन केल्यामुळे त्यांचे खरे समाधान प्राप्त झाले. म्हणून हे मानवा तू तर्कट बनण्यापेक्षा गोविंदाचे भजन कर.                    भजन म्हणजे भज-भजति म्हणजे भज-सेवया म्हणजे सेवा करणे भजन करणे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम ॥  माउली म्हणतात, तेथ सेवा हा दारवंठा । तो स्वाधीन करि सुभटा । वोळगोनि ॥ भगवतप्राप्तिचा मार्ग म्हणजे भजन प्रेमाने त्याला आळवणे. तुम्ही करा घट पटा । आम्हि न वजो तया वाटा ॥                   घट, पट, वगैरे परिभाषिक शब्दांच्या जंजाळात आम्ही अडकणार नाही. कारण  प्रेमाविण नाही समाधान ॥ म्हणून हे जीवा तू गोविंदाचेच भजन करुन भगवतप्राप्ति करुन घे.- हभप भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागावाताश्रम, चिचोंडी (पा.)ता. नगरमो. ९४२२२२०६०३                    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर