भागवत गीता मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखविते...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 16:30 IST2020-02-06T16:29:52+5:302020-02-06T16:30:00+5:30
आध्यात्मिक विशेष...

भागवत गीता मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखविते...!
ब्रम्हचर्य आश्रम, गुह्स्थ आश्रम, वामप्रस्थ आश्रम, सन्यास आश्रम हे चार आश्रम आहेत. वानप्रस्थावस्थेत सात्विक आहार घ्यावा. परमेश्वराची भक्ती करावी. आपली अवस्था चांगली ठेवावी. ईश्वराची भक्ती निरंतर आहे. मानवी जीवन महत्वाचे आहे. परमात्माचे रूप अनेक आहेत. आपण परमेश्वराची सेवा करावी. वृद्धावस्थामध्ये शरीराला चांगले मनाला परमेश्वराकडे वळवावे. परमेश्वराकडे जाण्यासाठी सत्संग करावे, आराधना करावी. निरंतर दिवसाचा चांगला उपयोग करावा.
परमेश्वराची भक्ती करावी. मन चंचल आहे. एकाग्र करणे मुल, संपत्ती हे मिळतच असते. आपले काम आपण करावे. ईश्वर, भजन भक्तीमध्ये वेळ घालवावे. गुरूची सेवा करावी. कामना, वासना मनाला चंचल करते त्याचा त्याग करावे. भगवतगीता कथा ऐकावे. कोणत्याही वस्तूची अपेक्षा करू नये. योग प्राणायम, भजन यासाठी पहाटे लवकर उठावे. वेळेचा व जीवनाचा सदुपयोग करावा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आई, वडील, गुरु यांची सेवा करावी.
भागवत गीता केवळ मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखविते असे नाही. तर माणूस घडविण्याचे कार्य करते. भगवत गीता कर्म योगाचा संदेश देतानाच राष्ट्रीय उत्थनाच्या कायार्बाबत हि प्रेरणा देते. निष्काम, कर्मयोग, कायिक, वाचिक व मानसिक व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य भगवतगीतेत आहे. मनुष्याचे व राष्ट्राचे सर्व समस्याचे निदान भगवत गीतेत आहे़
- स्वामी उत्तमानंद सरस्वती, ऋषिकेश