शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
3
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
4
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
5
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
6
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
7
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
8
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
9
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
10
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
11
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
12
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
13
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
14
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
15
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
16
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
17
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
18
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
19
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
20
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचे डोही आनंद तरंग -  माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:30 IST

भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे.

- डॉ.रामचंद्र देखणे- (प्रवचन व कीर्तनकार )पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर पांडुरंगरूपी नाव पुंडलिकाच्या द्वारात कटेवर हात ठेवून उभी आहे आणि तुम्हाला उभ्याउभ्याच बोलावत आहे. फक्त त्याच्या पायांना मिठी घाला. पैलतीरावर आपोआप जाल. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी पंढरीनाथाच्या पायी मिठी घातली आणि त्याचे सुंदर ते ध्यान आठवीत ते म्हणू लागले, ह्यह्यतुज पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया, पंढरीच्या श्रीविठ्ठलाला पाहिले की त्याच्या सुंदर स्वरुपाचे वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द सरसावतात आणि परब्रह्मरूपातील तत्त्ववेत्त्यांचे हे दर्शन दृश्यस्वरूपात येते. भक्त किंवा संत हे तात्त्विक पातळीवर अद्वैतात जातात. पण भावानिक पातळीवर द्वैतातच. ज्याने द्वैताचे द्वैत मोडते ते हे रूप इतके मनोहर आहे, की ब्रह्मभावात गेलेले संत पुन्हा स्वरूपस्थितीला येऊन वर्णन करू लागतात.       सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,         कर कटवरी ठेवोनिया.विटेवरी उभा आहे, कटावर हात आहेत, कानात मकरकुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभमण्याचा हार आहे, दंडावर, मनगटावर बाजूबंद आणि मणिबंध आहेत, कमरेला तिहेरी पितांबर आहे. समचरण विटेवर ठेवून हे सुंदर ते ध्यान भक्तिसुखाची शोभा वाढवित आहे. विठ्ठलाचे हे वर्णन म्हणजे मूर्तिविज्ञान, तर त्यातील रूपक हे मूर्तिज्ञान होय. कारण संतांनी चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूनेही न्याहाळून हे वर्णन केले आहे. कटेवरील हात हे तर तत्त्वदर्शी असे सुंदर रुपक आहे. शंकराचार्यांनी पांडुरंगाचे वर्णन करताना विधातुवसत्यै असा शब्दप्रयोग केला आहे. विधातु म्हणजे ब्रह्मदेव आणि वसत्यै म्हणजे वसतिस्थान. ब्रह्मदेवाचे वसतिस्थान म्हणजे सत्यलोक आणि आपण यामध्ये  फक्त दहा बोटांचा फरक आहे. ह्या भवसागराचे पाणी कमरेपर्यंतच आहे हेच कटेवर हात ठेवून ते सुचवित आहेत. संतश्रेष्ठ तुकाराममहाराज म्हणतात, भवसागर तरता, कारे करितसे चिंता,    पैल उभा दाता, कटी कर ठेवुनिया...भवसागर तरून जाण्याची चिंता का करता, पलीकडे कटीवर हात ठेवून तो उभा आहे. भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे. नित्यानित्यवस्तुविवेक इहफलभोगाविराग, अमुत्रफलभोगाविराग, शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुता ही पाच बोटे आहेत. ह्या दहा बोटांनी जीवनाचा खेळ खेळला तर भवसागरही कमरेएवढाच आहे, तर सत्यालोकही फक्त दहा बोटावरच आहे. 

टॅग्स :PuneपुणेPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAdhyatmikआध्यात्मिक