शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

आनंदाचे डोही आनंद तरंग -  माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:30 IST

भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे.

- डॉ.रामचंद्र देखणे- (प्रवचन व कीर्तनकार )पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर पांडुरंगरूपी नाव पुंडलिकाच्या द्वारात कटेवर हात ठेवून उभी आहे आणि तुम्हाला उभ्याउभ्याच बोलावत आहे. फक्त त्याच्या पायांना मिठी घाला. पैलतीरावर आपोआप जाल. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी पंढरीनाथाच्या पायी मिठी घातली आणि त्याचे सुंदर ते ध्यान आठवीत ते म्हणू लागले, ह्यह्यतुज पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया, पंढरीच्या श्रीविठ्ठलाला पाहिले की त्याच्या सुंदर स्वरुपाचे वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द सरसावतात आणि परब्रह्मरूपातील तत्त्ववेत्त्यांचे हे दर्शन दृश्यस्वरूपात येते. भक्त किंवा संत हे तात्त्विक पातळीवर अद्वैतात जातात. पण भावानिक पातळीवर द्वैतातच. ज्याने द्वैताचे द्वैत मोडते ते हे रूप इतके मनोहर आहे, की ब्रह्मभावात गेलेले संत पुन्हा स्वरूपस्थितीला येऊन वर्णन करू लागतात.       सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,         कर कटवरी ठेवोनिया.विटेवरी उभा आहे, कटावर हात आहेत, कानात मकरकुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभमण्याचा हार आहे, दंडावर, मनगटावर बाजूबंद आणि मणिबंध आहेत, कमरेला तिहेरी पितांबर आहे. समचरण विटेवर ठेवून हे सुंदर ते ध्यान भक्तिसुखाची शोभा वाढवित आहे. विठ्ठलाचे हे वर्णन म्हणजे मूर्तिविज्ञान, तर त्यातील रूपक हे मूर्तिज्ञान होय. कारण संतांनी चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूनेही न्याहाळून हे वर्णन केले आहे. कटेवरील हात हे तर तत्त्वदर्शी असे सुंदर रुपक आहे. शंकराचार्यांनी पांडुरंगाचे वर्णन करताना विधातुवसत्यै असा शब्दप्रयोग केला आहे. विधातु म्हणजे ब्रह्मदेव आणि वसत्यै म्हणजे वसतिस्थान. ब्रह्मदेवाचे वसतिस्थान म्हणजे सत्यलोक आणि आपण यामध्ये  फक्त दहा बोटांचा फरक आहे. ह्या भवसागराचे पाणी कमरेपर्यंतच आहे हेच कटेवर हात ठेवून ते सुचवित आहेत. संतश्रेष्ठ तुकाराममहाराज म्हणतात, भवसागर तरता, कारे करितसे चिंता,    पैल उभा दाता, कटी कर ठेवुनिया...भवसागर तरून जाण्याची चिंता का करता, पलीकडे कटीवर हात ठेवून तो उभा आहे. भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे. नित्यानित्यवस्तुविवेक इहफलभोगाविराग, अमुत्रफलभोगाविराग, शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुता ही पाच बोटे आहेत. ह्या दहा बोटांनी जीवनाचा खेळ खेळला तर भवसागरही कमरेएवढाच आहे, तर सत्यालोकही फक्त दहा बोटावरच आहे. 

टॅग्स :PuneपुणेPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAdhyatmikआध्यात्मिक