शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

आनंद तरंग: विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 05:00 IST

मंथन म्हणजे निकोप वादसंवाद. चांगल्या विषयावर चांगल्या लोकांनी केलेली चर्चा, त्यात विवादाशिवाय होणारा संवाद आहे

बा.भो. शास्त्री

विचार हिच खरी माणसाची ओळख आहे. तोच वजा झाला की त्याला दोन पायाचा पशू म्हटलं जातं. याच कारणाने, सद्गुण नसलेल्या माणसाला आपण बैल, गाढव, कुत्रा म्हणत असतो व दुर्गुण संपले की आता तो माणूस झाला असं आपण म्हणत असतो. बालपणाची कोमलता निरागसता, हास्य निघून जाते, मग ‘‘रम्य ते बालपण’’ आपणच म्हातारपणी म्हणायला लागतो. त्या बालपणाचं नुतनीकरण करता येत का? कमजोर झालेला आचार व लुप्त होणारा विचार ताजा होईल का? या प्रश्नाचं उत्तर श्रीचक्रधर एका सूत्रातून देतात,‘‘परस्परें मथन किजे मग नूतन होए:’’तेच भांडं घासल्यानं चकाकतं, तेच वस्त्र धुतल्याने निर्मळ होत. तिच जागा झाडू मारला की स्वच्छ दिसते. तेच टाकाऊ टिकाऊ करता येतं. तसं जुन्याला नवं करता येत का? त्यासाठीच परस्परात विचाराचं मंथन करावं असं स्वामी म्हणतात. मंथनाशिवाय लाकडातला अग्नी व दह्यातलं लोणी बाहेर पडत नाही आणि अंतवंताचं मंथन झालं तरच अनंताची उपलब्धी असते.‘‘मंथनी नवनीता तैसे घे अनंतावाया व्यर्थकथा सांडी मार्ग’’असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. मंथन म्हणजे निकोप वादसंवाद. चांगल्या विषयावर चांगल्या लोकांनी केलेली चर्चा, त्यात विवादाशिवाय होणारा संवाद आहे. केवळ जिज्ञासेने प्रगतीसाठी झालेले प्रश्नोत्तरं असतात. गीतेच्या समारोपात संजय कृष्णार्जुनाच्या संवादाचं अप्रतिम वर्णन करतो. धृतराष्ट्राचे सगळे दडपणं झुगारुन आपला समोरोपिय व अंतीम निर्णय देतो. मधूर संवादाचं अतिउत्साहाने कौतुक करतो.‘‘राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम्’’केशवार्जुनयो:पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहु:’’अशाच प्रकारचा आनंदवर्धक संवाद स्वामींना अपेक्षित आहे. ज्या चर्चेत सुख श्रेय आणि शृंगार नाही त्याला अरण्य रुदण म्हटलं आहे. परस्परे या शब्दात दोन टोकांचं घुसळण आहे. एक सत्तापक्ष, एक विरोधीपक्ष. विरोध म्हणजे व्यत्यय दूर करणारा चुका ध्यानात आणून देणारा, भांडणारा नव्हे. त्याला बोधपक्ष असंही म्हणतात. समुद्रमंथन झालं तेव्हा असून व देव यांच्यात झालं. गीता दोघांच्या संवादातच जन्माला आली. गुरु शिष्याच्या संवादात शास्त्र तयार झालं. विचाराच्या मंथनातून सिद्धांत जन्माला आहे. कालबाह्य झालेले टाकावू टाकायचं व ग्राह्य स्वीकारायचं हाच उद्देश असतो. काही आचार विचार काल सापेक्ष स्थल सापेक्ष व व्यक्ती सापेक्ष असतात. त्यांना आपण शाश्वत करण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा अडचण होते. कधीतरी गृहित धरलेलं सत्य आज असत्य असल्याचं ध्यानात आलं तर ते नाकारता येणं यालाच विचार म्हणतात. जुन्याचा आशय तसाच ठेवून मानवतेला पुरक नवा अर्थ समाजाला देणे. अथवा ज्या शास्त्राचा विसर पडला त्याला चर्चेतून पाखडून घेण्यासाठी हे सूत्रं अवतरलं आहे. सिद्धांत नित्यनूतन वाटला पाहिजे. असा विचारविमर्ष तर घरातही महत्वाचा आहे. सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला तर, सुखकारकच असतो. जमीन घ्यायाची असेल तर सर्वांसमोर प्रस्ताव मांडा. सदस्य प्रश्न विचारतील कुठे आहे, हलकी की भारी पाणी आहे, रोडलगत आहे, मार्केट तिी दूर आहे, पैसे आहेत, हा पूर्वपक्ष आहे व याचं समर्पक उत्तर देतो याला सिद्धांत पक्ष म्हणतात. एकमताने निर्णय घेतला तर ते मंथनातून निर्माण झालेलं नूतन आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक