शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अभ्यंगस्नान...पवित्र अन् आरोग्यदायी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 4:17 AM

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पद्धती या शास्त्र, विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणे केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असते.

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पद्धती या शास्त्र, विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणे केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असते. आता पाहा ना, दिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले आहे. ते का? तर सकाळी सूर्योदयाच्या आधी झोपेतून उठणे आणि वातावरणात अधिकाधिक प्रमाणात असलेला प्राणवायू शरीरातील प्रत्येक धमन्यांपर्यंत श्वासाद्वारे पोहोचविणे, हे आरोग्यदायी असते, शिवाय तेलाची मालीश करणे आणि आंघोळ करताना उटणे लावणे, हेही त्वचेसाठी हितकारक असते.दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्त्व काय, या प्रश्नावर वेदशास्त्र संपन्न हरिभाऊशास्त्री जोशी सांगतात की, भागवत पुराणातील कथेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर हा अत्याचारी दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी जेव्हा भगवान कृष्णाने प्रहार केला. तेव्हा या राक्षसाने वर मागितला. श्रीकृष्ण म्हणाले, ‘हे दैत्या, आजच्या चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी पहाटे अभ्यंगस्नान करेल, त्याला नरकयातना मिळणार नाहीत, तसेच अशा यातनेतून त्याची मुक्ती होईल.’ पुराणातील भगवान कृष्णाच्या या वरदानाला शिरसावंद्य मानून भारतीय संस्कृतीत अभ्यंगस्नानाची प्रथा रूढ झाली.दिवाळीच्या काळात थंडीचे वातावरण असते. या काळात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अंगाला तेल लावून स्नान केल्यामुळे त्वचेला तजेला येतो. शिवाय शरीरावरील सुरकुत्याही कमी होतात. तेल हे नेहमी सुगंधी असते. या सुगंधामुळे एक प्रसन्न आणि सकारात्मक मानसिकता निर्माण होते, असेही शास्त्रीजींनी सांगितले.अभ्यंगस्नान असे केले जाते...अभ्यंगस्नानाच्या पद्धती प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या असल्या, तरी बहुसंख्य घरांमध्ये खालील पद्धतीचा वापर होतो-व्यक्तीला पाटावर बसविले जातेशरीराला सुगंधी तेलाचे मालीश केले जाते.कपाळाला कुंकुमतिलक लावून ओवाळले जातेपाटावर बसवून स्नान घातले जातेस्नान घालताना सुगंधी उटणे शरीराला लावले जातेस्नान झाले की, पुन्हा दिव्याने ओवाळले जाते.उटण्यामधील मिश्रणउटणे खास पद्धतीने बनविले जाते. यामध्ये शिकेकाईचा सर्वाधिक वापर असतो. शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून, त्यामध्ये वाळा, ज्येष्ठमध, आंबेहळद, तुळशीची पाने आणि थोडासा कापूर मिसळला जातो.- रवींद्र देशमुख

टॅग्स :Diwaliदिवाळी