Next

अधिवेशनात अजितदादांकडे नेतृत्व द्या, इतरवेळी बाबांकडे राहुद्यात...असं कोण म्हणालं? Ajit Pawar | CM

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:09 PM2021-12-30T17:09:53+5:302021-12-30T17:10:20+5:30

Ajit Pawar Chief Minister of Maharashtra - Aditya Thackeray : अधिवेशनकाळात अजितदादांनी छान नेतृत्व केलं, त्यामुळे अधिवेशनकाळात सरकारचं नेतृत्व त्यांच्याकडेच राहुद्यात, बाकी दिवशी ते बाबांकडे द्या..म्हणजे उदधव ठाकरेंकडे द्या... खुद्द विधिमंडळाच्या पटलावरच ही मागणी झाली. विशेष म्हणजे भाजपनं उद्धव ठाकरेंना चिमटा काढला, आदित्य ठाकरेंना टोमणाही मारला. त्याचवेळी अजितदादांची स्तुतीही केली.. हे सारं घडलं अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न येण्यानं. आता भाजपनं मागणीच अशी केली की विधानसभेत एकच हशा पिकला. कुणी केली ही मागणी पाहुयात. तर त्याचं झालं असं की सहकारी संस्थांशी संबंधित एका बिलावर चर्चा होत होती. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरेंच्या अधिवेशनाला न येण्यावरुन टोमणा मारला. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून भर सभागृहात उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीवरुन हा टोमणा मारला. आता उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीवरुन अजून काय काय चर्चा सुरु आहेत हेही आपल्याला पाहचंय पण त्याआधी पाहुयात मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले ते...