भाजप सरकार शेतक-यांच्या हिताचे - वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:21 AM2017-11-08T01:21:17+5:302017-11-08T01:21:27+5:30

महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून शेतीसाठी विवीध चांगल्या योजना राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ पत्रकारांशी बोलतांना सांगितले

 BJP government for the welfare of farmers - Tiger | भाजप सरकार शेतक-यांच्या हिताचे - वाघ

भाजप सरकार शेतक-यांच्या हिताचे - वाघ

Next

वाडा : महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून शेतीसाठी विवीध चांगल्या योजना राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ पत्रकारांशी बोलतांना सांगितले. राज्यात सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी वाडा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
भाजप सरकारने शेतीसाठी जलयुक्त शिवार सारखी चांगली योजना राबवल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणात शेतजमीन सिंचनाखाली आल्याने ही योजना शेतकºयांसाठी वरदान ठरल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. त्याच बरोबर १९७२ साली आलेल्या दुष्काळापेक्षाही २०१४ चा दुष्काळ मोठा होता. मात्र, या दुष्काळातही सरकारने विवीध योजनाच्या माध्यमातून शेतकºयांना दिलासा दिला. त्यामुळे हे सरकारच यश असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकºयांनी मागितलेली कर्ज माफी केली नसून भाजप सरकारने कर्ज मुक्ती केल्याने खºया अर्थाने सरकारने शेतकºयाचे हित केल्याने शेतकºयांना समाधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मध्यंतरीच्या काळात कोळशाची कमतरता असल्याने चार दिवस विजेची कमतरता आली असल्याने त्यांनी दिलिगरी व्यक्त करून यापुढे असा प्रश्न पुन्हा भेडसावणार नसल्याचे यावेळी सांगितले.

 

Web Title:  BJP government for the welfare of farmers - Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा