कीटकनाशकाची फवारणी करताना आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:03 PM2017-10-14T15:03:18+5:302017-10-14T15:26:58+5:30

आष्टी(शहीद)तालुक्यातील धाडी येथील अत्यल्प भूधारक शेतकरी हंसराज मारोतराव मनोटे वय 32 याची फवारणी दरम्यान अचानक प्रकृती बिघडली.

Farmers' death during spraying of insecticide | कीटकनाशकाची फवारणी करताना आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना

कीटकनाशकाची फवारणी करताना आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना

Next

वर्धा - आष्टी(शहीद)तालुक्यातील धाडी येथील अत्यल्प भूधारक शेतकरी हंसराज मारोतराव मनोटे वय 32 याची फवारणी दरम्यान अचानक प्रकृती बिघडली त्यांना आष्टीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. सदर घटना आज सकाळी 8 वाजता घडली

नेहमीप्रमाणे हंसराज हे दुसऱ्याच्या शेतात फवारणीच्या कामावर गेले होते त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, डोळे लाल झाले होते तर तोंड सुजले त्यामुळे थोडा आराम केला असता त्यांना घरी नेले मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने आष्टीला नेण्यात आले डॉक्टरांनी मृत घोषित केले, त्यांच्या मागे पत्नी 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्याकडे 1 एकर एवढीच शेती आहे. 60 हजार रुपयांचे कर्ज आहे अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.

यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरील कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेमुळे झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली. कृषी विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अमरावतीचे विशेष पोलीस महासंचालक, आरोग्य सहसंचालक, विभागीय कृषी संचालक सदस्य असतील. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक आणि फरिदाबाद येथील प्लान्ट प्रोटेक्शनचे प्रतिनिधी अशा सात जणांचा समावेश असणार आहे. याशिवाय तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित सदस्य म्हणून बोलाविण्याचा अधिकार एसआयटीच्या अध्यक्षांना देण्यात आला आहे.

शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत जबाबदार घटक नक्की करणे, अशा प्रकारच्या आपत्तींवर प्रतिबंधासाठी कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करताना घडलेल्या चुका, त्याकरिता जबाबदार व्यक्ती, संस्था निश्चित करणे, चिनी स्प्रेवरील बंदीबाबत शिफारस करणे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीला तीन आठवड्यांत आपला अहवाल सादर करायचा आहे.

Web Title: Farmers' death during spraying of insecticide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.