वादातून तिघांकडून दोघांवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:33 PM2018-10-22T23:33:54+5:302018-10-22T23:34:07+5:30

क्षुल्लक कारणावरून तिन युवकांनी दोन युवकांवर चाकू हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून ही घटना स्थानिक सानेवाडी भागातील रेल्वे वसाहत परिसरात रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

The duo had a knife attack on the duo | वादातून तिघांकडून दोघांवर चाकू हल्ला

वादातून तिघांकडून दोघांवर चाकू हल्ला

Next
ठळक मुद्देसानेवाडीतील घटना : तिनही आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : क्षुल्लक कारणावरून तिन युवकांनी दोन युवकांवर चाकू हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून ही घटना स्थानिक सानेवाडी भागातील रेल्वे वसाहत परिसरात रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सुत्रानुसार, रोहित चौधरी, कुणाल कांबळे व रोहन पाटील हे तरुण सानेवाडी भागातील रेल्वे वसाहत परिसरात उभे असता अचानक काही तरुण आपल्या ताब्यातील दुचाकी धुमस्टाईल चालवित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दुचाकी चालकाला त्याबाबत हटकले असता दुचाकीवरील तिनही तरुणांनी परतून येत रोहित चौधरी, कुणाल कांबळे व रोहन पाटील यांच्याशी वाद करून चक्क चाकूने मारहाण केली. यात रोहित चौधरी हा गंभीर जखमी झाला. तर कुणाल कांबळे याच्या हाताला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने तो जखमी झाला.
या प्रकरणी तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात हिंदनगर येथील यश श्रीवास्तव, गुड्डू लोखंडे व पुलफैल येथील शुभम धोंगडे विरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

Web Title: The duo had a knife attack on the duo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.