Maratha Reservation: उद्या नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही; क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 10:46 AM2018-08-08T10:46:35+5:302018-08-08T10:49:49+5:30

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून बंद रद्द

no bandh on 9th august from maratha kranti morcha in navi mumbai and thane | Maratha Reservation: उद्या नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही; क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय

Maratha Reservation: उद्या नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही; क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय

googlenewsNext

मुंबई: ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा निर्णय मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. वारंवार बंद पाळून लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं ठाणे आणि नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या दोन शहरांमधील समन्वयकांनी बंद न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंद पाळण्याची हाक मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली होती. 

नवी मुंबई आणि ठाण्यात उद्या बंद पाळण्यात येणार नाही. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी समन्वयकांनी हा निर्णय घेतला आहे. बंदऐवजी ठिय्या आंदोलन करुन आरक्षणाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवली जाईल, असं मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या ठाणे आणि नवी मुंबईतील दुकानं, आस्थापनं सुरू राहतील. 

मराठा आरक्षण प्रकरणी काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पडताळून पाहण्यासाठी स्थापन करण्यात आलेला मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल उच्च न्यायालयात सादर करेल, अशी माहिती राज्य सरकारने आज हायकोर्टात दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडूव शपथपत्र सादर करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही याबाबतचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत देऊ, असं न्या. एम. जी. गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील मागासवर्ग आयोगाने सांगिल्याची माहिती राज्य सरकारनं न्यायालयात दिली. दरम्यान, अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आयोगाने मागितलेला तीन महिन्यांचा कालावधी जास्त आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने पुकारलेलं आंदोलन तीव्र होत असून, त्यात आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. न्यायालयाच्या दृष्टीनं ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्यास सांगावा, अशी सूचना उच्च न्यायालयानं केली. 
 

Web Title: no bandh on 9th august from maratha kranti morcha in navi mumbai and thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.