रोजगाराच्या प्रश्नावर कृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 10:52 PM2019-04-07T22:52:05+5:302019-04-07T22:52:09+5:30

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. ...

Action on employment issues should be tried | रोजगाराच्या प्रश्नावर कृती हवी

रोजगाराच्या प्रश्नावर कृती हवी

Next

सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. हेच मुद्दे निवडणुकीनंतरही तितक्याच तडफेने मांडून जिल्ह्यातील बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा जिल्ह्यातील स्थानिक जनतेची आहे.
साताऱ्यातील विविध शासकीय, खासगी आयटीआय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांतून कुशल मनुष्यबळ तयार होते. मात्र, त्यांना अपेक्षित पगाराची नोकरी मिळविण्यासाठी पुणे अथवा मुंबई गाठावी लागते. अनेकजण बेंगलोरलाही जातात, काहीजण परदेशात जाऊन नोकरी करत तिथंच स्थायिक होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.
सातारा शहरासह इतर शहरे व गावांमध्ये सहज जरी फेरफटका मारला तरी तरुण कमी आणि वयस्कर लोकच जास्त पाहायला मिळतात. स्थानिक तरुण नोकरीनिमित्त सातारा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात गेलेला असतो. गावात अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने सातारा, वाई, फलटण, शिरवळ, लोणंद, कºहाड येथील औद्योगिक वसाहतीत अल्प मोबदल्यात काम करणारे अनेक तरुण आपण पाहतो. मात्र, त्यापुढे जाऊन भविष्याचा विचार करून पुणे-मुंबईत राहून नोकरी करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने गावे ओस पडलेली पाहायला मिळतात.
शेतीमधील उत्पादनांना हमी भाव मिळाला तर स्थानिक शहरात नोकरी करून गावातील शेतीकडेही तरुणांना लक्ष देता येईल, मात्र तसे होत नाही. लोकप्रतिनिधींनी या समस्या ओळखून योजनांची अंमलबजावणी करावी, अशी तरुणांची अपेक्षा आहे. त्याबरोबरच उद्योजकांना सुरक्षित वातावरण मिळाले तर उद्योग वाढून रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा उद्योजकांची आहे.

बेरोजगार तरुणांना काय हवे?
1मुले-मुली तांत्रिक शिक्षण घेतात, मात्र त्यांना रोजगार देण्याच्या बाबतीत सातारा शहरात मर्यादा येताना दिसतात. त्यामुळे पुणे-मुंबईतल्या नोकºया साताºयात मिळाल्या पाहिजेत.
2सातारा शहराच्या १६ ते २० किलोमीटर परिघात मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. साताºयातील विशाल औद्योगिक वसाहतीचा विकास झाला पाहिजे.
3 आयटीआय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॅम्पस इंटरव्ह्यूतून उत्तम पगाराची कायमस्वरुपी नोकरी मिळावी.

रोजगाराचा लेखाजोखा
रोजगार कार्यालयातील नोंदीनुसार पाच वर्षांत ७४ हजार ४९८ बेरोजगारांची नोंद आहे. त्यामध्ये ३१ हजार ८८८ लोकांना पाच वर्षांच्या काळात रोजगार उपलब्ध झाला.
उद्योजकांच्या या आहेत अपेक्षा
1उद्योजकांना सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे. खंडणीखोर लोकांवर पोलीस यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनीही वचक ठेवावा.
2औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरुस्ती वेळच्यावेळी होणे गरजेचे आहे. आर्थिक मंदीच्या काळात कामगार आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनीही कंपनीला सहकार्य करणे गरजेचे आहे.
3 तांत्रिक ज्ञान असणाºया तरुण-तरुणींना नोकरी देण्यात अडचणी येत नाहीत, कारण कामाच्या पहिल्या दिवसापासूनच हे लोक संबंधित संस्थेला फायद्याचे ठरतात.

Web Title: Action on employment issues should be tried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.