शहराला पाणीपुरवठा होत असलेला बंधारा निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:58 AM2019-03-16T01:58:38+5:302019-03-16T01:58:43+5:30

नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ

Water supply to the city could be stopped | शहराला पाणीपुरवठा होत असलेला बंधारा निकामी

शहराला पाणीपुरवठा होत असलेला बंधारा निकामी

Next

वडगाव मावळ : तीव्र उन्हाळ्यामुळे मावळ तालुक्यातील धरणांतील पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे. वडगावला पाणीपुरवठा होत असलेल्या जांभूळ धरणाचा बंधारा निकामी झाला आहे. त्या बंधाऱ्यातून आणि शहरात पाण्याचे नियोजन नसल्याने ऐन उन्हाळ्यात धो धो पाणी वाया जात आहे.

वडगाव शहराची लोकसंख्या सुमारे तीस हजार आहे. सुदैवाने शहरात पाण्याची उपलब्धता योग्य आहे. परंतु नियोजन नाही. काही भागात कमी प्रमाणात पाणी येते. काही ठिकाणी नळाला थेंब थेंब पाणी येते, तर काही भागात जोरदार दाबाने पाणी येते. नळपाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांना अर्धा इंच पाइपलाइन टाकून नळ कनेक्शन द्यावे, असा नियम आहे. परंतु ग्रामपंचायत असताना अनेकांनी हा नियम धाब्यावर बसवून एक इंची पाइपलाइन टाकून नळावाटे पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. त्यामुळे त्यांना जादा दाबाने पाणी मिळते. काही भागात मोटार लावून पाणी घेतले जाते. त्यामुळे आजूबाजूला नळांना पाणी येत नाही.

वडगाव शहराला इंद्रायणी नदीवरून जांभूळ येथील बंधारा, कातवी व सांगवी येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून पूर्वी जांभूळ येथील इंद्रायणी नदीवर बंधारा बांधला. त्या बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. नदीतून येणारे हे पाणी शहरातील शिंदे टेकडी, डेक्कन हिल, न्यू इंग्लिश स्कूल, संस्कृतीनगर, म्हाळसकर वस्ती, हरणेश्वर टेकडी, मिलिंदनगर, कातवी व टाटा हौसिंग येथील आठ पाण्यांच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. लोकसंख्येच्या मानाने शहराला मुबलक पाणी असतानाही शहरातील काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही यासाठी नगरसेवकांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

वडगाव शहराला पाणीपुरवठा होत असलेला जांभूळ येथील बंधारा पूर्णपणे निकामी झाला आहे. तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अन्यथा तो कोसळल्यास शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. हा बंधारा दुरुस्तीसाठी नगर पंचायतीत तीन महिन्यांपूर्वी ठराव झाला. अद्यापही कामाला सुरुवात नाही. भविष्यात हा बंधारा फुटला, तर शहरातील पाणीपुरवठा बंद होऊ शकतो.

मुख्याधिकारी : कारवाई करणार
नळपाणी पुरवठा योजनेला अर्धा इंची पाईप घेणे हा शासनाचा नियम आहे. मात्र अनेकांनी तो मोडून एक वा दीड इंची घेतला आहे. याबाबत लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली. जांभूळ बंधाºयाचे कामही लवकर केले जाईल.

मुख्य पाइपलाइनवरून मोटार लावून पाणी घेणे बंद केले पाहिजे.
तत्काळ बंधारा दुरुस्ती,
संपूर्ण शहरात समान पाणीवाटप,
ज्यांनी अनधिकृतपणे एक इंची पाइपलाइन वापरली ती काढावी

Web Title: Water supply to the city could be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.